Friday, January 31, 2020
अखिल भारतीय 6 व्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन.* पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे,आ. प्रकाश सोळंके,आ. संजय दौंड,मा. आ. पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती. स्वागताध्यक्षा;- शिवकन्या सिरसाट
मुकनायक शताब्दी पुरस्कार सोहळाडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकच्या माध्यमातून उपेक्षितांच्या आवाजाला वाचा फोडली-पो.नि.बाळासाहेब पवारपत्रकारांनी सत्यता पडताळून वृत्त प्रकाशित करावे-सौ.सरोजिनीताई हालगे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतीय राज्यघटनाच लिहिली नाही तर अनेक क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. पाक्षिक मूकनायक सुरु करुन बाबासाहेबांनी उपेक्षितांच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम केले असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करतांना नगराध्यक्षा सौ.सरोजिनीतार्ई हालगे यांनी पत्रकारांनी सत्यता पडताळून वृत्त प्रकाशित करावे असे आवाहन केले. मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झाला. कार्यक्राच्या सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक प्रतिज्ञा देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजिनीताई हालगे होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. ग्रामिण पोलिस ठाण्याचे पो.नि.प्रदिप त्रिभवन, निवासी नायब तहसिलदार क्षितिजा वाघमारे, पोलिस सहाय्यक निरीक्षक आरती जाधव, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा जाधव, प्रा.दयानंद कुरुडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अनंत इंगळे यांनी तीन ग्रंथ तर गुरुदास आश्रमाचे दास महाराज यांनी ग्रामगिता पत्रकारसंघास भेट दिली.
यावेळी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणार्या पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रा.प्रविण फुटके, धनंजय आढाव, प्रा.राजु कोकलगावे, दत्ता काळे, जगदिश शिंदे, विठ्ठल साबळे यांचा मूकनायक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास चेतन सौंदळे, प्रा.विलास रोडे, अनंत इंगळे, डॉ.ऐश्वर्या जाधव, इंजि.जयवर्धन सुर्यवंशी, फुले आंबेडकर अभ्यासक जयपाल कांबळे, दास महाराज, सुनिल धिमधिमे, बापु गायकवाड, संपादक राजेश साबणे, संजय खाकरे, प्रेमनाथ कदम, धनंजय आरबुने, सचिन वंजारे, अॅड.कपिल चिंदालिया, महादेव गित्ते आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, शहराध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धिरज जंगले, मोहन व्हावळे आनंद तुपसमुद्रे,विकास वाघमारे ,आकाश देवरे,महेश मुंडे,बाबा शेख,गणेश आदोडे व पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवान साकसमुद्रे यांनी केले. सुत्रसंचालन रानबा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन अनंत गित्ते यांनी केले.
*'जल्लोष तरुणाईचा' : महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सांगता*
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नवगण महाविद्यालय येथे एच आय व्ही एड्स जनजागृती व तपासणी शिबीर.
गुरुवार रोजी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परळी शहरातील नवगण कॉलेज येथे एच आय व्ही एड्स जनजागृती व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात प्रथम तेथे जमलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक असे एकूण दीडशे लोक उपस्थित होते त्या सर्वांना एच आय व्ही एड्स संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर टीबी गुप्तरोग या आजारावर माहिती देण्यात आली व वयानुसार होणारे शारीरिक बदल व त्याचा शारीरिक व मानसिक परिस्थितीवर होणारापरिणाम पटवून देण्यात आला व त्यानंतर तपासणी करण्यात आली आजच्या शिबिरामध्ये 82 लोकांनी स्वतःची एच आय व्ही व सीबीसी ची तपासणी करून घेतली
दिव्या फाऊंडेशन "समाजमानव" पुरस्काराने सन्मानित .पुरस्कार स्वीकारताना अशोक काकडे सुनील तिजारे व मोरे.
Thursday, January 30, 2020
शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्ता स्थापनेस तयार . मा.ना. सुधीर मुनगंटीवार
दिनांक 2 फेब्रुवारी ला 'माऊली सेवा मंडळ नागपूर च्या वतीने झुणका भाकर महानैवैद्य सोहळा नागपुरात .अॕड प्रशांत समर्थ
*परळीत श्री संत मन्मथ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव थाटात साजरा.*वेदांताचार्य श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन.
सौ.राजश्री धनंजय मुंडें यांच्या वतिने परळीत हळदी-कुंकू समारंभ.
मकर संक्रांतीनंतर महिलांच्या स्नेहाचा, हळदी कुंकू व तीळ गुळासह स्नेहाच्या देवाण घेवाणीचा हळदी कुंकू समारंभ आज परळी येथील राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या पंढरी या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी मुंडे कुटुंबियांच्या वतीने सर्व महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ व वाण देऊन स्वागत केले.
यावेळी पंडित कल्याणजी गायकवाड प्रस्तुत सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. आज या हळदी कुंकू समारंभाचा पहिला दिवस असून परळी तालुक्यातील असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. तर या समारंभाचा उत्तरार्ध उद्या होणार असून उद्या शहरातील महिला सहभागी होणार आहेत. परळीतील महिला वर्गाने आमच्या कुटुंबावर भरभरुन प्रेम केले आहे, हा समारंभ म्हणजे आमच्यातील स्नेह वृद्धिंगत होण्याचे एक माध्यम आहे अशा शब्दात सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई शिरसाट, धनंजय मुंडे यांच्या भगिनी सौ. उर्मिलाताई केंद्रे, सौ. शकुंतला ताई केंद्रे, सौ. प्रेमिलाताई केंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर मुंडे कुटुंबियांच्या वतीने सौ. राजश्रीताई यांच्यासह सौ. मनीषा अजय मुंडे, सौ. सरिता विजय मुंडे, सौ. अमृता रामेश्वर मुंडे व सौ. सोनाली अभय मुंडे यांनी महिलांचे स्वागत करत हळदी कुंकू, वाण व तिळगुळ देऊन स्वागत केले.
जात-धर्म विसरून सरकारला ढसळलेल्या अर्थव्यवस्था बेकारी इत्यादी विविध प्रश्नावर जाब विचारा.;- डाॕ .राजेश इंगोले
Wednesday, January 29, 2020
परळी न.प.राष्ट्रवादी चे गटनेते मा.वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 251 न .प.कंत्राटी कामगारांना टिफिन चे वाटप .
CAA, NRCच्या विरोधात परळीत बेमुदत धरणे आंदोलन.आज चौथा दिवस . महिलांची लक्षणीय उपस्थिती .
परळी वै….
संविधान बचाव कृती समितीच्या वतिने परळीत
केंद्र सरकारने पारित केलेल्या CAA, NRC, व NPR च्या संविधानद्रोही कायद्याच्या विरोधात आज चौथ्या दिवशी हि आंदोलन चालु आहे.आजाद नगर येथील मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.लहान लहान मुलीनी CAA से आजादी,NRCसे आजादी,संविधानाचा जयघोषकरत आंदोलन परिसर दणाणुन सोडला होता.
26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन उभारण्यात आले आहे.या आंदोलनात विविध साहजिक संघटनांनी सहभाग नोंदवला आहे.
या आंदोलनात मुस्लीम समाजातील महिला,लहान लहान मुले मुली यांची उपस्थित लक्षणीय होती.CAA, NRCच्या संबंधित कायदे जो पर्यत केंद्र सरकार माघे घेणार नाही तो पर्यत हे बेमुदत आंदोलन चालुच ठेवण्यात येणार असल्याचे संविधान बचाव कृती समितीच्या वतिने सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय परमार,पवार क्षत्रिय समाजाचे महाअधिवेशन संपन्न .विविध ठरावांना मंजुरी .
राज्यात नव्या 22 जिल्ह्यांचा प्रस्ताव, लातूरमधून उदगीर, बीड मधुन अंबेजोगाईच नाव .
राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचं विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे.
/लातूर : राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचं विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होते.
अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. तर मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
लातूरमधून उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचालींना वेग
लातूर जिल्ह्यातील उदगीरला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण, व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत. आता सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्याने, उदगीर आता जिल्हा होण्याची चिन्हं आहेत.
उदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट हे तालुके त्यात समाविष्ट होतील, तर नळेगाव हा नव्याने तालुका होईल आणि नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा नव्याने तालुका होऊन उदगीरमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणी मुखेड देखील उदगीरला जोडता येऊ शकते. उदगीर जिल्हा करताना साधारणतः 60 किमी अंतरावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावांना तालुका म्हणून मान्यता दिली जाऊ शकतो.
कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव?
नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण
ठाणे जिल्ह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण
बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव
यवतमाळ जिल्ह्यातून पुसद
अमरावती जिल्ह्यातून अचलपूर
भंडारा जिल्ह्यातून साकोली
चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर
गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी
जळगाव जिल्ह्यातून भुसावळ
लातूर जिल्ह्यातून उदगीर
बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई
नांदेड जिल्ह्यातून किनवट
सातारा जिल्ह्यातून माणदेश
पुणे जिल्ह्यातून शिवनेरी
पालघर जिल्ह्यातून जव्हार
रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड
रायगड जिल्ह्यातून महाड
अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर
आज होणारा भारत बंद आम्हीं पाळणार नाहीत – व्यापारी महासंघ
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) सततच्या बंद चा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आज बुधवार रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत असे निवेदन परळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिले आहे.सरकार विरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्याला भोगावा लागतो. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत. असे निवेदनात म्हटले आहे.
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे,शिवाय मोठ्या मॉल्स संस्कृती,ऑनलाईन खरेदी मुळे व्यापारी आपल्या व्यवसायात तोटा सहन करत असून येथून पुढे होणाऱ्या कुठल्याही बंदमध्ये आम्ही व्यापारी सहभागी असणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे. पोलीस प्रशासनाने व शासनाने आम्हाला सुरक्षा द्यावी आणि दुकान चालू ठेवण्यासाठी सहकार्य करावे.तसेच काही अनुचित प्रकार झाल्यास बंद संघटनाना जवाबदार धरून होणारी नुकसान भरपाई त्यांच्याकडूनच शाससनाने भरून घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार,परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या निवेदनावर परळी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड यांच्यासह शहरातील शेकडो व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून बुधवारी परळी बंद मध्ये व्यापारी सहभागी नसून नेहमीप्रमाणे बाजारपेठ सुरू राहणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाकडून देण्यात आली आहे.
Tuesday, January 28, 2020
पत्रकारीतेतील मित्तभाषी व्यक्तीमहात्व ;- मा.श्री .संतोषजी जुजगर
मुकनायक शताब्दी महोत्सवा निमित्त परळी पत्रकार संघाच्या वतिने पुरस्कारांची घोषणा.
मान्यवरांच्या हस्ते दि.31 रोजी वितरण
परळी (प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली सुरु केलेल्या मुकनायक या वृत्तपत्रास यावर्षी शंभर वर्षे पुर्ण होत असुन मुकनायक शताब्दी वर्षानिमित्त परळी पत्रकार संघाच्या वतिने परळी शहरातील पत्रकारिता व छपाई क्षेत्रात कार्य करणार्या एबीपी माझा चे गोविंद शेळके,प्रा.रविंद्र जोशी,धनंजय आढाव,प्रा.प्रविण फुटके,प्रा.राजु कोकलगावे,दत्तात्रय काळे,जगदीश शिंदे,विठ्ठल साबळे या आठ जणांना दि.31 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मुकनायक या वृत्तपत्रास यावर्षी शंभर वर्षे पुर्ण होत असुन या निमीत्ताने वृत्तपत्रांच्या माध्यमातुन समाज जागृती करणार्या पत्रकारांचा व छपाई क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे दि.31 जानेवारी रोजी सकाळी 11 वा.होत असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पो.नि.बालासाहेब पवार यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सरोजिनी हालगे तर प्रमुख अतिथी म्हणुन निवासी नायब तहसिलदार डॉ.क्षितीजा वाघमारे,स.पोनि.आरती जाधव,डॉ.रविंद्र गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष आयुब पठाण,न.प.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,प्रा.दयानंद कुरुडे,औ.वि.केंद्राचे जनार्धन सुर्यवंशी,अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रा.विलास रोडे, फुले आंबेडकरी अभ्यासक जयपाल कांबळे,सामाजीक कार्यकर्ते चेतन सौंद॓ळे,संपादक सतिश बियाणी,बालासाहेब कडबाणे,प्रकाश सुर्यकर,रामप्रसाद गरड,राजेश साबने,ज्ञानोबा सुरवसे आदींची उपस्थिती राहणार असुन या कार्यक्रमात एबीपी माझा चे गोविंद शेळके,दै.पुढारीचे प्रा.रविंद्र जोशी,दै.दिव्य मराठीचे धनंजय आढाव,दै.सकाळ चे प्रा.प्रविण फुटके,दै.लोकमत टाईम्स चे प्रा.राजु कोकलगावे,दै.मराठवाडा साथीचे दत्तात्रय काळे,दै.बीड संकेत चे जगदीश शिंदे,मातोश्री ऑफसेट चे संचालक विठ्ठल साबळे या आठ जणांचा गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, शहराध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धीरज जंगले,निमंत्रक रानबा गायकवाड,मोहन व्हावळे,महादेव गित्ते,इंजि.भगवान साकसमुद्रे,महादेव शिंदे,सुनिल धिमधिमे,गणेश आदोडे,शेख बाबा,श्रीराम लांडगे, बालाजी ढगे आदींनी केले आहे.
विधानपरिषद सदस्य मा.संजय दौंड यांचा शपथविधी संपन्न .
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौड यांचा आज विधान परिषद सदस्य म्हणून मुंबईत सभापती राम राजे निंबाळकर यांच्या दालनात शपथविधी संपन्न झाला
यावेळी उपसभापती नीलम ताई गोरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण , माजी मंत्री पंडितराव दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी आर्थिक मदतीची घोषणा, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्पर कारवाई आणि रात्री १ वाजता पालकमंत्री म्हणून पहिली सही देऊन अवघ्या ४८ तासात त्यांना प्रत्यक्ष मदतीचे धनादेश वाटप! होय हे सत्य आहे!
आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित शासकीय ध्वजारोहनाच्या मुख्य कार्यक्रमात साक्षाळपिंपरी येथील त्या पाच अंध जणांना शासकीय मदतीच्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
समाजामध्ये दृष्टिहीन म्हणून वावरणाऱ्या निराधार यादव क्षीरसागर, विठ्ठलबाई क्षीरसागर, सम्राट क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे, या पाचही लोकांना प्रजासत्ताक दिनी आयोजित समारंभात हे धनादेश म्हणजे अनपेक्षित आणि सुखद धक्काच म्हणावा लागेल.
दोन दिवसांपूर्वी बीड येथील शासकीय विश्राम गृहात या 2 अंध कुटुंबातील 6 व्यक्तींनी सर्वांनी एकत्रित ना. मुंडे यांची भेट घेतली होती, त्यावेळी श्री. मुंडे यांनी समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एडके यांना निर्देशित करून दिव्यांग बीज भांडवल योजना व समाज कल्याण विभागाच्या शेष निधीतून भरीव आर्थिक मदत करण्याबाबत सूचित केले होते.
त्यानंतर काल (दि. २५) तब्बल रात्री एक वाजता सबंधितांना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या ‘अपंग कल्याण’ निधीतून प्रत्येकी एक लक्ष रुपये मदतीच्या आदेशावर पालकमंत्री म्हणून पहिली सही ना. मुंडे यांनी केली. तर त्याच परिवारातील सहावा सम्राट याला १८ वर्ष पूर्ण नसल्याने मदत निधी न देता त्याचा शिक्षण व पूरक खर्चसाठी शिष्यवृत्ती देण्याचेही घोषित केले आहे.
त्यानंतर आज ना. मुंडे यांच्या हस्ते त्या पाचही जणांना ध्वजारोहण समारंभात या मदतनिधीच्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे आज वाटप करण्यात आले. यावेळी श्री. मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी, समाज कल्याण अधिकारी श्री राजू येडके, आ. संदीप क्षीरसागर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या शिवाजी शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*धनंजय मुंडे यांच्या रूपाने नगद नारायण पावला – दृष्टीहीनांच्या भावना*
नारायण गडाच्या पायथ्याशी वास्तव्य असणाऱ्या व समाजाकडून कायम उपेक्षा मिळालेल्या त्या पाचही जणांनी पालकमंत्र्यांकडून इतक्या तत्परतेने मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करताना भावुक होऊन ‘मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला श्री. नगद नारायण पावले!” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या गतिमान कारभाराचे व त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तिमत्वाचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.
Monday, January 27, 2020
परळी मुंबई प्रवास झाला सुखकर परळी आगारातून सुरू केली सेमी स्लीपर बससेवा .
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मा.पंकजाताई मुंडे यांचे एकदिवशीय लाक्षणीक उपोषण .
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे यांचं उपोषण होणार आहे. या उपोषणासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. दरम्यान हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष जावं म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण असणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पंकजा मुंडे या उपोषणाला सुरुवात करतील. दिवसभर मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर लढा देणारे तज्ज्ञ मार्गदर्श करणार आहेत. दरम्यान, या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. उपोषणस्थळी मराठवाडा पाण्यापासून कसा वंचित राहिला आहे, याचं चित्रप्रदर्शन लावण्यात आलं आहे. वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिल्याचंही इथं नमूद करण्यात आलं आहे. दुपारी साडेतीन वाजता पंकजा मुंडे उपस्थितांना संबोधित करणार आहे.
" जिल्हा परिषद शाळा बोळींज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
Sunday, January 26, 2020
दै.मराठवाडा साथीच्या 40 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजीत बालधमाल 2020 चे थाटात उद्घाघाटन.
चे आयोजन करण्यात आले आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर उदघाटन संपन्न झाले. उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक सर, तहसीलदार डॉ.विपीन पाटील सर, नगराध्यक्षा सौ.सरोजिनिताई हालगे, दैनिक मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी,विजयप्रकाशजी तोतला, नायब तहसीलदार बी.एल.रुपणर, मंडळ अधिकारी श्री राजुरे, महादेव शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांत प्रचंड उत्साह आहे. ज्यू चार्ली आणि मिकी माऊस हेही विशेष आकर्षण ठरत आहे.
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री धनंजय मुंडे.
– *मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिला विश्वास*
बीड, दि. 26 ——- बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्रीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असा विश्वास देत जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करु या, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदि उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलाय. अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 जानेवारीपर्यंत आपले कर्जखाते आधारसंलग्न करुन घ्यावे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत व वेळापत्रकानुसार ही योजना पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सूचित केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, यापुढे भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे नागरिकांच्या मनात भारतीय संविधानातील मूलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची रुजवणूक होऊन जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, प्रत्येक सुजाण मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्याला विकासाच्या नवीन पर्वाकडे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने वाटचाल सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सैन्यदल भरतीचा लाभ घेऊन देशसेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. इंदु मिल येथील स्मारकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एकूण उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून त्यांनी राज्य शासनाचे विशेष आभार व्यक्त केले. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग यांचा उल्लेख करून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतवादन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. पोलिस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस, होमगार्ड, एनसीसी, सैनिकी शाळा, स्काऊट गाईड, आरएसपी, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यासह 17 प्लाटूननी संचलन करून त्यांना मानवंदना दिली. संचलनाचे नेतृत्त्व आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. द्वितीय कमांडर म्हणून जी. वाय, शेख यांनी काम पाहिले. पोलीस वाहन वज्र, आरसीपी वाहन, महिला दामिनी पथक, रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, सामाजिक वनीकरण विभागाचा चित्ररथ यांनी संचलनात सहभाग घेतला.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर, विद्यार्थ्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभाग प्रमुख, आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती संगिता धसे व ए. बी. शेळके यांनी केले.
वैद्यनाथ कारखाना येथे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
परळी वैजनाथ दि. २६…
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी येथे बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वैद्यनाथ कारखाना परिसरात खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधान उद्देशाचे वाचन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
काॕग्रेस किसान सेलच्या मराठवाडा सचिव पदी अॕड .डि.पी.कडबाने यांची नियुक्ती .
Saturday, January 25, 2020
मिलींद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा . जनजागृती रॕलीने झाला समारोप.
25जानेवारी,2020रोजी”राष्ट्रीय मतदार दिवस”साजरा करण्याचे प्रपत्र ,निवडणुक आयोग,भारत सरकार नवी दिल्ली यांनी जारी केल्याप्रमाणे,मिलिंद ज्यू.काॅलेज परळी येथे “राष्ट्रीय मतदार दिवस”दि.25जानेवारी2020 रोजी सकाळी 9ते 12या वेळात विविध स्पर्धाचें आयोजन करुन साजरा करण्यात आला.
सकाळी 9वाजता “मतदार जनजागृती रॅली” मिलिंद ज्यू.काॅलेजमधुन सुरु होऊन पेठ मोहला,नटराज रंग मंदिर,टाॅवर ,महिला काॅलेज मार्गे परत मिलिंद काॅलेज मध्ये विसर्जित झाली.या रॅलीला प्राचार्य के एन पवार यांनी हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करुन दिली. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थायांनी मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्या पार पाडण्याच्या विविध घोषणा दिल्या.विद्यार्थियांच्या हातात घोषणांचे व काॅलेजचे बॅनर्स होते.
रॅलीच्या विसर्जनानंतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
मतदार दिवसानिमित्त काॅलेजच्या मुलां-मुलींच्या रांगोळी स्पर्धा(घोषवाक्य),भाषण स्पर्धा(मी मतदान का ?करणार),निंबध स्पर्धा(मतदान करा,राष्ट्र बळकट करा)इ चें आयोजन करण्यात आले
या सर्व कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी प्राचार्य के एन पवार,प्रा सौ एस एम जगतकर ,प्रा बी डी फड,प्रा डि टी सोनोने,प्रा बेग एम आर ए,प्रा एस व्हि जाधव,प्रा एस डी डोंगरे,प्रा.सौ कर्हाळे मॅडम,प्रा सौ कांबळे मॅडम इ.नी परिश्रम घेतले.या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी संचालन नोडल आॅफिसर प्रा विलास रोडे यांनी केले

