परळी वैजनाथ ( प्रतिनीधी )-परळी तालुक्यातील पोहनेरच्या गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर,डिग्रस,तेलसमुख,बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासुन मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे तारवण,माजलगाव ढालेगाव अदी प्रकल्प भरली आहेत.तारवण तलावाचे 17 दरवाजे,माजलगावचे 3 दरवाजे व ढालेगाव प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत.यामुळे गोदावरी नदी दोतोंडी वाहत असल्यामुळे परळी तालुक्यातील पोहनेरच्या गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर,डिग्रस,तेलसमुख,बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
शनिवारी वरील प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे पोहनेर येथील गोदावरीला पुर आल्याने पुलाला पाणी लागले आहे.प्रशासनाकडुन महसुल इरिकेशन,पोलीस व गावातील नागरिक मिळुन सतर्कतेसाठी पथक तयार करण्यात आले आहे.पोहनेर,डिग्रस,तेलसमुख,बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांनी सतर्क राहुन प्रशासनाच्या वतिने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment