Wednesday, June 29, 2022

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास ठाकरे सरकारला पाठवले पत्र !


*उद्या महाराष्ट्रात फ्लोर टेस्ट होणार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले.

मुंबई  (प्रतिनीधी) महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ऐक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात उद्या फ्लोर टेस्ट होणार आहे असे सांगितले जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी काही वेळापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे असे म्हणाले की, मी उद्या फ्लोर टेस्टसाठी मुंबईला जाणार आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, कामाख्या मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहे. मी इथे महाराष्ट्राच्या शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करण्यासाठी आलो आहे. मी आणि सर्व आमदार उद्या फ्लोर टेस्टसाठी मुंबईला जाणार आहोत.

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे :

राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 7 अपक्ष आमदारांनी मला पत्र लिहून म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले आहे, त्यामुळे फ्लोर टेस्ट आवश्यक आहे. 30 तारखेला सभागृहात फ्लोअर टेस्ट घेण्यात यावी, तसेच विधानभवनाच्या बाहेर आणि आत कडेकोट बंदोबस्त ठेवावा. सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुनिश्चित करण्यात यावे, असे या पत्रात पुढे लिहिले आहे.

महाराष्ट्र सरकार पडणे जवळपास निश्चित :

पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. भाजप सध्या सक्रिय दिसत आहे. मंगळवारी फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. रात्री त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन फ्लोअर टेस्टची मागणी केली आणि आता ते मुंबईत भाजप विधिमंडळ पक्षासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून हटवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या बैठकीत आमदारांना विधानसभा अधिवेशनासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment