बीड-हवामान खात्याने राज्यात मंगळवारपासून वादळी पाऊसाचा दिलेला इशारा खरा ठरला आहे. बीडमध्ये सायंकाळी 5 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. भर उन्हाळ्यात यंदा वरुणराज्याने दुसऱ्यांदा हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने मंगळवारी बीड, नांदेड, लातूर आणि पुणे विभागातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार हा अंदाज खरा ठरला असून 29 तारखेपर्यंत मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रत्येकानी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment