Wednesday, January 29, 2020

आज होणारा भारत बंद आम्हीं पाळणार नाहीत – व्यापारी महासंघ


परळी वैजनाथ(प्रतिनिधी) सततच्या बंद चा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आज बुधवार रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत असे निवेदन परळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिले आहे.सरकार विरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्‍याला भोगावा लागतो. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत. असे निवेदनात म्हटले आहे.

सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे,शिवाय मोठ्या मॉल्स संस्कृती,ऑनलाईन खरेदी मुळे व्यापारी आपल्या व्यवसायात तोटा सहन करत असून येथून पुढे होणाऱ्या कुठल्याही बंदमध्ये आम्ही व्यापारी सहभागी असणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे. पोलीस प्रशासनाने व शासनाने आम्हाला सुरक्षा द्यावी आणि दुकान चालू ठेवण्यासाठी सहकार्य करावे.तसेच काही अनुचित प्रकार झाल्यास बंद संघटनाना जवाबदार धरून होणारी नुकसान भरपाई त्यांच्याकडूनच शाससनाने भरून घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार,परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या निवेदनावर परळी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड यांच्यासह शहरातील शेकडो व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून बुधवारी परळी बंद मध्ये व्यापारी सहभागी नसून नेहमीप्रमाणे बाजारपेठ सुरू राहणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment