Tuesday, March 31, 2020

राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा.वीज दरात मोठी कपात.

मुंबई : राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात ५-७ टक्के, व्यावसायिक दरात १०-१२ टक्के आणि औद्योगिक दरात १०-११ टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. नवे दर १ एप्रिल २०२० पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील. तर उर्वरित महाराष्ट्रासाठीचे दर महावितरणकडून कमी केले जातील.

* दरात किती कपात होणार?

मुंबई वगळता महाराष्ट्र 

घरगुती - ५ टक्के

व्यावसायिक - १० - ११ टक्के

उद्योग - ११-१२ टक्के

शेती - १ टक्के

मुंबई 

बेस्टकडून -

घरगुती - दीड ते दोन टक्के

उद्योग - ७ टक्के

व्यावसायिक - ८ टक्के

टाटा-अदानी

घरगुती - ११

व्यावसायिक -११

उद्योग - १०-११ टक्के

*करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना दिलासा

वीज बिल कमी करण्यासोबतच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्योगांनाही दिलासा दिला आहे. सर्व उद्योग सध्या ठप्प असल्यामुळे पुढील तीन महिने कंपन्यांकडून वीज बिल वसुली केली जाणार नाही. यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment