Tuesday, August 31, 2021

दिव्य ज्योति जागृती संस्थानच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव 2021 उत्साहात साजरा.


पुणे/लातूर (प्रतिनिधी) कोविड जागतिक महामारीच्या या संघर्षमय स्थितीमध्ये , जिथे संपूर्ण समाजआर्थिक संकट, आरोग्य समस्या, मानसिक तानतणाव किंवा कौटुंबिक समस्यांना तोंड देत आहेत, अश्या परिस्थितीत मानवतेला समाधान आणि सहनशक्ती प्रदान करण्याचा अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. केवळ अध्यात्माद्वारेच प्रत्येक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकते आणि हेच अटळ सत्य आहे. ज्याला  वेळोवेळी आपल्या संत महापुरुषांनी मनुष्याला स्मरण करून दिले आहे. दिव्य ज्योती जाग्रती संस्थान [DJJS] चे संस्थापक आणि संचालक दिव्य गुरू श्री आशुतोष महाराज जी, आजही मनुष्याला अध्यात्माच्या महत्वाची केवळ जाणीवच करून देत नाहीत, तर मनुष्याला त्याचे सार 'ब्रह्मज्ञान', आत्मसाक्षात्काराची सनातन विज्ञानाद्वारे प्रयोगात्मक पद्धतीने अनुभूती ही करून देत आहेत.
संपूर्ण विश्वातील असंख्य लोकांच्या आध्यात्मिक समाधानासाठी, DJJS ने श्री कृष्ण जन्माष्टमी २०२१ च्या शुभ मुहूर्तावर 'संभवामि युगे युगे' या विषयावर आधारित एक विशेष सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक व्हर्चुअल कार्यक्रमाचे आयोजित केले. वरील शीर्षक श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ‘मी सज्जनांच्या रक्षणासाठी आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी पुन्हा पुन्हा धरतीवर अवतरीत होईल' या सर्वाभौमिक उदघोषावर आधारित होते. या भव्य ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक २९ आणि ३० ऑगस्ट रोजी अनुक्रमे भाग १ आणि भाग २ मध्ये DJJS यूट्यूब चॅनेल [youtube.com/djjsworld] च्या माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आले. तसेच संपूर्ण कार्यक्रम जन्माष्टमीच्या रात्री दिनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी रात्री ८ ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा प्रसारित करण्यात आला. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य लोकांनी घरी बसून या दिव्य कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. तसेच या दोन दिवसांमध्ये सोशल मीडिया / ट्विटर अॅप वर #DJJSJamashtami आणि #SambhavamiYugeYuge हॅशटॅग दिवसातून अनेक वेळा ट्रेंड करत होते. संस्थेचे मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि नृत्य नाटकांचे देखील इन्स्टाग्राम रीलमध्ये खूप कौतुक झाले. 
या कार्यक्रमात, श्री कृष्णाविषयी समाजात पसरलेल्या भ्रांतीना ना केवळ दूर केले तर जन्माष्टमीचा सण केवळ दही-हंडी, उपवास किंवा सजावटीपुरता मर्यादित नसून तो भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य प्रेरणांना आत्मसात करून त्यांनी दाखवलेल्या आध्यात्मिक मार्गावर संकल्प धारण करण्याचा उत्सव आहे हे स्पष्ट केले. श्री कृष्णाने अवतार घेणे एक उत्सव का आहे ? श्री कृष्णाची शाश्वत चेतना आजही आपले जीवन कसे दिव्य बनवू शकते? आज आपन केवळ भगवान श्री कृष्णावर विश्वास ठेवता की त्यांच्या आज्ञेचे ही पालन करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे विविध माध्यमांद्वारे देण्यात आली. या कार्यक्रमात श्रीमद्भागवतगीतेमध्ये समाविष्ठ असलेल्या आध्यात्मिक रत्नांना सादर करून जगतगुरु भगवान श्री कृष्णाच्या चरणी भक्तीभावाने नमन अर्पित करण्यात आले. भगवान श्री कृष्णाच्या जीवन गाथेला ज्ञानवर्धक नृत्य-नाटकांद्वारे प्रस्तुत करून विद्वान प्रचारकांद्वारे श्री कृष्णाच्या लीलांचे विश्लेषण केले गेले.
भगवान श्री कृष्णाद्वारे अर्जुनाला दिलेले 'गीता-ज्ञान'; भगवान विष्णूचे दोन द्वारपाल 'जय-विजय' ची गाथा, ज्यांनी अहंकार वश धर्माचा मार्ग सोडून दिल्याबद्दल शापित झाले होते,  मीराबाईजिंच्या भक्तीचे चित्रण करणाऱ्या 'प्यारे दर्शन दिजो' सारख्या रोमांचक नाट्य कार्यशाळा, 'केशव माधव' आणि 'गुरु वंदना' वर नृत्य नाटके आणि श्री कृष्णाची मंगल आरती हे या भव्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या सर्व सादरीकरणाचा सर्वात विशेष पैलू म्हणजे त्यांच्यामध्ये अंतर्भूत सेवाभाव. हे उल्लेखनीय आहे की, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांपैकी कोणीही नाव, कीर्ती आणि पैशासाठी काम करणारे वेतन-व्यावसायिक नसून ते सर्व युवा कलाकार दिव्य गुरु श्री आशुतोष महाराज जींचे निस्वार्थी, समर्पित, जागृत भ्रमज्ञानी शिष्य होते. ज्यांनी समाजकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन या कार्यक्रमासाठी स्वतःला वाहून घेतले. प्रत्येक प्रस्तुती दैवी उत्साह आणि ऊर्जाने भरलेली होती कारण सर्व कलाकार प्रदर्शन करण्यापूर्वी ब्रह्मज्ञान आधारित ध्यान साधना करत असत. या रंगमंचावर उच्चकोटीचे अनुशासन दिसून आले. या नाट्यनिर्मितीमध्ये दिसणारे जोडपे वास्तविक जीवनात देखील विवाहित आहेत.
जगभरातील असंख्य प्रेक्षकांनी घरी बसून पाहिलेल्या या कार्यक्रमाला व्यापक मीडिया कव्हरेज आणि सर्वांचे कौतुक मिळाले. जरी संस्था तीन दशकांहून अधिक काळापासून जन्माष्टमीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करत असली तरी, हा कार्यक्रम सर्वात खास आणि अद्वितीय होता. कारण DJJS संस्थांच्या ३५० हून अधिक विश्वव्यापी शाखांमधून दिव्य गुरू श्री आशुतोष महाराज जींचे सर्व वयोगटातील हजारो शिष्य, आपल्या घरातून बाहेर येवून कोविड प्रोटोकॉलचे पालन करत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, मंदिरे, मॉल, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पोचले व कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला. आणि हा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. या दिव्य कार्यक्रमाने 'वसुधैव कुटुंबकं'ची भावना केवळ मात्र जागृतच नाही केली तर वास्तविकते मध्ये साकार करून दाखवली. देशभरातील सुमारे ७५ केंद्रांवर प्रसिद्ध कॉफी शॉप चेन कॅफे कॉफी डे [CCD] च्या डिजिटल जाहिरातींद्वारे या कार्यक्रमाची जाहिरात करण्यात आली. तसेच जगभरातील स्थानिक माध्यमांनीही त्यांच्या संबंधित वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांद्वारे कार्यक्रमा संबंधित प्रचार केला. त्याचबरोबर, अहमदाबादचे सुप्रसिद्ध कर्णावती क्लब आणि राजपथ क्लब तसेच बिहार, उत्तर प्रदेश आणि ओरिसाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात या कार्यक्रमाचे सामुदायिक डिजिटल स्क्रीनिंग देखील करण्यात आले.
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने बॉलीवूड अभिनेता ,सेलिब्रिटी आणि प्रभावशाली दिग्गज व्यक्तिमत्त्व अशा - श्री सिंग अखिलेंद्र मिश्रा त्यांच्या क्रूर सिंगच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे ;  राष्ट्रीय गायन रियालिटी शो 'व्हॉईस ऑफ इंडिया किड्स' विजेता - सुश्री निष्ठा शर्मा;  प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि राजकारणी - श्री रवि किशन; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक - स्मृती गुरु सुधांशु सिंघल; सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार- श्री संदीप देव; प्रख्यात विनोदी कलाकार श्री दीपक राजा आणि श्री मणी लाहिरी; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे UPSC परीक्षा प्रशिक्षक श्री अवध ओझा; श्याम सुंदर पाठक; कल्चर क्रिएटर, पीक परफॉर्मेंस कोच, स्टोरी टेल्लर व लेखक सुश्री रिंकू साहनी; अभिनेता, मॉडेल, अभियंता श्री वरुण जोशी; ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील ऑस्ट्रेलियन इंडियन रेडिओचे सीईओ. श्री उमेशचंद्र ओम; यूके चे अल्पाइन समूहाचे संचालक डॉ. गुरप्रीत कहलोन कोहली; भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री सुश्री स्मृती कश्यप; WWE. चॅम्पियन द ग्रेट खली; जागतिक मानवाधिकार संघटना प्रमुख, संचालक, श्री विवेक अग्रवाल; खासेओल कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री अजय सहगल; व्यवसाय प्रशिक्षक आणि सनसिटी सोलर प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी श्री राकेश भाटी; आसारा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष श्री. आर. गोयल; इनव्हर्टिस विद्यापीठ उत्तर प्रदेशचे कुलपती डॉ. उमेश गौतम; प्रख्यात भजन गायक श्री नंदू मिश्रा; प्रसिद्ध पंजाबी गायक श्री विपुल मेहता, श्री तेजी संधू आणि श्री फिरोज खान; पंजाबी गायक आणि लेखक सत्ती खोखेवालिया; संगीत कलाकार आणि गायक श्री मदन मड्डी; हिमाचल प्रदेशातील नाहन परिसरातील कारागृह अधीक्षक श्री सुशील कुमार ठाकूर; सरकारी आश्वासन समिती अध्यक्ष, लोकसभा सदस्य, श्री राजेंद्र अग्रवाल; राज्यसभा सदस्य श्री देवेंद्र हितकरी; छत्तीसगडचे खासदार श्री संतोष पांडे;  बांसवाडा दरबार, राजस्थान चे महाराजा माननीय जगमल सिंह; पंजाबचे आरोग्य मंत्री श्री बलबीर सिंह सिद्धू; चंदीगडचे महापौर श्री रविकांत शर्मा; पंचकुलाचे महापौर श्री कुलभूषण गोयल; पुणे महानगरपालिका [PMC] महापौर श्री मुरलीधर मोहोळ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे चे अध्यक्ष श्री वसंत मोरे आणि इतर अनेकांनी D.J.J.S. जन्माष्टमीचा प्रचार प्रसार त्याच्या सोशल मीडिया हँडल तसेच व्हिडिओ संदेशांद्वारे केला आणि कार्यक्रमाला एक सफलतापूर्वक यश मिळवून दिले.
DJJS ही एक अलाभकारी सामाजिक-आध्यात्मिक संघटन आहे, ज्या द्वारे जागतिक स्तरावर पुढील प्रमाणे सामाजिक सुधारणा आणि कल्याणकारी कार्यक्रम राबविले जातात - लिंग समानता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, मादक पदार्थांचे गैरवापर निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, भारतीय गाय जाती सुधारणा आणि संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, अपंग आणि कैद्यांचे सशक्तीकरण. तसेच कॉर्पोरेट क्षेत्र आणि तरुणांच्या सक्षमीकरणाद्वारे वैश्विक बंधुत्व आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी हे संघटन कार्यरत आहे.
नियमित आध्यात्मिक पोषण व सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आताच  DJJS YouTube चॅनेल (www.youtube.com/djjsworld) त्वरित सबस्क्राईब करा आणि - बेल आयकॉन दाबा!

*खासदारावर उपोषण करण्याची वेळ अणु नका - खा डॉ प्रितमताई मुंडे. *डॉ खा प्रितमताई मुंडे यांच्या साक्षीने नगरसेवक प्रा पवन मुंडे यांचे उपोषण मागे!


*एक महिन्यात भुयारी गटार योजनेतील प्रलंबित कामे पुर्ण करणार.!मुख्याधिकारी अरविंद मुंडे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरातील "110 कोटींच्या भुयारी गटारी योजनेतील" रखडलेल्या व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मा पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांचे आमरण काल 30 ऑगस्ट रोजी 11 वाजता भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू होते,प्रसंगी खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी अचानक उपोषण स्थळी भेट देऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना रखडलेल्या कामा बाबत जाब विचारून योग्य सूचना दिल्या,या प्रसंगी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी एक महिन्याच्या आत "भुयारी गटार योजनेतील" रखडलेली कामे पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्या मुळे तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले.
      
या प्रसंगी खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी नगरपरिषदे च्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले, न प चा असाच ढिसाळ कारभार राहिला तर तुम्हाला जनता माफ करणार नाही,नगरपालिकेच्या अशा बोगस, भ्रष्ट व ढिसाळ कामांमुळे पुढच्या वेळी मला उपोषनास बसण्याची वेळ आणू नका अशा कडक शब्दात खा प्रितमताई मुंडे यांनी अधिकाऱ्यांना झापले व नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष द्यावे अशा सूचना ही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या, उपोषण करतांना प्रा पवन मुंडे यांनी भुयारी गटार योजनेतील कामा बरोबरच पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित अनुदान त्वरित वाटप करणे,वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे,मेरुगिरी रस्ता त्वरित करणे व शहरातील अस्वच्छतेमुळे करावयाच्या उपाययोजना या बाबतीत निवेदन दिले होते, त्याला पालिकेने लेखी पत्राद्वारे पूर्ण कामे एक महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले,या प्रसंगी उपोषण स्थळी  नगरसेवक प्रा पवन मुंडे  यांच्या समवेत भाजपाच्या नगरसेविका उमाताई समशेट्टे, भारतीताई कुलकर्णी,भाजपाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी,भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी,जेष्ठ नेते फुलचंद कराड,भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या सहित शहर व ग्रामीण भाजपाचे जेष्ठ व युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपोषण स्थळी उपस्थित होते.

Saturday, August 28, 2021

दोन बहिणींचा नदीत बुडून मृत्यू ; राक्षसभुवन शनीचे येथील दुर्दैवी घटना.


गेवराई  (प्रतिनीधी)  आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली . या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

नेहा धर्मराज कोरडे ( वय ९ वर्ष ) व अमृता धर्मराज कोरडे ( वय ८ वर्ष ) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत . घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्यात नवनिर्वाचित सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले . तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले .

गेवराई तालुक्यात यापुर्वी देखील मिरगाव , संगमजळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेले आहे . त्यातच शनिवारी राक्षसभुवन याठिकाणी घडलेल्या या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

वाळू माफियांना महसुल,पोलीसांचा आर्शिवाद.पुढारी अन अधिकाऱ्यांना प्रशासन सोलून काढणार का?


वाळू माफिया, पुढारी अन अधिकाऱ्यांना प्रशासन सोलून काढणार का?

बीड - (प्रतिनीधी) वाळूच्या माध्यमातून गोदापात्राची चाळणी करून आपलं उखळ पांढर करून घेणारे पुढारी आणि अधिकारी यांच्यातील मिलीभगत कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.नूतन जिल्हाधिकारी शर्मा यांच्यामुळे का होईना एसपी राजा रामस्वामी यांना गोदापात्रात जावं लागलं.जर कलेक्टर आणि एसपी गेल्यावर सहा सात हायवा सापडत असतील तर महसूल अन पोलीस विभागाचे अधिकारी अन कर्मचारी झोपा काढतात का?अशा कामचुकार अन पैसे खाऊवर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बीड जिल्ह्यात गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी ,शिरूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो .त्या त्या तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते हे वाळूच्या धंद्यात असतात.हा सर्वांनी नदी पात्राची पूर्ण चाळणी केली आहे .

विशेषतः सगळ्यात जास्त वाळू ज्या गेवराई तालुक्यातील गोदापात्रात भेटते त्याठिकाणी शिवसेना असो की भाजप अथवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी,सरपंच यांनी हातात हात घालून लुटण्याचा उद्योग केल्याचे दिसून येते .

गोदापात्र खरडून साफ करण्याचे पाप ज्यांनी ज्यांनी केले आहे ते कधी गेवराईचे आमदार,मंत्री,जी प सदस्य,नगराध्यक्ष राहिलेले आहेत.त्यामुळे येथे येणारा तहसीलदार असो की पोलीस उपअधीक्षक अथवा पोलीस निरीक्षक प्रत्येक जण या पुढाऱ्यांच्या दरबारात जाऊन मुजरा करतात अन आपला हिस्सा घेऊन गप्प बसतात.

या तालुक्यात कोणालाही वाळू उपसा करायचा असेल तर मोठ्या” युद्धात”जित हसील करावी लागते किंवा मग “विजय” मिळवून आपणच सिंह असल्याचे दाखवून द्यावे लागते.हा सगळा प्रकार बिनबोभाट सुरू आहे,कारण तलाठी,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक ,नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ,पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सपोनि असे सगळेच यामध्ये सहभागी असतात.

दोन दिवसांपूर्वी नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी वाळूपट्यात जाऊन कारवाई केली,याचा अर्थ लिलाव नसताना वाळू उपसा सुरू आहे,मग हे पोलीस अन स्थानिक महसूल प्रशासनाला दिसत नाही का.जर अशा लोकांच्या निगराणीत हे प्रकार होत असतील तर मग या अधिकाऱ्यांवर दंडात्मक अन निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे .

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशि भविष्य !


मेष

श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल.शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. कुटुंबीयांसमवेत आनंद आणि उत्साहात वेळ जाईल. आईकडून लाभ होण्याचे संकेत गणेशजींकडून दिले जात आहेत. मित्र आणि संबंधितांमुळे घरातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ

श्रीगणेश आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. आज घडणार्‍या घटनांमुळे आपण काळजीत पडाल. श्रीगणेशाच्या मते आपले स्वास्थ्य बिघडेल आणि डोळ्याचे विकार बळावतील. घरातील व्यक्तींचा विरोध आणि रुसवा याला तोंड द्यावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल व कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. दुर्घटनेपासून सावध राहा.

मिथुन

श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिच्या दृष्टिने योग्य दिवस. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबातही मुलगा, भाऊ व पत्नी यांच्याकडून लाभ होण्याचे संकेत आहेत. स्वादिष्ट भोजनाचे योग आहेत. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. संततीकडून आनंदी वार्ता समजतील. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. उत्पन्न वाढेल. वैवाहिक सुख लाभेल.

कर्क

आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेशांना वाटते. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढतीचे योग. अधिकार्‍याबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियाबरोबर मनमोकळ्या गाप्पा. गृहसजावटीकडे लक्ष जाईल. कामासाठी बाहेर जावे लागेल. आई बरोबर चांगले संबंध राहतील. सरकारी लाभ होतील. स्वास्थ्य चांगले राहील.

सिंह

मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. व्यवहार न्यायपूर्ण असेल. आज धार्मिक तसेच मंगल कार्यात तुम्ही मग्न रहाल असे श्रीगणेश पाहताहेत. धार्मिक प्रवास घडतील. आज आपली वृत्ती रागीट असेल, म्हणून श्रीगणेश सावध करत आहेत. परदेशात राहणार्‍या नातलगांच्या बात- म्या समजतील. संतती व उद्योगधंदा यातील कटकटी मुळे दिवस अशांत जाईल.

कन्या

नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. स्वभाव रागीट बनेल म्हणून बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी चर्चेतून मतभेद होणार नाहीत, याची काळजी ध्या. पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादात पडू नका.

तुळ

श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. प्रियकरासोबत प्रेमालाप होईल. मित्रासोबत प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वरमालंकारांची खरेदी होण्याचे योग आहेत. तन-मन तंदुरुस्त राहील. मान-सम्मान मिळेल. मिष्टान्न, भोजन व वैवाहिक सुखाची प्राप्ती होईल.

वृश्चिक

घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा. शत्रूवर मात होईल. उत्तम सहकार्य सहकार्यांकडून मिळेल. स्त्रीवर्गाशी ओळखी होतील. माहरहून बातम्या येतील, असे श्रीगणेश पाहताहेत. धनलाभ होईल. कामे पूर्ण होतील.

धनू

आज प्रवास न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंतेने मन व्याकूळ होईल. कामे अपूर्ण राहिल्याने निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. कलासाहित्याकडे मनाचा कल राहून विविध कल्पना सुचतील. बौद्धिक चर्चेपासून दूरच राहा. प्रियजनांसाठी आजचा दिवस रोमांचक आहे.

मकर

श्रीगणेश पाहताहेत की, आज आपली मनःस्थिती व आरोग्य काही चांगले असेल. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छातीसंबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. पाण्यापासून सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक उद्वेग आणि एकंदरीत प्रतिकूलता यामुळे दिवस चिंतेत जाईल.

कुंभ

आज आपणास मनाने हल्के हल्के वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांबरोबर काही आयोजन कराल. त्यांच्याबरोबर वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाल. विरोधकावर मात कराल. भाग्य वाढेल. वैवाहिक जिवनात आनंद प्राप्त होईल.

मीन

श्रीगणेश आज आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. रागावर व वाणीवर ताबा ठेवा नाहीतर मन दुःखी होईल. पैशाचे, देण्याघेण्याचे व्यवहार सावधतेने करा. मन व शरीराचे आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार आणू नका व खाण्यापिण्यावर संयम ठेवा.


Friday, August 27, 2021

दिव्य ज्योति जागृती संस्थानचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव ऑनलाईन. घरात बसूनच पाहता येईल कार्यक्रम आणि करता येईल पुजा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) covID-19 च्या या विकट परिस्थितीमध्ये चला सकारात्मक ऊर्जेने स्वत:ला पोषित करूया सर्वश्री आशुतोष महाराज जी द्वारा संस्थापित व संचालित दिव्य ज्योति जाग्रति संस्थान (डीजेजेएस) श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव-२०२१च्या निमित्ताने संभवामि युगे युगे या विषयावर आधारित एक विशेष सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. कार्यक्रमाचे प्रिमियर डीजेजेएस यूटयूब (Youtube) २९ आणि ३० ऑगस्ट २०२१ ला दोन भागामध्ये केले जाईल. भाग-१ २९ ऑगस्टला सकाळी १० ते ११.३० आणि रात्रि ९ ते १०.३० वा, भाग-२ ३० ऑगस्ट २०२१ ला सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत सोबतच जन्माष्टमीच्या रात्रि ९ ते १२ वाजे पर्यंत संपुर्ण कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे. ज्याचे समापन भगवान श्रीकृष्णांच्या भव्य आरतीने केले जाईल.
डीजेजेएस जन्माष्टमी महोत्सव विशेषातीविशेष आहे. कारण हा कार्यक्रम केवळ भगवान श्रीकृष्णांची मटकी फोड लीला व भजन संकीर्तन या पुरतीच सीमित नसुन रोमांचकारी नृत्य-नाटिका संगीतमय प्रस्तुती व ज्ञानवर्धक आध्यात्मिक प्रवचनांचा अद्वितीय संगम आहे. दिव्य गुरू श्री आशुतोष महाराज जींच्या ब्रम्हज्ञानी शिष्यांद्वारा प्रस्तुत नृत्य-नाटिका, ज्या आपल्याला पुन्हा द्वापर युगात घेऊन जातील तर दुसरीकडे गुरूदेवांच्या ब्रम्हज्ञानी संन्यासी शिष्यांद्वारा आध्यात्मिक प्रवचन आपल्याला श्रीकृष्ण लीलांमध्ये निहित शाश्वत ज्ञानाची आजच्या सामाजिक परिवेशामध्ये जी उपयोगिता आहे त्याच्याशी परिचित करवुन देतील.
दिव्य ज्योति जाग्रति संस्थान गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी हा महोत्सव केवळ मात्र बाह्य 
स्वरूपामध्येच नाही तर त्यामध्ये निहित वास्तविक भावनेनेच साजरा करीत आहे. या भव्य आयोजनामध्ये लाखो दर्शक सम्मिलित होतात. डीजेजेएस च्या प्रतिनिधींनी सांगितले की भगवान श्रीकृष्णांप्रति समाजामध्ये व्याप्त मिथ्या धारणा आणि भ्रामक कल्पनांना दूर करने व श्रीमद् भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांद्वारा दिल्या गेलेले आध्यात्मिक प्रयोगात्मक विज्ञान - ब्रम्हज्ञानाशी लोकांना परिचित करण्याच्या उद्देशाने गुरूदेव सर्वश्री आशुतोष महाराज जींनी स्वत: या कार्यक्रमाला आकारा दिला आहे.
विषय संभवामि युगे युगे श्रीमद् भागवत गीतेमध्ये वर्णीत सज्जानांचे कल्याण व दुष्टांच्या विनाशा करिता पृथ्वीवर ईश्वर अवतरणाच्या सार्वभौमिक उद्घोषणेवर आधारित आहे. हा कार्यक्रम अवतार वादाच्या विभिन्न पैलुंवर चर्चा करेल आणि सोबतच श्रीमद् भागवत गीतेचे सार मानव समाजाला अवगत करवून त्यांना ईश्वरीय साक्षात्काराकरिता प्रेरित करेल. दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या विभिन्न कार्यक्रमाच्या विलक्षणतेमध्ये जी प्रमुख विशेषता आहे ती म्हणजे स्वयंसेवेची भावना (सेवाभाव) हा भव्य कार्यक्रम नाव, प्रसिध्दी आणि धन प्राप्तीच्या इच्छेने प्रेरित प्रशिक्षित कलाकारांद्वारा नाही तर श्री आशुतोष महाराजजींचे निस्वार्थी व ब्रम्हज्ञानी युवा शिष्यांद्वारा प्रस्तुत केला जाणार आहे. जो केवळ मात्र एकाच भावनेने प्रेरित आहे आणि ती भावना आहे, आपल्या गुरूदेवांच्या श्री चरणांमध्ये सेवा अर्पित करणे, हे आयोजन कोणत्या विशेष वयोगटासाठी सीमित नसुन हा कार्यक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. हा एक असा कार्यक्रम आहे जो आपण आपल्या परिवारावोबत बघु शकता आणि जीवनोपयोगी गुट आध्यात्मिक शिक्षा प्राप्त करू शकतो. या भव्य कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी डीजेजेएस युट्यूब (Youtube) चैनल www.youtube.com/djisworld ला लगेच सब्सक्राइब करा.

Tuesday, August 24, 2021

भुयारी गटार योजनेच्या नावाखाली फोडलेले रस्त्याच्या ठिकाणी त्वरित नवीन रस्ते करा अन्यथा 30 ऑगस्ट रोजी नगरपालिका समोर करणार आमरण उपोषण.- प्रा पवन मुंडे

.
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) गेल्या 2 वर्षा पासून 100 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजनेच्या नावाखाली शहरातील बहुतांश रस्ते फोडून त्यात गटाराचे पाईप टाकले मात्र फोडलेले रस्त्यावर अद्याप नवीन रस्ते निर्माण न केल्या मुळे शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत तरी येणाऱ्या पाच दिवसांच्या आत या फोडलेल्या रस्त्यांचे काम चालू नाही झाले तर येत्या सोमवारी 30 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.
   गेल्या दोन 2 वर्षा पासून शहरातील गल्लोगल्ली तील लहान- मोठे , अनेक चांगले व काही नवीन झालेले रस्ते खोदून "भुयारी गटार योजनेच्या" नावाखाली फोडले मात्र त्या नंतर त्या ठिकाणी नवीन रस्ते करणे हे टेंडरच्या अंदाजपत्रका मध्ये असतांना त्या कडे ना कंत्राटदार लक्ष देत आहे ना नगरपालिका प्रशासन देत आहे,सध्या पावसाळ्या चे दिवस असल्याने पावसा मुळे सर्व खोदलेल्या रस्त्यावर चिखल झाल्याने रहदारीच्या अडचणी मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत व  बेहाल झाले आहे, 100 कोटींचे काम घेणारा संबंधित कंत्राटदार हा फोडलेल्या रस्त्यावर करावयाच्या रस्त्याच्या बजेट चे पैसे नगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने फक्त "कागदोपत्री रस्ते केले" असे दाखवून उचलून घेण्याच्या मनस्थितीत आहे का ? असा प्रश्न प्रा पवन मुंडे यांनी उपस्थित केला असून येत्या पाच दिवसात शहरांतील फोडलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी नवीन रस्ते करण्याचे काम चालू नाही केले तर दिनांक 30 ऑगस्ट सोमवार रोजी नगरपालिका कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे नगरसेवक  प्रा पवन मुंडे यांनी म्हटले आहे.

दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या जन्माष्टमी कार्यक्रमाचे दिल्लीवरून थेट प्रक्षेपण.भाविकांनी लाभ घ्यावा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिव्य ज्योती जागृती संस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जन्माष्टमी कार्यक्रमाचे नवी दिली येथुन युट्युब चॅनल वरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.                
 या कार्यक्रमाचे पहिल्या भागाचे प्रक्षेपण रविवार दिनांक २९ आगष्ट २०२१ रोजी सकाळी दहा ते अकरा आणि रात्री नऊ ते दहा.तीस या वेळेत प्रसारण करण्यात येणार आहे.दुसऱ्या भागाचे थेट प्रक्षेपण सोमवार दिनांक तिस आगष्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार आहे.                                          तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण तीस आगष्ट रोजी रात्री नऊ ते बारा या वेळेत केले जाणार असून या जन्माष्टमी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कास्ट्राइब माफसू कार्यकारिणी उपाध्यक्षपदी प्रवीण बागडे यांची निवड.


नागपूर : (प्रतिनीधी) कास्ट्राइब महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी अलीकडेच गठीत करण्यात आली. कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या  कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी श्री प्रवीण बागडे यांची निवड करण्यात आली. 
  अध्यक्षपदी प्रज्ञेय ताकसांडे आणि सचिवपदी जितेंद्र हातमोडे यांची निवड करण्यात आली. त्याशिवाय कार्याध्यक्षपदी जालिंदर गजभारे, कोषाध्यक्षपदी संतोष बन्सोड यांची, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून एस. के. वासनिक, बाळू छापने, अविनाश इंगळे, दीपा डोंगरे, मिलिंद आठवले, निशांत वाकोडे यांचा समावेश आहे. सभेला महासंघाचे सरचिटणीस नरेंद्र धनविजय, रामराव कीर्तने, डॉ. सोहन चवरे, प्रेमदास बागडे आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल कुलगुरू प्रा.डॉ. कर्नल आशिष पातूरकर, अधिष्ठाता पशुविज्ञान डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक संशोधन नितीन कुरकुरे, संचालक विस्तार डॉ. अनिल भिकाने, अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ सुनील सहातपूरे, डॉ एन.एन. झाड़े, डॉ. ए.पी. सोमकुवर, डॉ. पी.टी.जाधव, उपकुलसचिव डॉ. अजय गावंडे, तांत्रिक अधिकारी डॉ. सारिपूत्त लांडगे, डॉ. गीतांजली ढुमे, अविनाश इंगळे व श्री अतुल फुले यांनी अभिनंदन केले.                                                                                                 

Friday, August 20, 2021

नगर परिषद,नगर पंचायत निवडणुकीचा डिसेंम्बर अखेर रणसंग्राम !


बीड – राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत च्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत .त्यामुळे या वर्षाखेरीस नगर परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार हे निश्चित झाले आहे .जिल्ह्यातील पाच नगर पंचायत आणि सहा नगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे .

मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदा, नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. शासनाने १२ मार्च, २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल.

तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा. परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी सध्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही दिनांक २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात यावी. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तात्काळ सादर करावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत

बीड जि. प. चे सिओ म्हणून अजित पवार कारभार सांभाळणार.अजित कुंभार यांचि बदली.


बीड - (प्रतिनीधी) बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जात पडताळणी विभागाचे अजित पवार हे बीडला येत आहेत .कुंभार यांची बृहन मुंबई महापालिकेचे सहआयुक्त म्हणून रुजू होतील .

गेल्या तीन वर्षा पासून बीड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अजित पवार हे येत आहेत .कुंभार यांची बीड येथील कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे .कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली होती. नियोजन व उत्कृष्ट कार्य जिल्हा कधीच विसरणार नाही कोरोना संकट काळात दोन्ही लाटेत त्यांनी उत्कृष्ट कार्य करून वेगळी छाप निर्माण केली होती.

भारतीय जनता पार्टी की जन आर्शीवाद यात्रा में कोरोना नियमों का उल्लंघन, 7 एफआईआर दर्ज.



मुबई: (संवाददाता) भारतीय जनता पार्टी की जन आर्शीवाद यात्र को लेकर उद्धव ठाकरे सरकार सख्त नजर आ रही है. दरअसल, बीजेपी की इस यात्रा के वक्त कोविड-19 प्रोटोकॉल का उल्लंघन के आरोप में 7 एफआईआर दर्ज की गई हैं. हालांकि अभी पुलिस ने इस पूरे मामले में किसी की गिरफ्तारी नहीं की है.

मिली जानकारी के मुताबिक, कोविड-19 प्रोटोकॉल के उल्लंघन के आरोप में मुंबई के विले पार्ले, खेरवादी, माहिम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर और गोवांडी पुलिस थाने में कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज की गई है. बताया जा रहा है कि इस यात्रा में बीजेपी के भारी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए. यात्रा में कई कार्यकर्ताओं के चेहरे पर मास्क नहीं दिखा. साथ ही सोशल डिस्टेंसिंग का पालन भी नहीं किया गया था. जिसका कोरोना प्रोटोकॉल के तहत करना जरूरी है.

वहीं, नियमों के उल्लंघन को देखते हुए मुंबई पुलिस ने बीजेपी कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज की है. मुंबई के एक थाने के अधिकारी ने मामले की जानकारी देते हुए बताया कि, इन लोगों ने जन आर्शिवाद यात्रा निकालने के लिए पुलिस से अनुमति भी नहीं ली. उन्होंने बताया कि, पुलिस ने इन कार्यकर्ताओं के खिलाफ आईपीसी की धारा-188, 269, 270 के तहत मुकदमा दर्ज किया है.

बता दें, केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के समर्थन में इस यात्रा को निकाला गया था जिसमें सैकड़ों कार्यकर्ता शामिल थे. बीते महीने मोदी सरकार में शामिल किए गए मंत्रियों को बीजेपी अध्यक्ष ने जनता से जुड़ने का निर्देश दिया था. जिसके तहत जन आर्शीवाद यात्रा का आयोजन किया गया है

बलात्काऱ्यांसाठी कठोर अशा शरीयत सारखा कायदा लागू करा - प्रा.ताज मुलानी.


* दलित मुस्लीम विकास मंच तर्फे राष्ट्रपतींना निवेदन सादर.

 बीड (प्रतिनिधी ) महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात दिवसेंदिवस वाढणारा व भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारा अल्पवयीन मुलींना बलात्कार करून ठार मारणाऱ्या त्या नराधमांना शरीयत सारखा कायदा ज्यामध्ये भर चौकात फाशी देणे किंवा शिरच्छेद करणे किंवा जिवंत पुरण्यासारख्या कठोर कायदा , राष्ट्रपतींनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून देशात हा  लागू करावा या मागणीचे निवेदन मा. राष्ट्रपतींना मा.जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत दलित मुस्लीम विकास मंच द्वारे प्रा. ताज मुलानी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात मार्गदर्शक शेख इसाक शेठ, महिला आघाडीच्या रहिमाबाजी, संघटनेच्या कायदे सल्लागार ॲड.गिता करमाळकर, जिल्हाध्यक्षा जिजाबाई साळवे, संघटनेचे युवा नेते सय्यद ईनामआदी उपस्थित होते*
 भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मानाचे स्थान असून त्यांचा सन्मान केला जातो भारतीय संस्कृतीत कोणत्याही ठिकाणी स्त्रियांची अवहेलना केली गेली नाही त्यामुळे जगात भारतीय  संस्कृतीची छाप आहे परंतु सध्या काही माथेफिरू नराधमांकडून या संस्कृतीचा नाश होत असल्याचे दिसत आहे संपूर्ण भारत देशात रोज दिवसेंदिवस शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अल्पवयीन किंवा किशोरवयीन मुलींवर जबरदस्तीने बलात्कार करून जिवे मारण्याच्या घटना गेल्या पाच दहा वर्षापासून वाढत चाललेले आहे त्यात चढताक्रमच दिसत आहे त्याचे कारण आहे की, असे हे नराधाम कायद्यातून पळवाटा काढून निर्दोष सुटका करून घेत आहेत.
 त्याकरिता या  नराधमांविरोधात जर का शरीयत सारखा कायदा झाला व त्यांना भर चौकात फासावर लटकावले किंवा त्यांचा शिरच्छेद केला गेला किंवा जिवंत पुरले गेले तर त्याचा भयंकर प्रभाव पडेल व या घटनांवर अंकुश लागून या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याकरिता मा.राष्ट्रपती महोदयांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून बलात्कारासाठी शरीयत सारखा कायदा लागू करावा अशी मागणी दलित मुस्लिम विकास मंच तर्फे राष्ट्रपती यांना मा. जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे .जर का हा कायदा त्वरित लागू केला गेला नाही तर महाराष्ट्रातून जनजागृती करून संपूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. ताज मुलानी सर ,महिला आघाडीच्या रहिमाबाजी, मार्गदर्शक शेख इसाक शेठ, कायदे सल्लागार ॲड.गिता करमाळकर, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा जिजाबाई साळवे आणि संघटनेचे युवा नेते सय्यद ईनाम आदींनी दिला आहे.
            

सरपंचांनी पोळा मिरवणूक मार्ग केला स्वच्छ.सौ.वत्सलाबाई कोकाटे यांचा विशेष उपक्रम.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बळीराजाचा आवडता उत्सव पोळा काही दिवसांवर आला असून संगमच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी जेसीबी लावून मारोती मंदिरानजीकचा पोळा मिरवणूकीचा मार्ग स्वच्छ केला असून आता येथे सहजपणे बैलांची मिरवणूक काढता येणार आहे. 
संगम ता.परळी वैजनाथ येथील सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी बळीराजाचा उत्सव बैलपोळा लक्षात घेवून बैलांची मिरवणूक ज्या मंदिर परिसरात निघते तो परिसर आणि मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग यंत्र सामुग्री लावून सुरळीत केला आहे. मंदिराच्या अवती भोवती असलेला कचरा, लहान मोठे दगड गोठे तसेच इतर साहित्य पूर्णपणे स्वच्छ केले आहे. 

*बळीराजाची सेवा करता आली*

बैलपोळयाला गावातील मंदिराला बळीराजा बैलाची या मार्गावरून मिरवणूक काढतो . मंदिर परिसरात बैलांची पुजाही होते. शेतकरी राजा बैलांचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करीत असून त्यांना व त्यांच्या बैलजोड्यांना मिरवणूक, प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ, सुरळीत व सुरक्षित असावा या दृष्टीकोनातून आपण हा मार्ग स्वच्छ केल्याचे  व बळीराजा तसेच बैलाची सेवा करता आली हे मी माझे भाग्य समजते.असे 
सौ.वत्सलाबाई कोकाटे
सरपंच, मौजे संगम ह्या म्हणाल्या 

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशिभविष्य !


मेष – घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणि मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंद्यासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल.व्यवसायात लाभ, मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ – व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या वार्ता आपणाला भावविवश बनवतील.

मिथुन – अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबातील व्यक्ती आणि ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील.
कर्क – आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्न लिंगीय व्यक्तींशी रोमांचक मुलाखात तुम्हाला सुख देईल.
सिंह – श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील.
कन्या – चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.

तूळ – श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. यात्रा- प्रवासासाठी काळ योग्य नाही.

वृश्चिक – कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल.

धनु – द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मकर – ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र आणि आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रसन्न राहाल.

कुंभ – कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा.

मीन – श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. अचानक धनलाभ होईल.

Thursday, August 19, 2021

आज पत्रकारांसाठी राजयोगाद्वारे सुखशांती शिबिराचे आयोजन.- वैभव स्वामी


बीड (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या कार्यकाळात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती हा न खचता पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी सज्ज झाला पाहिजे, या हेतूने कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थानच्या वतीने राजयोगाद्वारे सुखशांतीची अनुभूती दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागाच्या पुढाकारातून तमाम बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी उद्या शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचे औचित्य साधून राजयोगाद्वारे सुख शांतीची अनुभूती देणारे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त पत्रकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, संस्था, देश, जग त्रस्त झाले आहे. सर्व काही असूनही तो सुख-शांती पासून दूर होत आहे.प्रकृतीचा हा कोप दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले आत्म मनोबल, ह्युमॅनिटी पावर वाढवण्यासाठी राजयोगाद्वारे मेडिटेशन अतिशय उपयुक्त ठरले आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थानच्यावतीने संपूर्ण जगभरात राजयोगाद्वारे सुख शांतीची अनुभूती यशस्वी ठरली असून अनेकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे.पत्रकार संघाच्या पुढाकारातून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आदर्श नगर, डीपी रोड, बीड. येथे उद्या शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अवघ्या एक तासाचे सेशन आयोजित केले आहे. यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थांच्या वतीने पत्रकारांसाठी खास रक्षाबंधनाचा कार्यक्रम होणार आहे.जॉईन होणार्‍या शिबिरार्थीने मास्क घालने बंधनकारक आहे.कोवीडचे सर्व नियम निकष पाळून सदरील शिबिर होणार आहे. राजयोगाद्वारे मेडिटेशन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरा नंतर शरीरातील ह्युमॅनिटी पावर तसेच आत्म मनोबल निश्चितपणे वाढून आत्मिक सुख शांतीचा मार्ग सापडेल,असा विश्वास या शिबिराच्या संयोजिका बालब्रह्मचारी प्रज्ञा दीदी यांनी व्यक्त केला आहे.यामुळे बीड जिल्ह्यातील तमाम प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियातील पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव विवेक स्वामी यांनी केले आहे.

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीच्या वतीने आर्ट अॉफ लिव्हींगच्या मराठवाडयातील पहील्या ज्ञानमंदीर उभारणीस पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देणगी सुपूर्द. ;- चेतन सौंदळे


परळी वैजनाथ( प्रतिनिधी)  प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत आर्ट अॉफ लिव्हींगचे संस्थापक गुरूदेव श्री.श्री.रवीशंकरजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मराठवाडयातील पहीले भव्य ज्ञानमंदीर उभारण्यात येणार आहे सदरील ज्ञानमंदीर बांधकाम उभारणीस  राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळी-वैजनाथच्यावतीने एकेवीस हजार रूपयाची देणगी चेकद्वारे बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व विशेष सहाय्यमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते  तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,सचिव संतोष पंचाक्षरी सर्व पदाधिकारी व सदस्यांच्यावतीने आर्ट अॉफ लिव्हींगकडे सुपूर्द करण्यात आली.
  *ज्ञान तपस्वी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी द्वादश ज्योतीर्लिंग क्षेत्र प्रभू वैद्यनाथ मंदीर समोरील जागेत 82 वे श्रावणमास तपोनुष्ठान केले होते सदरील जागेच्या पाठीमागेच आर्ट अॉफ लिव्हींगच्या जागेत ज्ञानमंदीराची उभारणी केली जाणार आहे.
   *समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी महाराजांनी श्रावणमासातील 21 दिवसाचे 84 मौन तपोनुष्ठान केले आहेत.विज्ञान आणि अध्यात्म याची योग्य सांगड घालून त्याचा विश्व कल्याणासाठी अखंड प्रसार आणि प्रचार केला.
  जागतिक पातळीवर लाखो युवकांमध्ये नेतृत्वगुण,व्यक्तिमत्तव *विकास,सकारात्मकता,*ताण-तणाव व व्यसनमुक्ती तसेच आत्मबल निर्माण करण्यासाठी प्राणायाम,ध्यानशिबीरे व ज्ञानसत्रे आयोजित करण्यासाठी गुरूदेव श्री.श्री. रवीशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट अॉफ लिव्हींग परीवाराच्यावतीने ज्ञानमंदीराची उभारणी केली जात आहे.
 *शिवैक्य राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी ष.ब्र.राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराजांकडून अशाप्रकाच्या उपक्रमास चालना देण्यात येत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपोनुष्ठान समितीच्यावतीने ज्ञानमंदीरास देणगी देण्यात आली आहे.
  *याकरिता राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष नगरसेवक चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष शाहूराव ढोबळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,रमेशअप्पा सपाटे,वैजनाथ बागवाले,महेश निर्मळे,गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी,सोमनाथ निलंगे,मकरंद नरवणे,नंदकुमार खानापुरे,सदानंद चौधरी,दत्ताअप्पा चिल्लरगे,जगदीश मिटकर,दयानंद चौधरी,अशोक नावंदे,अरविंद चौधरी,सचिन काटकर,संजय खाकरे,ओमप्रकाश बुरांडे,सोमनाथ गोपनपाळे,चंदूअप्पा हालगे,बबन शेटे,रवी मिसाळ,प्रा.अमर आलदे,दिलीप झुंजे,अॅड.गिरीष नरवणे,राजाभाऊ हलकंचे,शिरीष सलगरे,मन्मथ नरवणे,अनिल चौधरी,नरेश साखरे,रमेश काळे,बाबासाहेब शिगे,नागेश अलबिदे,शिवशंकर नाईक,शरद घनचेकर,संतोष चौधरी,योगीराज बर्दापुरे,प्रकाश खोत,गजानन हालगे,मनोज बेबळगे,जयप्रकाश स्वामी,रत्नेश बेलुरे,निरंजन गौरशेटे,कैलास रिकीबे,पिंटू चौधरी,अमोल घेवारे,संदीप चौधरी,बालाजी चीडबुके,हनुमंतअप्पा घेवारे,दीपक कापसे,अतुल खके,चंद्रकांत अंदुरे,अनिल मिसाळ,श्रीकांत खोत यांच्यासह सर्व समाज बांधव,पदाधिकारी व सदस्यांनी योगदान दिले आहे.

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशीभविष्य - 19 ऑगस्ट 2021; कन्या राशीसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस.



मेष 

 

आज आपण आपला संताप काबूत ठेवा. कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव जाणवेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही... आणखी वाचा

वृषभ 

कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा बोझा वाढेल त्यामुळे मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. नवे काम आज सुरू न करण्याचा सल्ला... आणखी वाचा

मिथुन 

शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहनसुख मिळेल... आणखी वाचा

कर्क 

आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. कुटुंबातील व्यक्तीं समवेत घरात सुख- समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्री वर्गांशी आनंदी बातचीत कराल... आणखी वाचा

सिंह

लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयात यश आणि प्रिय व्यक्तींशी सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल... आणखी वाचा

कन्या 

आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. घरातील व्यक्तींशी पटणार नाही. त्यामुळे घरात शांतता राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

तूळ 

शुभ वा धार्मिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल... आणखी वाचा

वृश्चिक 

कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनात येणारे नकारात्मक विचार हद्दपार करा अशी सूचना. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील... आणखी वाचा

धनु 

आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल. आर्थिक लाभ होतील. तीर्थयात्रा कराल. सगेसोयरे व मित्रांच्या येण्याने मन खुश राहील. दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील. मान- मरातब वाढेल... आणखी वाचा

मकर

आज सावधानतेने वागण्याचा सल्ला. कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. तब्बेतीची तक्रार राहील. दुर्घटनेपासून सावध राहा... आणखी वाचा

कुंभ 

आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल. नोकरी- व्यवसायात लाभ प्राप्ती. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे... आणखी वाचा

मीन

नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज आपणाला अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार्‍यांना व्यापारवृद्धी होईल आणि उर्वरित रक्कम प्राप्त होईल... आणखी वाचा

Tuesday, August 17, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशि भविष्य !


मेष

श्रीगणेश सांगतात की आज सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींत संपर्क साधाल. गूढ, रहस्यमय विद्या आणि गाढ चिंतनशक्ती आपला मानसिक भार हलका करील. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी चांगला योग आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रू आपली हानी करतील. नवीन कार्य सुरू करू नका.

वृषभ 

श्रीगणेश कृपेने आपल्या जीवनसाथीच्या जवळीकीचे सुख प्राप्त होईल.कुटुंबीयांसमवेत सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे घडेल. त्यामुळे वेळ आनंदात जाईल. शरीर आणि मनाला प्रसन्न वाटेल. सार्वजनिक जीवनात यश आणि कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून वार्ता मिळतील.

मिथुन

अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य राहील. कामात यश आणि कीर्ती लाभेल. इतरांशी बातचित करताना रागावर ताबा ठेवा आणि मितभाषी राहा म्हणजे मतभेदाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. नोकरदारांना लाभ होईल.

कर्क

शांतपणाने दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमिकांमध्ये वादविवाद झाल्यामुळे रुसवे- फुगवे होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण किंवा कामुकता आपणाला संकटात टाकेल. त्या दृष्टीने लक्ष द्या. नवीन कार्यारंभ अथवा यात्रा न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

सिंह

श्रीगणेश सांगतात की मानसिक अस्वस्थता राहील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करायला दिवस योग्य नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गापासून जपून राहा.

कन्या

विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा श्रीगणेश देतात. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भाऊ- बहिणींशी ताळमेळ जुळेल. मित्र आणि स्नेह्यांशी संवाद घडतील. गूढ, रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आणि त्यात सिद्धी प्राप्त होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.

तुळ

आज मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम राहणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांशी मतभेद होतील. नाहक खर्च होईल. तब्बेत बिघडेल. मनात ग्लानी निर्माण होईल. अनैतिक प्रवृत्तीकडे न वळण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबातील व्यक्तींशी वागण्यात दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील प्रिय व्यक्तींशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ आणि प्रवासाचे योग आहेत. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल.

धनू

आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे भांडणाचे कारण ठरेल. दुर्घटनेपासून जपा. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचला, असे श्रीगणेश सांगतात. निरुपयोगी कामांवर आपली ताकत खर्ची पडेल.

मकर

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तींशी मुलाखत रोमांचक बनेल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्‍यांना धंद्यात आणि नोकरदारांसाठी नोकरीत उत्पन्न वाढेल. गृहस्थीजीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.

कुंभ

प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. नोकरी- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. तब्बेत चांगली राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढतीचे आणि धनप्राप्तीचे योग आहेत. गृहस्थीजीवन आनंदी राहील आणि मानप्रतिष्ठा वाढेल.

मीन

भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने निराशा पैदा होईल. नशिबाची साथ नाही असे वाटेल. कार्यालयात अधिकारी वर्गाशी काम करताना जपून वागण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. संतती हे आजच्या चिंतेचे कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.

जनआर्शिवादयात्रेत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पंकजाताई मुंडे कार्यकर्त्यांनवर रागावल्या.








बीड  (प्रतिनीधी)  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे या आपल्या कार्यकर्त्यांवर भडकल्या आहेत. पंकजा मुंडे जनआशीर्वाद यात्रेसाठी उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, यातील काही घोषणा ऐकून पंकजा मुंडे खूप रागावल्या. पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, या घोषणेवर पंकजा मुंडे यांनी थेट बाहेर येऊन कार्यकर्त्यांना इशारा दिला.

अशा अंगार भंगार सारख्या गलिच्छ घोषणा कुणी देत असेल, तर मी त्याला आयुष्यात भेटणार नाही, मुर्ख कुठले, तुमच्या अशा वागण्याने त्रास होतो, अशांना मी कधीच भेटणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

तसेच गोपीनाथ मुंडे अमर रहे, या घोषणा तुम्ही देऊ शकतात, कारण तुमचे गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम आहे, त्यात मला काय कुणालाच आड येता येणार नाही, पण अंगार भंगार सारख्या घोषणा देऊ नका, अशा लोकांना मी आयुष्यात भेटणार नाही.आशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना  खडसावले.

Monday, August 16, 2021

श्रावणी रामेश्वर कोकाटे हीचा वाढदिवस साजरा .

परळी वैजनाथ -- संगम येथील श्रावणी रामेश्वर कोकाटे हीचा वाढदिवस 15 ऑगस्ट  स्वतंत्रदिन या दिवशी संगम ग्रामपंचायत कार्यालय येथे  ध्योजारोह संपन्न झाल्यावर श्रावणी रामेश्वर कोकाटे हीचा वाढदिवस सरपंच सौ. वच्छालाबाई कोकाटे उपसरपंच गंगाधर नागरगोजे,ग्रामपंचायत सदस्य देवीदास रोडे, अनिल कामाळे,युनुस बेग,रूक्षराज नागरगोजे, हानुमंत कामाळे, ग्रामसेवक आनिल रोकडे, पोलिस पाटील पांडुरंग रोडे, माजी सरपंच वसंत गायकवाड, माजी सरपंच सौ ज्योती रामेश्वर कोकाटे, आशा कार्येकर्ते सौ.वर्षी कोकाटे, यांच्या सह  ग्रामस्थांच्या उपस्थित वाढदिवस साजरा करण्यात आला जि.प.शाळेचे मुख्याध्यापक नावंदे सर शिक्षक फड सर, किटाळे सर, गित्ते सर खिंडारे सर,   यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्वांनी श्रावणीला आर्शीवाद दिला

संगम ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच वच्छलाबाई कोकाटे यांच्या हास्ते ध्वजारोहन संपन्न.

परळी - संगम ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्योजारोह करतांना सरपंच सौ वच्छालाबाई कोकाटे यांच्या हस्ते ध्योजारोह संपन्न या वेळी उपसरपंच गंगाधर नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, देविदास रोडे, आनिल कामाळे, हानुमंत कामाळे, रूक्षराज नागरगोजे,ग्रामसेवक आनिल रोकडे,  पोलिस पाटील पांडुरंग रोडे, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक व आशा कार्येकर्ती वर्षी बबन कोकाटे, अंगणवाडी शिक्षिका निर्मलाताई नागरगोजे, व  मायाताई रोडे, ऑपरेटर वैजनाथ मस्के, रोजगार हमी योजना सेवक लक्ष्मण केंद्रे  गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्योजारोह करण्यात आला व कोकाटे महाराज यांनी सर्वाना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या

माऊली पंढरीनाथ मुंडे यांचा संगम ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी  तालुक्यातील संगम गावचे भुमिपुञ माऊली पंढरीनाथ मुंडे यांना महा वितरण लातुर  विभागाचा विभागीय  उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाल्या बद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने व संगम ग्रामपंचायतच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने भुमीपुञाचा गौरव करण्यात आला  काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य  साधून माऊली मुंडे यांना शाल श्रीफळ फेटा व पांडुरंगाची प्रतीमा भेट देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला तर या सत्कार प्रसंगी उपस्थित संगम सरपंच वच्छालाबाई कोकाटे, उपसरपंच गंगाधर नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, आनिल कामाळे, देविदास रोडे, हानुमंत कामाळे, रूक्षराज नागरगोजे, शाळेचे मुख्याध्यापक नावंदे सर, शिक्षक फड सर,किटाळे सर, गित्ते सर,खिंडारे सर,गावचे पोलिस पाटील पांडुरंग रोडे,प्रल्हाद मुंडे, माजी सरपंच वसंत गायकवाड,  सजन गिराम, ग्रामसेवक आनिल रोकडे, वैजनाथ मस्के, लक्ष्मण केंद्रे, यांच्या उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला  माऊली मुंडे आण्णा यांना उत्कृष्ट कर्मचारी विभागीय  पुरस्कार मिळाल्या बद्दल संगम चे नाव विभागात नाव लौकिक  माऊलींनी केले माऊलींचे कार्य कौतुकास्पद आहे आसे कोकाटे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले  माऊली नेहमी आपल्या कामाशी एकरूप होऊन काम करतात आपले कर्तव्य निभावत आस्तांना कोनाचाही फोन येऊ द्या माऊली लगेच आडचन सोडवतात पुढील व्यक्तीला आपल्या कामातून माऊलींनी   दाखऊन दिलेले आहे  त्या मुळेच माऊलींची दखल लातुर विभागाने घेतली व 15ऑगस्ट रोजी माऊलींना  पुरस्कार मिळाला त्या बद्दल संगम गावातील नागरिकांनी नागरी सत्कार ग्रामस्थानी केला  सत्काराला उत्तर देतांना माऊली म्हणाले कि माझा हा सत्कार माझ्या गावक-यांनी सत्कार  केला हा सत्कार माझा नसुन हा गावचा सत्कार आहे त्यातुन मि कधीही रून मुक्त होऊ शकत नाही हा सत्कार माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार आहे या पुढेही मि काम करेल व करीत राहील तुमचा आशिर्वाद सदैव राहुद्या मि आधीक चांगले काम करण्याची मला या सत्कारातुन उर्जा मिळेल माझे मन भरून आले  कोकाटे महाराज यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Sunday, August 15, 2021

परळीचा हिरा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) देशातील युवकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी मूळचा परचुंडी ता परळी येथील व सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या सौरभ नावंदे याला सन 2017-18 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सन 2017-18 व 2018-19 च्या राष्ट्रीय युवा पुरष्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्रालय सचिव उषा शर्मा व संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वय डियर्ड बायोडड उपस्थित होत्या.
    या कार्यक्रमात सन 2017-18 साठी 14  व 2018-19 साठी 8अशा 22 पुरस्काराचे वितरण करण्यात आले यात सौरभला सन 2017-18 च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने रु एक लाख ,पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
      सौरभ नावंदे याने 2017 मध्ये  क्वालालंपूर येथे आयोजित ’राष्ट्र मंडल युवा शिखर संमेलनात’ आणि 2018 मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित ’संयुक्त राष्ट्र सभेत’ भारताचे प्रतिनिधित्व केले.त्याला महाराष्ट्र शासनानेही यापूर्वी युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 दरम्यान महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सौरभचे अभिनंदन केले.तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा धनंजय मुंडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खा.प्रीतमताई मुंडे यांच्यासह अनेकांनी  सौरभचे अभिनंदन केले.
सौरभ हा सेवानिवृत्त क्रीडाधिकारी सुभाष नावंदे व  औरंगाबाद जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांचा मुलगा असून, प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे व आदर्श शिक्षक अशोक नावंदे ,सामजिक कार्यकर्ते रामलिंगआप्पा नावंदे यांचा तो पुतण्या आहे.सौरभला या राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित  करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

----------------*फोटो -1 कॅप्शन*
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते  राष्ट्रीय युवा पुरस्कार स्वीकारताना सौरभ नावंदे या वेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वय डियर्ड बायोडण्ड दिसत आहेत.

*फोटो -2 कॅप्शन*
दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात सहकुटुंब सौरभ चे अभिनंदन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी डावीकडून सर्वेश नावंदे, कविता नावंदे, रुतुजा नावंदे, सुभाष नावंदे युवा क्रिकेटपटू भुषण भीमाशंकर नावंदे दिसत आहेत

Saturday, August 14, 2021

बीड जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 10 पर्यंत सुरू राहणार.जिल्हधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे नवीन आदेश.



बीड ( प्रतिनिधी ) ब्रेक द चैन अंतर्गत जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी आज नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. सदर आदेशाची  दि.15 ऑगस्ट पासून अंमलबजावणी होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आजच्या आदेशात म्हटले आहे की, 

उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे . 

i ) उपहारगृह / वारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल क्याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल , 

 

ii ) उपहारगृह बारमध्ये काम करणार आचारी , वालपे , व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचान्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / चारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल . ml ) वातानुकूलित उपहारगृहाबार असल्यास , वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल .iv ) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल . 1 ) उपहारगृह बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी . vi ) उपहारगृह ) बारमध्ये निजतुकीकरणाची तसेच सनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल उपरोक्तनुसार उपहारगृहे / यार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत मुभा देण्यात येत आहे . DISTRIC S COM उपहारगृह / वारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९ .०० वाजेपर्यंत घ्यावी . मात्र पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . 

 

2. दुकाने - जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन कर्मचान्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

 

 3.शॉपिंग मॉल जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . तथापि , शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणान्या सर्व नागरिकांचेही कोबिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील . 

 

4. जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून - स्या वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून स्मा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . तथापि , उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास , वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील . 

 

5. इनडोअर स्पोटर्स - इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोबिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील तसेच , या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील . या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन , टेबलटेनिस , स्क्वंश , पैरलल बार , मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे . 

 

6. कार्यालय / ओद्योगिक / सेवा विषयक आस्थापना - सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी , बैंक कर्मचारी , रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे , ii . ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचान्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचान्यांना धरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनाच्या व्यवस्थापनानी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचान्यांच्या गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे . तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील . 

 

7. जिल्हयातील सर्व मैदाने , उद्याने ,   स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील . iii . 63 1 . ii . iii . iv . LECT 8. विवाह सोहळे खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किया बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोथिंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पानन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणान्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किया लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल , बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल . मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी विडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहिल्न , या निबंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयावर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल . मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बैंडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व सलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील . 

 

9. सिनेमागृहे ब मल्टिप्लेक्स - जिल्हयातील सिनेमागृह / नाट्यगृह , मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील . 

 

10. धार्मिक स्थळे जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील . 

 

11. आंतरराज्य प्रवास - ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल , अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वाची आरटीपीसीआर चाचणी निगेटीक किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल . V. तसेच मो SANCE OF 

 

12 कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे . यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस , राजकीय , धार्मिक , सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम , निवडणूक प्रचार सभा , रॅली . मार्च , इ . बरील निबंध कायम राहतील , 

 

13. मेडीकल ऑक्सीजनधी उपलब्धता मर्यादीत असल्याने , जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोवीड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन 700 मे . टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण राज्य शासनाकडुन जिल्हयात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निबंध लागू करण्यात येतील . 

 

14. जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की , मास्कचा वापर हातांची स्वच्छता , शारिरीक अंतराचे पालन , इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ . सर्व निबंधाचे पालन करणे अनिवार्य राहिल .

*सदैव स्मरणात आदरणीय तुपरे गुरूजी*

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तूपरे गुरुजी यांचे बीड आंबेडकरी चळवळीतील योगदान अतुलनीय आहे, गोर गरीब मुलांना गुरूजींनी शिक्षण देऊन आधार देऊन नवजीवन दिले आहे. अतिशय खडतर प्रयत्नांमुळे गुरुजिंचा उत्तरार्धात sp ऑफिस समोर सुखाचा बंगला दिसत होता. त्यांची नातवंडे उच्च शिक्षित असून समाजकार्यात भरीव योगदान देताहेत. चळवळीत, व्यक्तिगत आयुष्य जगताना सुखदुःखाच्या प्रत्येक वळणावर गुरुजी तुमची आठवण येईल, तुमची कमी भासेल माझे आजोळ घोडकीचे शिंदे परिवार मी स्वतः अक्षय नामदेव बचुटे गोटेगावकर, सर्व कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवार आणि आंबेडकर चळवळीतील सर्व सहकारी कार्यकर्ते तूपारे कुटुंबियांच्या दुःखात सम प्रमाणात सहभागी आहोत. गुरुजींचा मुलगा बीड सेशन कोर्टा, औरंगाबाद हाय कोर्ट  ऍड.उदय तुपारे यांच्या भावी आयुष्यात प्रत्येक चढउतार अडचणी मध्ये आम्ही सर्वच जण सोबत आहोत हीच गुरुजींना भावपूर्ण आदरांजली 💐🙏🏻

Friday, August 13, 2021

खा.सुप्रियाताई सुळे व मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानांच्या मशीन)चे होणार वाटप ; शिबीरास उपस्थित राहावे- डॉ. संतोष मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :  खा. सुप्रियाताई सुळे व  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते 585 गरजू व्यक्तींनासाठी अंदाजे 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल  श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबिराचे उद्घाटन आज शनिवार, 14 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी पुर्व तपासणी झालेल्या रूग्णांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय मुंडे आरोग्य मित्र  योजनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिबीर संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे. 
             शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराजरंग मंदिर येथे  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.14, 15 व 16 आँगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा आरोग्य विभाग, बीड, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्टारकी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून 585 प्रत्येक व्यक्तीसाठी  अंदाजे 25 हजार रूपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कनाची मशीन) वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन खा.सुप्रियाताई सुळे यांची आँनलाईन उपस्थिती व  पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शिवकन्याताई सिरसाट, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, गटनेते वाल्मिक आण्णा कराड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कानेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद काळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीडचे सचिन मडावी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड,  उपजिल्हाधिकारी सौ.नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नगरसेवक चंदुलाल बियाणी,  जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव, नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते, माजी नगराध्यक्ष दिपक (नाना) देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली गडदे, संजय गांधी निराधार समितीचे चेअरमन राजाभाऊ पौळ, ज्येष्ठ नेते तुळशीराम पवार, सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. विनोद जगतकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद सिराज यांची उपस्थिती राहणार आहे. दिनांक 6 व 7 मार्च 2020  रोजी झालेल्या कर्णबधिर रुग्णांच्या मोफत डिजिटल श्रावण यंत्र वाटप पूर्व तपासणी शिबिरात परळी तालुका व परिसरातील सुमारे चारशे 1842 कर्णबधिर रूग्णांनी लाभ घेतला होता.  त्यामध्ये 585 कर्णबधिर मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 6 व 7 मार्च 2020 रोजीच्या शिबीरात तपासणी झालेल्या अशाच गरजुवंतांना मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात होणार  आहे. तरी  मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा गरजुवंतांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिबीराचे संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे (98222805) यांनी केले आहे.

Thursday, August 12, 2021

बीड जिल्ह्यातील पाचशे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि बीडीओ ना नोटीस !!


जिल्ह्यातील पाचशे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि बीडीओ ना नोटीस !!

बीड – पंचायत समिती मध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची उचलबांगडी थेट न्यायालयाने केल्यानंतर प्रशासन जागे झाले .बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तब्बल पाचशे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत .एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटिसा बजवल्याने खळबळ उडाली आहे .

बीड जिल्ह्यात परळी,बीड,अंबाजोगाई, केज,माजलगाव, वडवणी, शिरूर,धारूर,गेवराई, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यात 2010 ते 2020 या दहा वर्षात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवकांना त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा उल्लेख असून त्यावर तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या नरेगाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासोबतच ज्या कामाच्या ऑडिटनंतर काम नियमबाह्य झाले असल्याचे पुढे आले होते. त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक तसेच रोजगार सेवकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत यानंतर या नोटिशीला तीन दिवसात उत्तर मागितले आहेत.

नरेगाच्या कामामध्ये घोटाळ्याच्या तक्रारी होणे ही काही नवी बाब नाही मात्र या संदर्भामध्ये प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही म्हणूनच अखेर राजकुमार देशमुख यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विशेष म्हणजे याच कामात तपासणीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करा असा आदेश काढला होता.

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात म्हणजे गेवराई, आष्टी, पाटोदा,शिरूर,केज, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई, परळी आणि वडवणी या अकरा ही तालुक्यातील पंचायत समिती मार्फत या ग्रामपंचायत सरपंच ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामसेवकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची की पहिलीच वेळ असावी.

केज तालुक्यातील गोटेगाव हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री संबंधित गुन्हा दाखल करणे बाबत निवेदन.


केज  (प्रतिनिधी) केज तालुक्यातील गोटेगाव येथे अवैध दारू विक्री सुरू आहे बिभिषेन भास्कर बोराडे  उर्फ बाबा बोराडे यांना अनेक विनंत्या विनवण्या करूनही त्यांनी ऐकले नाही व गावाचे,समाजाचे अतोनात नुकसान होत आहे ते काही गेले भरून निघू शकत नाही शाळकरी मुले आज दारूचा व्यसनाधीन होत आहेत या बाबीचा साहेबांनी गांभीर्यपूर्वक विचार करून सुदर बाबीवर विचार करून आमच्या विनंतीला मान देऊन समाजकंटक कृत्यास आळा कायद्याने घालून दारूविक्री दुकानदार बाबा बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच गावातील त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरपंच, उपसरपंच यांनाही सहगुन्हेगार करण्यात यावे, तसेच गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, कोतवाल या समाज विघटनाच्या कार्याला न बोलता पाठिंबा देतात 
गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र निदर्शनास सह आणण्याची तयारी आम्ही आहे असे ज्योती  बोराडे, जयश्री बोराडे यांनी सांगितले.

डि.सी.सी.च्या शंभर रुपयात एटीएम देण्याच्या निर्णयाने शेतकरी दलालमुक्त होणार - अँड. अजित देशमुख


बीड ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना डिसीसी बँक आता फक्त शंभर रुपयात एटीएम कार्ड देत आहे. अनुदान, विमा, पीक कर्ज, ठेवी उचलण्यासाठी आता शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. शिवाय या रकमा पूर्वी शे-पाचशे रुपये दलाली देऊन दिल्या जात असल्याची ओरड व्हायची. आता शेतकऱ्यांना बँकेत न जाता पैसे कोणत्याही एटीएम मधून मिळतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता बँकेतून एटीएम घ्यावे, असे आवाहन जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

           बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहा लाख खातेदार आहेत. या खातेदारांची वारंवार पिळवणुक होत होती. अनुदानाची रक्कम असेल की, विम्याची प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या घटना घडत होत्या. दलाली होत असल्याचा आरोप देखील वारंवार केले जात होते. आता या सर्व आरोपांना बगल मिळणार आहे. हजारो दलाल हे उघड्यावर पडणार आहेत. त्याच बरोबर बँकेचे कर्मचारी या बरोबर भरडले जात होते. ते देखील या आरोपातून मुक्त होतील.

         खातेदाराला ज्या बँकेत आपले खाते आहे, त्या बँकेत जाऊन एटीएम साठी फॉर्म भरून द्यायचा आहे. हा फॉर्म दिल्यानंतर दोन दिवसात एटीएम मिळेल. आणि त्यानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बँक देखील सज्ज राहील. बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक देखील होणार नाही. कोणत्याही एटीएम मधून शेतकऱ्यांना हवी तेवढी रक्कम हवी त्यावेळेला काढून घेता येईल.

             केवळ शंभर रुपयांमध्ये एटीएम देणारी ही एकमेव बँक असू शकते. एकदा ते घेतल्यानंतर पुन्हा घेण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता नसते. म्हणून शेतकऱ्यांनी आता तक्रार तक्रार न करता बँकेत जाऊन फॉर्म भरून एटीएम घ्यावे. म्हणजे कधीही पिक विमा, पिक कर्ज उचलायचे असेल कसलेही अनुदान आले असेल अथवा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी किंवा अन्य कोणतीही रक्कम आपल्या खात्यात जमा झाली असेल तर ती बँकेत न जाता कधीही शेतकऱ्याला बाहेरच्या बाहेर उचलता येईल.

           यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून दलालांकडून घेतली जाणारी रक्कम देखील इथून पुढे द्यावी लागणार नाही. याबाबतचे परिपत्रक बँकेने जारी केले असून या धोरणामुळे बँकेचे व्यवहार त्याच पद्धतीने होतील. ग्राहकांना गरजेनुसार, पाहिजे तेव्हा, पाहिजे ती रक्कम, कुठूनही काढता येईल. बँकेची आणि शेतकऱ्यांची दोघांचीही दलालीच्या आरोपातून सुटका होणार आहे.दलाल प्रत्येक गावात आहेत, अशाही तक्रारी होत्या. त्यामुळे या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत करणे आवश्यक आहे.

           सध्या बँकेत पी.एम. किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून यानिमित्ताने शेतकऱ्यांनी एटीएम कार्ड घेऊन कायमस्वरूपी वापर करावा. याच बरोबर साठ वर्षावरील खातेदारांना रोखीने रक्कम देण्याचा आदेश देखील दिला आहे. मात्र शेतकऱ्यांनी एटीएमनेच रक्कम उचलून कायमस्वरूपी फायद्यात रहावे. बँकेच्या या निर्णयाबद्दल मंडळाची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जन आंदोलनातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

           या निर्णयामुळे दलालीचा धंदा करणारी मोठी यंत्रणा बाधित होणार आहे. त्यामुळे या यंत्रणेकडून वेगळ्या पद्धतीने एटीएम चा निर्णय थांबवण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ एटीएम घ्यावे, असे आवाहन देखील अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

----------
चौकट
----------
★ शेतकऱ्यांना दलाल मुक्त होण्याची संधी
★ बँकेचा कॅशलेस व्यवहार फायद्याचा ठरेल
★ शेतकऱ्यांचे बँकेतील हेलपाटे होणार बंद
★ केवळ शंभर रुपयात एटीएम मिळणार
★ सहा लाखावर खातेदारांना फायदा
★ दलाल याविरोधात आवाज उठवतील ?
-------------