Thursday, May 29, 2025

महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगावर अध्यक्षपदी मा.निवृत्त महिला.IAS,IPS, महिलांनची नियुक्ती करावी.- डॉ.राजेश सोनुने.

नागपूर (प्रतिनिधी) राज्यात महिला वरील अत्याचार, बलात्कार, आत्महत्या, शारीरिक शोषण च्या  अनेक घटना घडत आहे.व दिवसेंदिवस घटना वाढत आहे & घटनेस बळी पडत आहे.राज्यात महिला साठी  कठोर कायदा करण्याची आवशयकता आहे. महिला साठी कायद्यामध्ये कठोर कलमाची भूमिका घेतली तरच महिला वरील शोषण ला आळा बसेल.  राज्य महिला आयोग वर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नियुक्ती नको व हस्तशेप नको. राज्य महिला आयोग या वर निवृत महिला IAS, IPS, अध्यक्ष म्हणून अशा महिलांची नियुक्ती करावी व जिल्हा च्या ठिकाणी IPS महिला अधिकारी,महिला अधिकारी   व तालुका पातळीवर IPS महिला अधिकारी, महिला अधिकारी सोबत, वकील महिलांची  नियुक्ती करून त्वरित महिलांन चे प्रश्न सोडविता येतील  कुठल्याही अनुचित घडणेस बळी पडणार नाही व त्यांना लवकर न्याय मिळेल. **महाराष्ट्र लोक सेवा आयोग प्रमाणे राज्य महिला आयोग वर कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्ती ची नियुक्ती नको व हस्तशेप नको.राज्यात खूप कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आहे.राज्याच्या गृह विभाग मध्ये तर खूप महिला अधिकारी आहे व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून  त्याची ओळख ही अभिमानाची बाब आहे. महिला वरील  दैनंदिन होणारे अत्याचार,व शोषण बलात्कार, हुंडा बळी या सारख्या अमानुष पणे होणाऱ्या घटना बाबतीत कायद्यात कठोर कलमाची भूमिका घेऊन राज्यातील महिला व लाडकि बहीण सुरक्षित राहील. राज्य सरकार ची लाडकी बहीण सुरक्षित आहे .

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत संतांची पावले रोखणाऱ्या काम तत्काळ थांबवा - अभयकुमार (पप्पू) ठक्कर यांचा इशारा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदू धर्मातील आणि विशेषतः वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा आषाढी एकादशीचा महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम प्रशासनाने २६ मे पासून सुरू केले आहे. या निर्णयामुळे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या नगरीत येणाऱ्या संत गजानन महाराज, गुलाब महाराज, नामदेव महाराज यांच्यासह शेकडो पालख्या अडकल्या असून, टाळ मृदंगाच्या गजरात चालणाऱ्या वारीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला असल्याचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते श्री. अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर सांगून उड्डाणपुलाचे काम तत्काळ थांबवून, ते पालखी मार्ग मोकळा झाल्यानंतरच सुरू करावे, अशी ठाम मागणी ठक्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या प्रकारामुळे संताप व्यक्त करत, परळी शहराचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते श्री. अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. आषाढी एकादशी ही त्यांच्या श्रद्धेचा शिखरबिंदू आहे. वारी ही केवळ परंपरा नाही, ती आपल्या अस्मितेची चालती-बोलती साक्ष आहे. अशा वेळी प्रशासनाने मार्ग मोकळा ठेवण्याऐवजी अडथळे निर्माण करणे, हे असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. उड्डाणपुलाचे काम तत्काळ थांबवून, ते पालखी मार्ग मोकळा झाल्यानंतरच सुरू करावे, अशी ठाम मागणी ठक्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रशासनाने वेळेवर योग्य निर्णय न घेतल्यास, वारकरी भक्तांच्या भावना दुखावल्या जातील आणि याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला आहे.

अंबाजोगाई बसस्थानकात भीषण अपघात बसखाली चिरडून तरुणाचा मृत्यू.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) आज गुरुवार, दिनांक २९ मे रोजी सकाळच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एक दुर्दैवी अपघात घडला. एमएच १४ एमएच १७०१ या क्रमांकाच्या एस.टी. बसच्या खाली येऊन एक तरुण चिरडला गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मयत तरुणाचे नाव अंकुश मोरे (रा. धानोरा बु., ता. अंबाजोगाई) असे आहे. स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराने आतमध्ये प्रवेश करत असताना सदरील बसने अंकुश यांस चिरडले. अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत स्वाराती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.

वाढदिवसाच्या निमित्ताने हलिमा शेख यांच्या कार्याचा आढावा. समाजकार्य लोकशाही टिकवणे हेच ध्येय- हलिमा शेख

पुणे (प्रतिनिधी) हलिमा शेख एक राजकीय, सामाजिक कार्याचे अष्टपैलू महत्व असलेली व्यक्तिमत्व त्यांच्याच शब्दात जाणून घेऊ.
मी हलीम अल्ल्हाबकश शेख महाराष्ट्रात २००४ ला पुणे येथे आले. आल्यावर काही दिवस नातेवाइकांना कडे राहिले,काही महिने शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे राहिले. कालांतराने मी माझ्या मुला बाळां सोबत पाटील इस्टेट मध्ये राहण्यास सुरुवात केली. लोकांची घरकामे करून मुलांचे पालन पोषण व शिक्षण करू लागली. पुढे जाऊन मी समाजसेवा करण्याचे धोरण मनात ठेवले.त्यावेळेस मी काही महिलांना सोबत घेऊन महिला बचत गटाची सुरुवात केली.  माझी अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते सगळे एकत्रित येऊन आम्ही सामाजिक कार्यां ची सुरुवात केली.  त्यावेळी मी अनेक राजकीय व सामाजिक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून सामाजिक कार्य केले. मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने व स्वतःला खंबीरपणे मन घट्ट ठेऊन माझ्या संस्थेची स्थापना केली .२०१६/१७ मध्ये स्वयं प्रेरणा विकास संस्था म्हणून स्थापन. परिस्थिती हलाक्याची असल्यामुळे आर्थिक टंचाई येऊ लागली त्यामध्ये मला काँग्रेसचे मा.आमदार विनायक निमन यांनी खूप सहकार्य केले.  
मी २००४ ते २०२५ पर्यंत मी अनेक सामाजिक- राजकीय पक्षासोबत पदाधिकारी म्हणून कार्य केले. शेवटी समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांच्या हक्कासाठी पत्रकारिता हेच एक पर्याय असल्याचे  दिसून  आले. म्हणून मी पत्रकारितेत  लोकशाही पत्रकार संघांचे प्रदेश कार्याध्यक्ष अयुब पठाण खान यांच्या माध्यमातून सं.अ.बीबी वैद्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या साप्ताहिक /दैनिक युवती राज वृत्तपत्राची उपसंपादक म्हणून मला संधी दिली. तसेच लोकशाही पत्रकार संघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ही मोठी जबाबदारी तर दिलीच त्याच सोबत महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती च्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड करून अयुब सर आणि वैद्य सर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याला तडा जाऊ देणार नाही. राज्यात जेथे कुठे महिलांवर अन्याय - अत्याचार होतील तिथे पाहिलं मी जाऊन त्या महिलांना न्याय मिळवून देणार. साप्ताहिक युवती राज च्या वर्तमान पत्रातून अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करिन हे ही तितकेच खरं. लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्यात च मोठं करणार नाही तर संपूर्ण भारतात संघ मोठा करिन असं ही नमूद करते. येथून पुढचा माझा प्रवास फक्त आणि फक्त आता समाज सेवा आणि पत्रकारिता सोबत प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी " पत्रकारांचा कट्टा " हे चालू करून या मध्यमातून अनेकांचे प्रश्न सोडविणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे निरासन करण्यासाठी पत्र व्यवहार, फोन, प्रत्येक्षात भेटून प्रश्न सोडविणार आहे. असे ही लोकशाही मध्ये हुकूम शाही चालवीणाऱ्या विरोधात आंदोलन, मोर्चा, उपोषण करिन पण सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल. हाच माझा ध्यास राहील. कारण मला आजपर्यंत माझ्या समाजाने, गोरगरीब जनतेने जे मला दिलं. ते मला परत देणं गरजेच आहे हा उद्देश समोर ठेवून मी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करीन.

संस्थाचालक आणी बोगस शिक्षकांची चौकशी सुरू. बीड जिल्ह्यातील संस्था चालक अडकणार?


बीड (प्रतिनिधी)  बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक झाल्यानंतर आता संस्थाचालकांकडे एस आय टी ने मोर्चा वळवला आहे. ज्या ज्या संस्थेत बोगस भरती झाली त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या संस्थाचालकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असून ज्यांना ज्यांना नोकरी मिळाली ते शिक्षक आणि कर्मचारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

अनेक संस्थाचालकांविरोधात विशेष तपास पथकाकडे(एसआयटी) तक्रारी आल्या असून त्यांचाही तपास केला जाणार आहे.या घोटाळ्यात १०५६ नियुक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. २०१९ ते २०२५ पर्यंत गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. शिक्षण संस्था चालक, शिक्षण उपसंचालक आणि वेतन अधीक्षकांच्या संगनमताने लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करून हा सर्व घोटाळा झाला.

दरम्यान मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत. बीडच्या शिंदे आणि फुलारी या शिक्षणाधिकारी यांची चौकशी उपसंचालक यांच्यामार्फत सुरु झाली आहे. त्याचसोबत संस्थाचालक यांची देखील लवकरच चौकशी होणार आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या उपसंचालक यांच्यापासून ते संस्थाचालक यांच्यापर्यंत सगळ्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

संस्थाचालकांनीही यात आर्थिक गैरप्रकार केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेक शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांनी संस्थाचालकांविरोधात ‘एसआयटी’कडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार, आता संस्थाचालकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.

शाळांमध्ये संस्थाचालकांचे नातेवाईक

अनेक शाळांमध्ये संस्थांचालकांचे नातेवाईक नोकरीला आहेत. तसेच, वरिष्ठ शिक्षकांना खालच्या पदावर ठेवून नातेवाईकांना पदोन्नती दिली गेली आहे. हा अधिकार संस्थाचालकांना असतो. याचा गैरफायदा घेण्यात आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, काही शिक्षकांचा पैशांसाठी छळ सुरू असून त्यांचे वेतन रोखण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.

शालार्थ आयडी घोटाळ्याचा ‘एसआयटी’कडून कसून तपास सुरू असून अटकेत असलेले चिंतामण वंजारी, वैशाली जामदार, आणि लक्ष्मण मंघाम यांची कारगृहात रवानगी करण्यात आली.

Wednesday, May 28, 2025

महात्मा ज्योतीबा फुले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार स.पतसंस्थाच्या संचालकपदी रवि मगर पाटील यांची बिनविरोध निवड.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळी येथील महात्मा ज्योतीबा फुले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था परळी वै.च्या संचालकपदी श्री रवि मगर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महात्मा ज्योतीबा फुले  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स.पतसंस्था परळी वै.च्या संचालकपदी शिक्षकेत्तर कर्मचारी यांची निवड व्हावी ही अनेक दिवसापासून असलेल्या मागणीस कार्यकारी मंडळाने संम्मती दर्शवुन एकमताने ठराव पारीत करुन शिक्षकेत्तर सभासदांच्या मागणीचा विचार करून श्री रवि मगर पाटील यांची  निवड करण्यात आली यावेळी सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व सर्व संचालक मंडळाचे  रविभैय्या मगर पाटील यांनी आभार व्यक्त केले व सदरील पतस्थेची पत व दर्जा सुधारण्यास सर्वतोपरी सहकार्य राहिल असे अभिवचन दिले.

Monday, May 26, 2025

दहावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन.कु.भक्ती कैलास रिकीबे हिचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, वीरशैव विकास प्रतिष्ठान आणि लिंगायत समाज परळी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळयात भक्ती कैलासअप्पा रिकीबे हिने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक देवून मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बेलवाडी येथील संत गुरुलिंग स्वामी मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सोमनाथ आप्पा हालगे, वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, अ‍ॅड. गिरीश चौधरी (सेक्रेटरी, संत गुरुलिंग स्वामी मंदिर), श्री वक्रेश्वर मंदिराचे विश्वस्त नारायण आप्पा खके, दयानंद स्वामी, सुभाष आप्पा भिंगोरे, समर्थ शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव प्रभाकर इटके, तसेच प्रकाश खोत आदी उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक अशोक नावंदे गुरुजी यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय स्वामी सर यांनी आणि आभार प्रदर्शन सोमनाथ गोपनपाळे सर यांनी केले.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम बुद्रे, सचिव प्रा. सुधीर फुलारी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके, परळी शहराध्यक्ष नितीन समशेट्टी, कार्याध्यक्ष रमेश चौडे, उपाध्यक्ष शिवकुमार केदारी, सहसचिव विकास हालगे, वैजनाथ बँकेचे संचालक महेश्वर निर्मळे, दैनिक लोकमतचे पत्रकार संजय खाकरे, पत्रकार संतोष जुजगर, तलाठी रमाकांत गुजर, संजय कोरे, नागेश फडकडी, नागेश हाते, राहुल निर्मळे, नरेश पिंपळे, बंडू चौंडे आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

बातमी का छापली म्हणत पत्रकारांना धमकी देणाऱ्या आ.बाबुराव कदमांवर गुन्हा दाखल करा –जिल्हाध्यक्ष अशोक होळकर

बीड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संजय सुर्यवंशी यांना बातमी का छापली म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याचे धमकी देणाऱ्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक होळकर यांनी केली आहे , पत्रकारांवर दबाव टाकून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बीड शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे .दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष यांना दिनांक 22 मे 2025 रोजी निवधा तळणी सर्कल मधील 25 गावे 25 तासांपासून अंधारात या मथळ्या खाली वृत्त प्रकाशित केले वास्तविक पाहता या बातमीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही तरी सुद्धा पत्रकारांना संपविण्याची असंविधानिक भाषा वापरणाऱ्या आमदार कदमावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक होळकर मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अनिल देवा कुलकर्णी ,जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय नरनाळे ,जिल्हा सचिव विठ्ठल घरत,प्रदीप आनेराव ,अस्लम पठाण ,सिध्दांत खवतड, अंकुश पवार,यांनी केली आहे.

पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणण्या चा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द कारवाई.

गेवराई (प्रतिनिधी) दहा हजार रूपयांच्या खऱ्या नोटा देऊन वीस हजार रूपयांच्या पाचशेच्या बनावट नोटा घेतल्या.याच नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बालाप्रसाद बाहेती रा.गेवराई (लाड गल्ली)नासेर शेख रा.बोधेगाव जि.अहिल्यानगर अशी आरोपीची नावे आहेत.बालाप्रसाद बाहेती याने चलनातील दहा रुपयांच्या ख-या नोटा देत नासेर शेख याच्याकडून विस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेतल्‍या. त्‍या नोटा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापरत असल्याचा प्रकार काल धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला. पोलीस हवालदार राजु भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाप्रसाद बाहेती व नासेर शेख याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय दिपक लंके हे करित आहेत.

Sunday, May 25, 2025

तात्पुरता मातीच्या भरावाचा केलेलाूपुल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायं काळी पुन्हा वाहून गेला!वाहनधारकांची मोठी अडचण.


आष्टी (प्रतिनिधी) - बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड चिंचपुर या १७ किलोमीटर अंतराचे रखडलेले काम मागील अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. शेरी बुद्रुक येथील नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरता मातीच्या भरावाचा केलेलाूपुल शनिवारी दुपारी वाहून गेला. दुरूस्ती करून २२ तासानंतर पुन्हा दुरूस्त करून वाहतूक सुरळीत केली, पण सायंकाळी नदीला आलेल्या पाण्याने पूल पुन्हा वाहून गेल्याने वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर हा १७ किलोमीटर अंतराचा रस्ता रखडल्याने काही महिन्यांपुर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे काम सुरू झाले.पण हे काम अंत्यत संथ गतीने सुरू असल्याने शेरी बुद्रुक नदीवर नवीन पुल उभारण्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी नळकांडी वापरून तात्पुरता मातीचा भराव टाकून वाहनाची पर्यायी व्यवस्था केली होती.

शनिवारी झालेल्या पावसाने दुपारी हा पुल खचल्याने वाहतूक वळविण्यात आली.राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रविवारी दुपारी परत पुलाची दुरूस्ती करून दुपारी वाहतूकीसाठी खुला केला.पण सायंकाळी नदीला आलेल्या पाण्याने पुन्हा पूल वाहून गेल्याने वाहन धारकांची मोठी अडचण निर्माण झाल्याने पुन्हा पहिल्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली. एखाद्याचा जीव गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग योग्य व्यवस्था करेल का? असा सवाल शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दिपक सोनवणे यानी उपस्थित केला आहे.

राज्यात दररोज ३२ विवाहितचा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना.


बीड (कांतीकारी साथी) सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, परंतु याच वैष्णवीप्रमाणे दररोज ३२ महिलांचा पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होत आहे. १ जानेवारी २०२२ ते २२ मे २०२५ या १,२३७ दिवसांत राज्यात तब्बल ३९ हजार ६६५ गुन्हे पोलिस दप्तरी नोंद झाले आहेत. चार भिंतीच्या आत विवाहितांचा दम कोंडत असल्यानेच त्या आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.

मुंबई, पुणे शहरांत जास्त छळ

विवाहितांचा मुंबई, पुणे या मोठ्या शहरांमध्येच जास्त छळ होत असल्याचे समाेर आले आहे. हा छळ असाह्य होताच, त्यांनी पोलिस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात तक्रार दिली.

सर्वाधिक गुन्हे कोठे दाखल

मोठ्या शहरांमध्येच विवाहितांचा छळ अधिक होत आहे. यात बृहन्मुंबईत सर्वाधिक ४१२, अहिल्यानगर जिल्ह्यात १९६, बीड २४३, छत्रपती संभाजीनगर २८८, धुळे १८१, जालना १८०, नागपूर १२१, नांदेड १७५, नाशिक २३७, पुणे २२९ या ठिकाणी जास्त गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी १ जानेवारी ते २२ मे २०२५ या दरम्यानची आहे.

कोणत्या कारणांसाठी छळ

घर, प्लॉट, व्यवसाय, वाहन, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशा विविध कारणांसाठी विवाहितांचा चार भिंतीत सासरच्या लोकांकडून छळ केला जात आहे. काही घटनांमध्ये तर हुंडा कमी दिला होता, तो आता घेऊन ये, असे म्हणत छळ केला जात आहे.

आधी लव्ह, आता हेट

आकर्षणातून तरुण, तरुणी प्रेमात पडतात. त्यानंतर, कुटुंबाला विश्वासात न घेता प्रेमविवाह करतात, परंतु काही दिवसांतच त्यांचे बिनसते. किरकोळ कारणांवरून खटके उडतात. यातून विवाहिता पोलिस ठाणे गाठत तक्रार देते. असे गुन्हेही अनेक ठाण्यात दाखल आहेत. आगोदर लव्ह आणि आता हेट, अशी अवस्था त्यांची झाली आहे.

भरोसा सेलही कमी पडतो

काही विवाहिता सासरच्यांनी छळ केल्यानंतर भरोसा सेलकडे धाव घेतात. येथे त्यांना वारंवार बोलावून घेत समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांत तडजोड होते, परंतु काहींत सासरचे लोक नांदविण्यास नकार देतात. अशा वेळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. भरोसा सेलही त्यांच्यापुढे हात जोडतो.

११ महिन्यांत ३,३४३ गुन्हे

१ जूलै २०२४ पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा छळ झाला आहे. यातील काहींच्या हाताची तर मेहंदी निघण्याआधीच त्यांचा छळ सुरू झाला होता. मागील ११ महिन्यांत छळाचे ३,३४३ गुन्हे राज्यात नोंद आहेत.

अशी आहे आकडेवारीवर्षे - गुन्हे

२०२२ -११,९८२२०२३ - ११,७७०२०२४ - ११,१७७२२ मे २०२५ - ४,७३६

Saturday, May 24, 2025

अत्यंत दुर्दैवी काळरात्र ! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गावावर शोककळा.


धारूर (प्रतिनिधी) : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडले आहे. मुंडे कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. सर्पदंश झाल्यानंतर दोघांची प्रकृती झपाट्याने खालावली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. सर्पदंशामुळे एका कुटुंबातील दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळी सर्वत्र हळहळ निर्माण करणारा आहे.

Friday, May 23, 2025

दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत ११ तलाठ्यांना आष्टी तालुक्यातून बदला.आष्टी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.


आष्टी (प्रतिनिधी) : आष्टी तालुक्यात काही तलाठी हे १४ वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच काही कर्मचारी याच तालुक्यातील रहिवासी आहेत. यामुळे काम करताना तक्रारी वाढत आहेत. वारंवार त्यांची सज्जा बदलण्याकरिता नागरिक, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे ६ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या तलाठ्यांची तालुक्याबाहेर बदली करावी, असे पत्र तहसीलदार वैशाली पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावरून ११ तलाठ्यांच्या बदल्या होणार आहेत. यामुळे ठाण मांडलेल्या तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तलाठ्यांसह काही कर्मचारी हे दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच ते स्थानिक आहेत. यामुळे त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूणच कामावर परिणाम होत आहे. या कर्मचाऱ्यांना वारंवार नोटीस देण्यात आलेली आहे. तरीही त्यांच्या कामामध्ये कोणतीच सुधारणा होत नाही, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामध्ये स्थानिक कर्मचारी काम करत असल्याने तक्रारी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. नवीन भरतीमध्ये आलेला तलाठी वर्ग हा त्यांचेच अनुकरण करत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता ६ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या तलाठ्यांची तालुक्याच्या बाहेर बदली करावी, असे पत्र आष्टीच्या तहसीलदार पाटील यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पाठविले आहे.

यापूर्वी बदल्या का नाहीत?

वैशाली पाटील यांच्या पत्राने महसूलमधील बदल्यांचा सावळागोंधळ लक्षात आला आहे. स्वग्राण आणि नियमानुसार ६ वर्षांत बदली होणे अपेक्षित असतानाही यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बदली का केली नाही? असा प्रश्न आहे. यावरून तलाठ्यांनी राजकीय वशिला लावून आपल्या बदल्या थांबविल्याचा संशय आहे. त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे अभय आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तलाठी - कार्यकाळ.

एस.एम. केमधरणे - १४ वर्षे ८ महिने.एस.एम. दगडखैर - १० वर्षे ११ महिने नंदा शिंदे - ९ वर्षे ७ महिने जी.के.गावडे - ९ वर्षे ७ महिने,छाया मेश्राम - ८ वर्षे ५ महिने जगदीश राऊत - ७ वर्षे ४ महिने आय. एच. शेंदूरकर - ७ वर्षे ६ महिने प्रवीण बोरुडे - ६ वर्षे १० महिने डी.यू. अनारसे - ९ वर्षेबी.एस. कवळे - ९ वर्षे ६ महिने,बाळू बनगे - १२ वर्षे

बीड पोलिस अधीक्षकांचा आदेश . प्रशासकीय कार्यासह इतर निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्या एलसीबीतून १५ काढले.


बीड (प्रतिनिधी) पोलिसांच्या बदल्या म्हटले की, राजकीय लोकांचा हस्तक्षेप आलाच. बीडमध्ये तर हे नित्याचेच झाले होते; परंतु यावेळी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी वशिलेबाजीवाल्यांना थेट दूरचा रस्ता दाखविला आहे. प्रशासकीयसह इतर निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. वर्षानुवर्षे एलसीबीत ठाण मांडलेल्याही १५ कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू असून पुढील आठवड्यात चालक अंमलदार व अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

मार्च महिन्यात बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे मागील आठवड्यापासून बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. सर्व निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी पहाटे काढण्यात आले. यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी, तालुक्यात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. यावेळी कोणताही राजकीय दबाव किंवा वशिला लावणाऱ्यांचा विचार न करता अधीक्षकांनी ही प्रक्रिया राबविली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करून नवा विक्रमही केला आहे. सर्व बदल्या पारदर्शक झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

बदल्यांसाठी कोणते निकष?

स्वग्राम, एकाच ठिकाणी पाच वर्षे, एकाच उपविभागात १२ वर्षे नोकरी केलेल्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

पदानुसार झालेल्या बदल्या.

सहायक फौजदार - १४२हवालदार - २५४पोलिस नाईक/शिपाई - २१०

साहेब, आमची बदली थांबवा.

गुरुवारी सकाळी बदल्यांचे आदेश निघताच दुपारच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी रांगा लावल्या. आम्हाला बीडमध्येच द्या, बदलीचे ठिकाण सोयीचे नाही, स्वत: किंवा नातेवाईक आजारी आहेत, आम्हाला ये-जा करण्याची सोय नाही, मुलगा/मुलगीच आजारी असते, अशी विविध कारणे सांगून बदली थांबविण्यासाठी अनेक कर्मचारी आले होते. यात काही महिलांचाही समावेश होता; परंतु त्यांना अधीक्षकांनी भेट नाकारल्याची माहिती आहे. आधी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा आणि मग अर्ज करा. त्यावर विचार केला जाईल, असे म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

एलसीबीतील १५ जण बदलले.

स्थानिक गुन्हे शाखा ही विशेष शाखा आहे. येथे येण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी वशिले लावले होते. त्यानुसार त्यांना यापूर्वी पोस्टिंगही मिळाली होती. काही जण परळीहून थेट एलसीबीत बसले होते. यात शाखा प्रमुखांचाही समावेश होता. आ. सुरेश धस यांनी यावर आरोपही केले होते. आता याच शाखेतील १५ कर्मचाऱ्यांना बदलले आहे. अद्याप त्यांच्या ठिकाणी नवीन कोणीही दिलेले नाही.

२०० जणांचा विनंती अर्ज.

प्रशासकीय बदल्यानंतर आता विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना विशेष शाखांसह सोयीचे पोलिस ठाणे दिले जाणार आहे. ही प्रक्रिया गुरुवारी सुरू होती.

शाखांना कर्मचारी देणे बाकी.

एलसीबी, सायबर पोलिस ठाण्यांसह इतर शाखांमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप नवे कर्मचारी दिले नाहीत. विनंती बदल्यांमधील लोकांना या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते. एलसीबीसाठी आगोदर केलेल्या कामाचे मूल्यांकन तपासले जाणार आहे.

चालकांच्याही होणार बदल्या.

चालक अंमलदार यांच्याही बदल्या होणार आहेत. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात राबविली जाणार आहे.

ठाणेदारांची होणार उचलबांगडी.

जिल्ह्यातील काही ठाणेदार वादग्रस्त ठरले होते. त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत. एकदा बाहेरचे अधिकारी बदलून आले की सर्वांची सांगड घालून बदल्या केल्या जाणार आहेत. यात काही ठाणेदार बदलले जाणार असून आतापर्यंत विशेष शाखा किंवा बाजूला बसलेल्या अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही प्रक्रियाही पुढील आठवड्यात होणार आहे.

घराचा दरवाजा तोडून घरात घुसून धारदार शस्त्राच्या धाक दाखवून लाखोंचे दागिने व रोकड लुटली.


केज (प्रतिनिधी) तालुक्यातील माळेगाव येथील नवीन प्लॉटवरील वसाहतीत राहणाऱ्या आण्णा कोंडीबा चाळक यांच्या घराचे दार गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान तोडून तोंडाला कपडा बांधलेल्या चौघांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी पती, पत्नीला चाकूचा धाक दाखवून नगदी रोख 74 हजारासह एकूण 4 लाख 44 हजार रुपयांचे दागिने व ऐवज लुटला. 

केज तालुक्यातील माळेगाव येथील प्लॉटवरील नवीन वसाहतीतराहणारे आण्णा कोंडीराम चाळक हे शेतकरी आपल्या घरात कुटुंबियांसह झोपले होते. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घराचे दार तोडून 25 ते 30 वयोगटातील चार अनोळखी तरुण तोंडाला रुमाल बांधून घरामध्ये घुसले. धारदार शस्त्राचा आण्णा चाळक व त्यांच्या पत्नीला धाक दाखवून कपाटात ठेवलेले एक तोळ्याचे झुंबर जोड, 7 ग्रॅमचा नेकलेस, 7 ग्रॅमचे मिनी गंठण, 5 ग्रॅमची सोन्याची ठुशी, 4 ग्रॅमचे मनी, मंगळसूत्र, 5 ग्रॅमची अंगठी आशा दागिन्यासह,नगदी रोख 74 हजार रुपये मिळून एकूण 4 लाख 44 हजार रुपयाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. या प्रकरणी अण्णा कोंडीराम चाळक यांच्या फिर्यादी वरून युसूफवाडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे करीत आहेत.

या प्रकरणी पावसाळी वातावरण असल्यामुळे श्वान पथका ऐवजी ठसे तज्ञाचे पथक पाचरण करण्यात आले होते. दरम्यान, माळेगाव येथील कपड्याच्या दुकानासह इतर दोन ठिकाणीही चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु त्याठिकाणचे नागरिक जागे झाल्यामुळे तेथील चोरीचा त्यांचा प्रयत्न फसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

पवनचक्की कंपनीने शेतकऱ्यांची केली फसवणूक.चोरट्यांचा पालशिंगण शिवारात ॲल्युमिनियम तारेवर दरोडा

बीड (प्रतिनिधी) अनेक शेतकऱ्यांना पोलीस संरक्षणात मावेजा न देता गंडा घालणाऱ्या पवनचक्की कंपनीलाच चोरट्यांनी चुना लावला आहे. नेकनूर ठाणे हद्दीतील पालसिंगण शिवारात चोरट्यांनी ग्रीन पॉवर कंपनीच्या तीन टॉवरवरील क्रास आर्म कट करुन तब्बल 2 हजार 132 फुट अ‍ॅल्युमिनियम तारेची चोरी केली. या तारेची किमंत 2 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनचक्की कंपनीने तार ओढताना अनेक शेतकऱ्यांना मावेजा न देता गंडा घालण्याचा काम केलं. त्याच ओटू कंपनीच्या तीन टावर वरील 2 हजार फुटाहून अधिकची तार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कंपनीचे प्रशांत माने (रा.बीड) यांनी याबाबत फिर्याद नोंदविली. त्यानुसार, ते ग्रीन पॉवर एक्सआय (ओटू पॉवर) येथे कार्यरत आहेत.दि. 11 मे रोजी सायंकाळी ते चौसाळा ते पालसिंगण या परिसरात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान पालसिंगण शिवारातील टॉवर क्र.38,39 व 40 क्रमाकांच्या टावरवरील 2 हजार 32 फुट अ‍ॅल्युमिनियम कंडक्टर तार चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द बुधवारी 21 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीचा भांडाफोड होणार. पाचशे कोटीचा घोटाळा शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, नागनाथ शिंदे चौकशीच्या फेऱ्यात.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक भरतीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि. सादेक इनामदार यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली होती . यावरून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.
राज्यात सध्या शिक्षक भरती घोटाळे चर्चेला येत आहेत. नागपूरमध्ये देखील शिक्षक भरती प्रकरणी चौकशी सुरु झालेली आहे. बीड जिल्ह्यातही शिक्षक भरतीमध्ये खाजगी शिक्षण संस्था चालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगणमत करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याच्या तक्रारी आहेत. पवित्र पोर्टलमध्ये खेळ करत आणि नित्यं डावलून शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आणि त्या नियुक्त्यांना शिक्षण विभागाने मान्यताही दिली अशा तक्रारी आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भातील कोणतीच माहिती दिली जात नव्हती. एवढेच नाही तर माहिती अधिकारात देखील द्यायला शिक्षण विभाग तयार नाही . या संपूर्ण प्रकरणात शेकडो कोटींची उलाढाल झाल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि . सादेक इनामदार यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी 400 ते 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे म्हटले होते. यावर शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने आता राज्याच्या शिक्षण आयुक्तांना या प्रकरणात प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरतीचा भांडाफोड होणार आहे.

Thursday, May 22, 2025

कर्जाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन.


गंगामसला (प्रतिनिधी) सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय नरहरी आत्माराम खेत्री या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १९ मे राेजी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथे घडली.

१९ मे रोजी सकाळी शेतातून येतो, असे घरातील लोकांना सांगून नरहरी निघून गेला होता. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शाेध घेतला असता, एका शेतात विषारी औषध प्राशन केल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नरहरी याच्या पश्चात कुटुंबात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, वृद्ध आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ताच गेल्याने हे शेतकरी कुटुंब अक्षरशः खचले आहे.

मृतक नरहरी यांच्यावर बँकेचे, लोकांचे देणे असल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. मयताचा भाऊ विष्णू आत्माराम खेत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. तपास बीट जमादार बाळू सोनवणे व पोकॉ. गोविंद बाबरे करीत आहेत.

Monday, May 19, 2025

निर्भिड आणि सामाजिक जाणीव असलेला आदर्श पत्रकार : श्री.संतोषभाऊ जुजगर

  
लोकशाही चा चौथ स्तंभ पत्रकारिता क्षेत्रात कोहिनूर हिरा. मा.श्री. संतोषभाऊ जुजगर यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य ते सातत्याने आपल्या लेखनाच्या माध्यमातून करतात हे त्यांच्या  
निष्पक्ष पत्रकारितेचे प्रतीक आहे 
संतोषभाऊ जुजगर हे सत्य आणि निर्भिड पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.  
*गावपातळीवरील समस्यांना वाचा  फोडणे:- त्यांनी स्थानिक जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला.सत्याचा पाठपुरावा सत्य मांडणे ही त्यांची खास शैली असून, त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना उजेडात आणले आहे.                    *नवीन पत्रकारांसाठी प्रेरणा:- त्यांनी अनेक नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करून योग्य दिशा दिली.  
संतोषभाऊ जुजगर हे केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक कार्यातही सक्रिय असतात  
विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याची बांधिलकी  ते नेहमी जपत असतात त्याचे   धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये योगदान महत्त्वाचे आहे समाजाच्या हितासाठी   
तरुणांना प्रेरणा देणारे त्याचे व्यक्तिमत्त्व आदर्श आहे.म्हणून त्यांची ओळख एक सर्व प्रिय व्यक्तीमहत्त्व केली तर चुकीचे ठरणार नाही.आज वाढदिवसा निमित्त त्यांना लाख लाख व विशेष शुभेच्छा  
संतोषभाऊ जुजगर यांच्या लेखणीने असेच लोकहितवादीकाम व समाज उपयोगी व समाजातील अनेक समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत राहो हिच अपेक्षा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना उत्तम,निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो हिच प्रभू वैद्यनाथ आणि आई तुळजाभवानी चरणी केली जाते.🙏

             बालाजी ढगे 
          पत्रकार परळी वैजनाथ  

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शिवराज दिवटेस न्याय द्या', परळीत मराठा सेवकांची अजित पवारांकडे मागणी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर परिसरात चालू असलेल्या तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहामध्ये बैठकीसाठी हजर झाले. दरम्यान, विश्रामगृहाच्या बाहेर मराठा सेवकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शिवराज दिवटे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली. न्याय द्या न्याय द्या, अजित पवार न्याय द्या, अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच परळी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांचे जंगी स्वागत केलं गेलंय. या वेळी परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक,राणी लक्ष्मीबाई टावर आणि वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये फुलांचे हार क्रेनवर लावण्यात आले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास कामाची केली पाहणी. त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे , माजी आमदार संजय दौंड आदींची उपस्थिती होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहामध्ये बैठकीसाठी हजर झाले.बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार बाहेर आले तेव्हा मराठा सेवकांनी निवेदन सादर केले. लिंबुटा येथील युवक शिवराज दिवटे हल्ला प्रकरणी आंदोलक आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाली. पोलीस विनाकारण जलालपूरच्या ग्रामस्थांना पकडत आहेत अशी तक्रार करून शिवराज दिवटे यांना न्याय द्या, अशी मागणी ही आंदोलकांनी केली. यावर शिवराज दिवटे हल्ला प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना ४८ तासांच्या आत अटक करण्याच्या सूचना पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

आज परळी बंदची हाक.

शिवराज दिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय आणि विविध संघटनांनी परळीत बंद पुकारला आहे. सकाळी काही वेळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मात्र, अकरा वाजेनंतर बाजारपेठे सुरळीत सुरू होती. बंदचे आवाहन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सकाळपासून नजर कैदेत ठेवले असल्याची माहिती आहे.

परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये बैठका.

अजित पवार हे सोमवारी परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये विविध बैठका घेतील. तसेच पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची दुसरी बैठक होणार आहे. मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. यात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हया वर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली:- मनोज जरांगे




अंबाजोगाई (प्रतिनिधी) जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार. आम्ही काय नुसत्या भेटीच देत फिरायचं का? असा सवाल करीत ही गुंडगिरी निर्माण झालेलं विदारक वातावरण दूर करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत. पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही. त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.

परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी जरांगे पाटील यांनी शिवराज याची भेट घेतली. शिवराजच्या अंगावरील बेदम मारहाण केलेले व्रण पाहून अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जिवे मारण्यासाठीच त्याचे अपहरण केले. मात्र, लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही, असा आरोपही जरांगे यांनी केला.

पाच आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी.

शिवराज दिवटे हल्ला प्रकरणात पाच जणांना संभाजीनगर पोलिसांनी शनिवारी अटक करून परळी न्यायालयात हजर केले. त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोघा अल्पवयीन मुलांना बीडच्या बाल न्यायालयात हजर करून त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी संभाजीनगर पोलिसांनी दोन पथके नियुक्त केल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले.

सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू.

मी भेट देणार आहे. आमची दहशत कमी झालेली नाही, हे दाखविण्यासाठी अशी मारहाण केली आहे. संतोष देशमुख यांचा तर बळी घेतलाच, पण हादेखील पार्ट टू होण्यापासून वाचला. सोमवारी डीपीसीच्या बैठकीआधीच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू. दिवटे प्रकरणही गंभीर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनीच आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश द्यावेत.- सुरेश धस, आमदार, आष्टी

प्रशासनाचा वचक राहिला नाही.

वर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या लोकांच्या बदल्या झाल्याशिवाय परळीतील गुंडगिरी कमी होणार नाही. तसेच एसपी लेव्हलची स्वतंत्र व्यक्ती परळी व परिसरासाठी आवश्यक आहे, तरच येथील गुंडगिरी कमी होईल. सत्तेच्या जिवावर गुंडगिरी व मस्ती सुरूच आहे. कायद्याचा धाक नसल्याने व्हिडीओ व्हायरल करून मारहाण केली जाते. या गुंडगिरीवर प्रशासनाचा वचक राहिला नाही.- बजरंग साेनवणे, खासदार बीड

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला परळी औष्णिक विद्युत केंद्रा अंतर्गत कामकाजाचा आढावा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज परळी औष्णिक विद्युत केंद्रा अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. 

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंढे आदी उपस्थित होते.

यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी सादरीकरणाद्वारे औष्णिक विद्युत केंद्राबाबत माहिती दिली. यामध्ये प्रस्तावित संच क्रमांक-1 ची मंजुरी व उभारणी, सौर ऊर्जा प्रकल्प मान्यता, राखेचे प्रदूषण व उपाययोजना, औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, थर्मल परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे, थर्मल कॉलनी परिसरात वृक्ष लागवड, सौर ऊर्जा प्रकल्प, आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला. परळी औष्णिक विद्युत केंद्राबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपले सहकार्य असेल असे श्री.पवार यांनी सांगितले. 

यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी विकसीत होते.

बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी पाच हजाराची लाच घेताना कार्यालयात रंगेहाथ. अटक.


बीड (प्रतिनिधी) -मजूर संस्थेचे नूतनिकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. कृष्णा मुंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बेलगाव येथील तक्रारदार यांच्या मजूर संस्थेचे नूतनिकरण करून अ वर्ग वर्गीकरण करण्यासाठी बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिक कृष्णा वसुदेव मुंडे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली

याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.मुंडे याला पाच हजाराची लाच घेताना कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.

Saturday, May 17, 2025

जनसेवेचे वैद्यकीय रूप - डॉ. विवेक दंडे

परळी वैजनाथ – श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही परळी वैद्यनाथ नगरी आरोग्यसेवेसाठीही ओळखली जाते, आणि त्या ओळखीला समर्पितपणे आकार देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. डॉक्टर हा पेशा व्यवसायापेक्षा अधिक समाजसेवेचा आहे, हे त्यांनी आपल्या कामातून वेळोवेळी सिद्ध केले आहे.
आज 17 मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस असून, या विशेष दिनानिमित्ताने त्यांचे समाजकार्य, वैद्यकीय योगदान आणि सामाजिक बांधिलकी यांचा घेतलेला हा सन्मानार्थ लेख आहे.
डॉ. विवेक दंडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ आणि आदरणीय डॉक्टर होते. त्यांनी केवळ औषधोपचार नव्हे, तर माणुसकीची सेवा केली. तोच आदर्श डॉ. विवेक दंडे यांनी आत्मसात केला. आज त्यांच्या रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण केवळ उपचारच नव्हे, तर मायेचा स्पर्श अनुभवतो.
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते आर्थिक क्षेत्रातही सामाजिक भान जपत कार्यरत आहेत. सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका आज बँकिंग क्षेत्रातही आदर्श ठरली आहे.
डॉ. विवेक दंडे यांचे कुटुंबही सेवाभावाने प्रेरित आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट तेजस दंडे हे मुंबई हायकोर्ट येथे यशस्वी वकील म्हणून कार्यरत असून, कायदा आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांतून समाजसेवा घडवणारे हे कुटुंब म्हणजेच मूल्यांची शाळा आहे. 
डॉ. विवेक दंडे हे डॉक्टर, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा, आणि त्यांच्या कार्याला सलाम करताना, परळी वैजनाथ नगरीसाठी त्यांचे योगदान हे निश्चितच प्रेरणादायी आहे.

*कोरोना काळातला खरा योद्धा*

कोरोना महामारीने जेव्हा संपूर्ण जग थांबले होते, तेव्हा डॉ. दंडे यांनी आपल्या रुग्णसेवेचा एक क्षणही थांबू दिला नाही. त्यांनी अत्यल्प साधनांमध्येही अनेक रुग्णांना दिलासा दिला. त्यांची ही समर्पित सेवा परळीच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे. रुग्णालयातील सेवा ही त्यांची केवळ एक बाजू आहे. त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीमा, जनजागृती उपक्रम राबवून समाजाच्या आरोग्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग जनहितासाठी कसा करायचा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

संतोष जुजगर 
परळी वैजनाथ

Friday, May 16, 2025

सर्वच आधुनिक सुविधा चा अभाव वैतागून अखेर गावकऱ्यांनी वाडीच काढली विक्री ला!


आष्टी (प्रतिनिधी): वाडीत जाण्यासाठी रस्ता, संपर्क साधण्यासाठी मोबाइल रेंज, बस यासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वैतागलेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी चक्क वाडीच विक्रीला काढली. हा निर्धार गाव बैठकीत केला.

आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील १,००० लोकसंख्या असलेली वाडी; पण रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

रेंजसाठी चढावे लागते झाडावर

मोबाइलला रेंज येत नसल्याने ग्रामस्थ अनेकदा झाडावर चढतात. अगदी जीव धोक्यात घालून त्यांना संवाद साधावा लागत आहे. त्यामुळेच आम्ही वैतागलो, असे ग्रामस्थांनी सांगितले.

आमच्या वाडीला रस्ता नाही. मोबाइलला रेंज मिळत नाही, बस येत नाही. सुविधांचा अभाव आहे. ग्रामस्थांनी वैतागून वाडीची विक्री करण्याचा निर्णय घेतला.विष्णू वनवे, माजी सरपंच

ग्रामस्थांनी काय निर्धार केला हे अद्याप आमच्यापर्यंत आले नाही. लेखी स्वरूपात कळले तर काही मार्ग काढला जाईल.वैशाली पाटील, तहसीलदार

गाव बैठकीत निर्धार

पक्का रस्ता नसल्याने वनवेवाडीतील नागरिकांना प्रचंडहाल सोसावे लागत आहेत. तर विद्यार्थ्यांना पायी चालताना अडचणीचा सामना करावा लागतो. पाऊस झाल्यावर या रस्त्याला नदी-नाल्याचे स्वरूप येते.

वयोवृद्ध नागरिकांना दवाखान्यात येण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका या गावात येत नाही. एसटी तर फक्त मतदान पेटीसाठीच गावात येते.

राज्य सरकारने आमचे गाव 3 विकत घ्यावे नाहीतर रस्ता द्यावा, अशा निर्धार ग्रामस्थांनी बैठकीत घेतला.

मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालका चा कहर. कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू .


केज (प्रतिनिधी) : शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजता, मांजरसुंबा  ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर (क्रमांक डीडी ०१ झेड ९७७१) मद्यधुंद अवस्थेतील चालकाने हयगयीने चालवल्यामुळे मोठा अपघात झाला. या घटनेत मीना प्रवीण घोडके (वय ३७, रा. चिंचोलीमाळी, ह. मु. टाकळी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर केज परिसरातील १९ जण जखमी झाले, त्यापैकी ८ जण गंभीर आहेत.

भरधाव वेगाने कंटेनर मांजरसुंबा येथून सुटला होता आणि वाटेत दिसेल त्या वाहनाला व माणसाला धडक देत केज बसस्थानक परिसरात आला. यानंतर संतप्त नागरिकांनी लोखंडी सावरगाव टी पॉईंटपर्यंत कंटेनरचा पाठलाग केला. या ठिकाणी तीव्र वळणावर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात उलटला. संतप्त जमावाने कंटेनर पेटवून दिला. अंबाजोगाई येथून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

गंभीर जखमींची नावे.

शेषेराव मारोती चंदनशिव (५२), कृष्णा हरिदास करपे (२०), बळीराम अप्पाराव पांचाळ (४०), कुमार बळीराम गायकवाड (५५), आशा रावसाहेब मुंडे (५०), सिद्धार्थ शिंदे (५२), फुलाबाई धोंडीराम सावंत (६०), श्रद्धा मधुकर चिंचकर (१८) यांना अंबाजोगाई येथील स्वराती ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी दिली.

वाहतूक पोलिसांचा अभाव ठरला घातक.

या घटनेनंतर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केज शहरातील चौकात वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने अपघातात अधिक जीवितहानी झाली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

धक्कादायक प्रकार! विद्यार्थ्याचे बसमधून अपहरण करून अमानुष मारहाण.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) बीड जिल्हा पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती, आणि आता अंबाजोगाई शहरात एका विद्यार्थ्याचे बसमधून अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

*तरूणाचं बसमधून अपहरण

मिळालेल्या माहितीनुसार, बीडवरून अंबाजोगाईकडे एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आणि त्याला निर्दयपणे मारहाण केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर चौथा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेची सुरुवात बसमध्ये एका क्षुल्लक कारणावरून झाली. बीडवरून अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत असताना एका विद्यार्थ्याचा एका महिलेशी थुंकल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर, जेव्हा ही बस अंबाजोगाई शहरात पोहोचली, तेव्हा चार अज्ञात व्यक्ती बसमध्ये घुसले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. बसमधील वाहक आणि चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी दोघांनाही बसमधून खाली उतरवले आणि त्यानंतरही त्यांची मारहाण सुरूच ठेवली.

*तरूणाला बेदम मारहाण.

या मारहाणीत संदेश सावंत नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अंबाजोगाई येथील एसआरटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ऋषी शिंदे, लखन जगदाळे, निकेश जगदाळे आणि बालाजी जगदाळे या चार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम 109, 147, 148, 149, 352, 341, 323, 504, 506 आणि सहकलम 3(2)(व्हीए) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची कसून चौकशी करत आहेत, तर फरार असलेल्या चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Thursday, May 15, 2025

खेळण्याच्या वयातच मुली आई! बीड जिल्ह्यात बालविवाह झालेल्या १५ वर्षाच्या दहा मुली गर्भवती.


बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बालविवाह काही केल्या थांबत नसल्याचे उघड झाले आहे. अगदी शिक्षण, खेळण्याच्या वयातच पालक मुलींचे हात पिवळे करत असल्याने अवघ्या १५ व्या वर्षीही मुली गर्भवती राहत आहेत. मागील वर्षात १८ वर्षांखालील १२ मुली गर्भवती असून, त्यातील १० जणी १५ वर्षांच्या आहेत. याची आरोग्य विभागात नोंद झाल्याने ही गंभीर समस्या उघड झाली आहे. ही परिस्थिती राज्यभरातच आहे, परंतु प्रशासन अहवाल समाेर आणत नाही.

बालविवाहासंदर्भात जनजागृतीसाठी शासन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते. तसेच बालविवाह रोखण्यासह झालेल्यांवर बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातात. परंतु, असे असले तरी बीडमधील ही गंभीर समस्या काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. पालक अजूनही आपल्या मुलींचे हात अवघ्या १३ व्या वर्षीही पिवळे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच खेळण्याच्या वयातच त्यांच्यावर मातृत्वाचे ओझे पडत आहे. विशेष म्हणजे याची शासनदरबारी नोंद होत आहे.

११ मुलींची प्रसूती.

जिल्हा रुग्णालयात १३ ते १७ वर्षांतील ११ मुलींची प्रसूतीही झाली आहे. यातील काही मुली या अत्याचार पीडित असल्याचे सांगण्यात आले.

आरसीएच पोर्टलला नोंद.

गर्भवती महिलांची नोंद ही आरसीएच (प्रजनन व बाल आरोग्य) पोर्टलवर केली जाते. यावरूनच अगदी १५ वर्षांच्या मुली गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. हे आरोग्य विभागाचे अधिकृत पोर्टल आहे.

कुठल्या आहेत गर्भवती मुली.

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत १२ मुलींची गर्भवती म्हणून नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यातील ४, गेवराई २, वडवणी २ आणि आष्टी, केज, धारूर, शिरूकासार येथील प्रत्येकी एकीचा समावेश आहे.

बालविवाह कशावरून?. 

आरसीएच पोर्टलला नोंद करताना सर्व अधिकृत पुरावे द्यावे लागतात. यात पतीचाही पुरावा असतो. या सर्व १२ मुलींच्या नावापुढे त्यांच्या पतीचे नावही लिहिलेले आहे.

दोषी कोणाला धरायचे?. 

पालकांनीच मुलीचा बालविवाह लावलेला असतो. आता अल्पवयीन असतानाच गर्भवती राहिल्याने पीडितेने किंवा तिच्या आई-वडिलांनी तक्रार देणे अपेक्षित असते. परंतु, यात पालकही दोषी असतात. कारण त्यांनीच बालविवाह लावलेला असतो. त्यामुळे नेमका दोष कोणाला द्यायचा? हा प्रश्न आहे.

इतर जिल्ह्यातून २३ गुन्हे वर्ग.

बीड जिल्ह्यात विवाह लावून परजिल्ह्यात कामासाठी अथवा इतर कारणांसाठी स्थलांतरित झालेल्या अल्पवयीन मुलींची तिकडे प्रसूती झाली. यावेळी डॉक्टरांनी अहवाल दिल्याने पतीविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तो गुन्हा नंतर बीडमध्ये वर्ग केला. २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत हा आकडा २३ आहे. यात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जालना आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

१८ वर्षांखालील मुलगी गर्भवती असेल किंवा प्रसूती झाली तर त्याचा अहवाल आपण पोलिसांना देतो. मग पुढील कारवाई ते करतात.- डॉ. संतोष शहाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

अल्पवयीन मुलीसंदर्भात काही अहवाल आला तर आम्ही कारवाई करतोच. पण जोपर्यंत अहवाल येणार नाही, तोपर्यंत काही समजणार नाही.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड

प्रेयसीने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप. तरुणीला घरात घुसून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ.


बीड (प्रतिनिधी) खासगी रुग्णालयात काम करणारे दोघेजण तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. परंतु आता तरूणीने फोन न उचलल्याने तिला पहाटेच्या सुमारास घरात घुसून गळा दाबत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिच्या दाजीला ही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास स्वराज्यनगर भागात घडला. याप्रकरणी दारूड्या तरूणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मण सपकाळ (वय २५ रा. सुर्डी ता. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता ही वडवणी तालुक्यातील रहिवासी असून लक्ष्मण व ती एकाच खासगी रूग्णालयात काम करतात. तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे फोनवर ही बोलणे होत असे. लक्ष्मण हा पीडिता सध्या बीडमध्ये राहत असलेल्या किरायाच्या घराकडेही चकरा मारत असे. १२ मे रोजीही तो दारूच्या नशेत होता. मला तुझ्या रूमवर यायचे आहे, असे म्हणत तो पीडितेला त्रास देत होता. तिने सकाळी ये म्हणल्यानंतर ही लक्ष्मण ऐकले नाही.

 पहाटे ४ वाजताच तो पीडितेच्या रूमवर गेला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत गळ्याला पकडून मला चापटाने मारहाण केली. तू माझा फोन रिसिव्ह का करत नाहीस, असे म्हणून मला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडितेने तिच्या दाजीला बोलावून घेतले. यावेळी त्यांनाही तुझा काय संबंध आहे आमच्यामध्ये का बोलतोस, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश!


मुंबई (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिले आहेत की, या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यासाठी एका नवीन खंडपीठाची स्थापना करावी. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SCBC) प्रवर्गांतर्गत वैद्यकीय प्रवेशांसाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर त्वरित नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत

नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश :

या याचिकांवर वेळेत सुनावणी न झाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही. याच कारणास्तव याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश दिलयापूर्वी, जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. न्यायमूर्ती उपाध्याय हे पूर्ण किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते, जे गेल्या वर्षी एप्रिलपासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) कायदा, २०२४ च्या विरोधातील याचिकांवर सुनावणी करत होते. त्यांच्या बदलीमुळे सुनावणी रखडली होती.

विधानसभा निवडणुकां च्या काळात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी. 

याचिकाकर्त्यांनी आगामी शैक्षणिक सत्राची निकड आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यास होणारा विलंब याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. वैद्यकीय प्रवेशाला उशीर होण्याची शक्यता सुनावणीदरम्यान स्पष्टपणे मांडण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य ते निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होतीयाचिकाकर्त्यांचा युक्तिवाद १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाला होता. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास एक तृतीयांश असलेल्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारा २०२४ चा कायदा गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. आता या प्रकरणावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षां च्या नियुक्ती जाहीर.बीडमध्ये जिल्हाध्यक्षा ंची घोषणा रखडली. चर्चांना उधाण.

बीड (प्रतिनिधी) : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां च्या  पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केली आहे. मात्र बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही. याला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या वादाची किनार आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.  

बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या. मात्र भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती झाल्यानंतर बीडमध्ये मात्र अध्यक्ष पदाची निवड रखडल्याचे पाहायला मिळत आहे.  

*जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होणार? 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या जागी शंकर देशमुख यांची तात्पुरती निवड झाली. परंतु आता आता त्यांनाच पुढे कायम केले जाते की आणखी कोणाचे नाव पुढे येते? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

*मुंडे आणि धस यांच्यातील सुप्त संघर्षाची चर्चा. 

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात भाजपाची कमांड मंत्री पंकजा मुंडे यांच्या हातात आली होती. सलग दहा वर्ष त्यांनी जिल्ह्यातील भाजपावर वर्चस्व राखले. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यावर आपले वर्चस्व आणले. परंतु सध्या धनंजय मुंडे अडचणीत आहेत. अशातच जिल्हाध्यक्षांच्या झालेल्या निवडी आणि यापूर्वी मंडळ अध्यक्षांच्या झालेल्या निवडीनिमित्त मुंडे आणि धस यांच्यातील सुप्त संघर्ष दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

*भाजप जिल्हाध्यक्षांची यादी 

सिंधुदुर्ग- प्रभाकर सावंत

रत्नागिरी उत्तर - सतीश मोरे

रत्नागिरीदक्षिण - राजेश सावंत

रायगड उत्तर - अविनाश कोळी

रायगडदक्षिण - धैर्यशील पाटील

ठाणे शहर - संदीप लेले

ठाणेग्रामीण - जितेंद्र डाके

भिवंडी - रवीकांत सावंत

मीरा-भाईंदर - दिलीप जैन

नवी मुंबई- डॉ. राजेश पाटील

कल्याण - नंदू परब

उल्हासनगर - राजेश वधारिया

पुणे शहर - धीरज घाटे

पुणेउत्तर (मावळ) - प्रदीप कंद

पिंपरी चिंचवडशहर - शत्रुघ्न काटे

सोलापूर शहर - रोहिणी तडवळकर

सोलापूर पूर्व - शशिकांत चव्हाण

सोलापूरपश्चिम - चेतनसिंग केदार

सातारा- अतुल भोसले

कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) - राजवर्धन निंबाळकर

कोल्हापूरपश्चिम (करवीर) - नाथाजी पाटील

सांगली शहर - प्रकाश ढंग

सांगलीग्रामीण - सम्राट महाडिक

नंदुरबार - निलेश माळी

धुळे शहर - गजेंद्र अंपाळकर

धुळे ग्रामीण - बापू खलाने

मालेगाव - निलेश कचवे

जळगाव शहर - दीपक सुयवंशी

जळगाव पूर्व - चंद्रकांत बाविस्कर

जळगावपश्चिम - राध्येश्याम चौधरी

अहिल्यानगर उत्तर - नितीन दिनकर

अहिल्यानगर दक्षिण - दिलीप भालसिंग

नांदेडमहानगर - अमर राजूरकर

परभणीमहानगर - शिवाजी भरोसे

हिंगोली - गजानन घुगे

जालना महानगर - भास्करराव दानवे

जालना ग्रामीण - नारायण कुचे

छत्रपती संभाजीनगर उत्तर - सुभाष शिरसाठ

छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय खंबायते

धाराशिव- दत्ता कुलकर्णी

बुलढाणा- विजयराज शिंदे

खामगाव - सचिन देशमुख

अकोला महानगर - जयवंतराव मसणे

अकोलाग्रामीण - संतोष शिवारकर

वाशिम- पुरुषोत्तम चितलांगे

अमरावती शहर - डॉ. नितीन धांडे

अमरावती ग्रामीण (मोर्शी) - रवीराज देशमुख

यवतमाळ- प्रफुल्ल चव्हाण

पुसद - डॉ. आरती फुफाटे

मेळघाट - प्रभुदास भिलावेकर

नागपूर महानगर - दयाशंकर तिवारी

नागपूर ग्रामीण (रामटेक) - अनंतराव राऊत

नागपूरग्रामीण (काटोल) - मनोहर कुंभारे

भंडारा- आशु गोंडाने

गोंदिया- सिता रहांगडाले

उत्तर मुंबई - दीपक बाळा तावडे

उत्तर पूर्व मुंबई - दीपक दळवी

उत्तर मध्यमुंबई- विरेंद्र म्हात्रे

शितल अंगदराव भंडारे हिचे दहावी परीक्षेत 98% मार्क घेऊन यश संपादन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिकशालांत प्रमाणपत्र एस. एस. सी. परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शितल अंगदराव भंडारे हिने 98% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
शितलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे ,शितल लहानपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार असून तिने या यशाचे सर्व श्रेय तिची चिकाटी मेहनत व पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे, हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदानी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ महाराष्ट्र राज्य, श्रीनाथ सेवाभावी संस्था अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्या वतीने शितलचे अभिनंदन करत तिच्या उज्वल भविष्यासाठी रामेश्वर महाराज कोकाटे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या

भीषण अपघात दुचाकीला वाचविताना कार उलटली; तीन ठार तर पाच जखमी.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले. तर एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई – आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली. माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून (एम एच 05 सी व्ही 9186) या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली. यात शौकत अहमद शेख व खय्युम अब्बास अत्तार हे दोघे जागीच ठार झाले. तर शामू जागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती असून या अपघातात जखमी झालेल्या सर्वांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Wednesday, May 14, 2025

दुर्दैवी घटना, सौर पॅनल बसवण्यासाठी आलेल्या अभियंत्याचा खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू.


केज (प्रतिनिधी ): केज तालुक्यातील कानडीमाळी शिवारात मंगळवारी (दि. 13) सकाळी साडे सहाच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी आलेले अभियंता सचिन केरबा गोरे (वय 25, रा. अवंतीनगर, बार्शी रोड, लातूर) खदानीच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.

लातूर येथील सिंकसन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून कानडीमाळी येथील एका क्रेशरवर सौर पॅनल बसवण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू होते. हे काम मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर सचिन गोरे व इतर चार सहकाऱ्यांनी जवळच असलेल्या खदानीत पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोहता न येणाऱ्या सचिन गोरे यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने ते खोल पाण्यात बुडाले.

त्यांचे सहकारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांना वाचवण्यात अपयश आले. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी भेट देत बीडच्या अग्निशमन दलासह खासगी पाणबुड्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. मात्र, मृतदेह सापडला नाही.

११ तासांच्या शोधानंतर मृतदेह बाहेर.

शेवटी माजलगाव येथून आलेल्या खासगी पथकाने गळ टाकून मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली आणि तब्बल ११ तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री १०.३० वाजता सचिन गोरे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. बुधवारी सकाळी केज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी २ वाजता लातूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अग्निवीर म्हणून झाली होती निवड.

सचिन गोरे हे विवाहित असून त्यांची नुकतीच अग्निवीर म्हणून निवड झाली होती आणि लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार होते. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी अपघात त्यांच्या आयुष्याची अखेर घेऊन आला.एनर्जी कंपनीचे संचालक विश्वजीत माने यांनी सांगितले की, सकाळी काम संपल्यानंतर ते लातूरला परतण्याच्या तयारीत होते, त्याच वेळी ही दुर्घटना घडली.

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सीबीएसइ बोर्ड परीक्षेचा शंभर टक्के निकाल.उज्वल निकालाची परंपरा कायम.

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी )दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ,तळेगाव बीड रोड परळी वैजनाथ,   मार्च  2024-2025  मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड  सीबीएससी परीक्षेचा  निकाल जाहीर झाला .या वर्षीही दिल्ली वर्ल्ड  पब्लिक स्कूल ने 100% निकालामध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विशेष प्राविण्यासह  आलेल्या विद्यार्थ्यापैकी परीक्षेस 53 विद्यार्थिनी परीक्षा दिली होती.
           
त्यापैकी नऊ विद्यार्थी उचश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी प्रथम क्रमांक चि. श्री फड 96.20% ,द्वितीय क्रमांक आफlन शेख 96. % ,तृतीय स्नेहा सातपुते 95% कु. अनुष्का केंद्रे 94.20% ,कु. यशस्वी गित्ते 93.40% ,चि. उपेंद्र फड 92.20% ,कु. स्नेहल केंद्रे 92  टक्के, चि. पार्थ जाधव 91.60%, कु. अद्विता धर्माधिकारी 91 टक्के  गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. 

इतर विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह गुण मिळवलेले आहेत. यामधील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री किरण गित्ते साहेब ,सचिव ,त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ.उषाताई किरण गित्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या  यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी वृंद व शिक्षिका कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

राजकीशोर पापा मोदी यांची आदर्श नागरी व आदर्श मल्टी स्टेट सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट.


 *संस्थेचे मार्गदर्शक अँड विष्णुपंत सोळंके यांच्याकडून त्यांचा सत्कार*

परळी वैजनाथ :- येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेला व आदर्श मल्टी स्टेट सहकारी पत संस्था स पीपल्स को बँकेचे चेअरमन  तथा अंबाजोगाई नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजकीशोर पापा मोदी यांनी सदिच्छा भेट दिली.

पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन  सत्कार केला. यावेळी त्यांनी सहकारी चळवळीच्या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आणि संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.  

यावेळी संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबईचे उपाध्यक्ष एडवोकेट विष्णुपंत सोळुंके , श्री . चंद्रशेखर समशेट्टी माजी नगर सेवक तसेच पतसंस्थेचे  व्यवस्थापक शिवलिंग आप्पा मरळे यांच्यासह  कर्मचारी उपस्थित होते. 

या प्रसंगी संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  

यावेळी राजकिशोर मोदी यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेने केलेल्या सत्कार बद्दल आभार व्यक्त केले  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tuesday, May 13, 2025

आकांक्ष दुबे हिचे 95.80% गुण मिळवत दहावीत घवघवीत यश.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी कु. आकांक्षा अमर दुबे हिने 95.80% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

आकांक्षाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून तिने विविध स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी आकांक्षाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.