Sunday, June 26, 2022

बंडखोर आमदारांची जीवंत प्रेतं राज्यात येतील; राऊतांचे खळबळजनक वक्तव्य.


मुंबई  (प्रतिनीधी) :- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील दहिसर येथे आज शिवसेनेचा मेळाव्यात खळबळजनक वक्तव्य केले. गुवाहाटीला गेलेले 40 बंडखोर आमदार जीवंत प्रेतं आहेत. त्यांची प्रेतं मुंबईत येतील तेव्हा त्यांच्यात आत्मा नसेल. हे 40 लोक जेव्हा मुंबई विमानतळावर उतरतील; तेव्हा ते आपल्या मनाने जिवंत नसतील. कारण इथे मुंबईत ज्योत आहे, हे त्यांना माहीत आहे. येथील शिवसैनिकांच्या मनात आग धुमसत असल्याचे बंडखोर आमदारांना माहीत आहे, आणि त्याचा परिणाम काय होईल? त्यामुळेच एकदा बंडखोर आमदार मुंबईत येऊन दाखवा असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचा राजकीय संघर्ष आता कायदेशीर लढाईत अडकलेला दिसत आहे. अपात्रतेच्या नोटिसा मिळालेल्या 16 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याच्या निर्णयाला बंडखोर आमदारही न्यायालयात आव्हान देणार आहेत. इकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले- तुम्ही शिवसेना सोडली असाल तर वडिलांच्या नावाने पक्ष काढा, बाळासाहेबांच्या नावाने पक्ष का काढता.

आमचे वडील एकच, फक्त बाळासाहेब ठाकरे. हे बंडखोर 10 वेळा वडील बदलतात, कधी सुरतला जातात, कधी गुवाहाटीला जातात. तुमची संख्या पुरेशी असेल तर तुम्ही मुंबईत का येत नाही, तुम्ही मुंबईत या मी तुमचे स्वागत करायला तयार आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना बाळासाहेबांची शिवसेना नष्ट करून या आमदारांना गुलाम म्हणून ठेवायचे आहे, असे राऊत म्हणाले

No comments:

Post a Comment