Saturday, February 27, 2021

माहुर आगारातील प्रकार नादुरुस्त तिकिट मशिन ने घेतला वाहकाचा जीव.बदनामी च्या भीती ने केली आत्महात्या.


* वाहकावरील अन्याय दूर करण्यासाठी लिहली सुसाईड नोट!


नांदेड (प्रतिनीधी ) : माहुर आगारातील एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी उपलब्ध असलेल्या ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त असल्याने तपासणीत कार्यवाही ला सामोरे जावे लागेल,त्यात आपली नाहक बदनामी होईल या भीतीने माहूर आगारातील वाहकाने आज दिनांक २६ रोजी सकाळी एसटी बस मध्ये आत्महत्या केली. वाहकाच्या आत्महत्येला रापम प्रशासन जबाबदार असल्याचे सुसाईट नोट मध्ये नमूद असल्याने मानसिक छळ करणारे ते अधिकारी कोन हे पोलिस तपासात समोर येणार असले तरी नादुरुस्त तिकिट मशिन मुळे संजय संभाजी जाणकार (४९) या वाहकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

माहूर आगारात वाहक म्हणून कार्यरत संजय संभाजी जाणकार (४९) यांनी दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २६ शुक्रवार रोजी उघडकीस आली.सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे यांना एस. टी.बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.४०१५ मध्ये संजय संभाजी जाणकार यांचा दोरीने लटकलेला मृतदेह दिसून आल्याने त्यांनी ही माहिती इतर कर्मचाऱ्यांना दिली.आगारातून मिळालेल्या माहिती वरून पोलीस कर्मचारी विजय आडे,प्रकाश देशमुख यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व सुसाईट नोट हस्तगत केली.आत्महत्या पूर्वी सदर ची सुसाईट नोट कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सप ग्रुप वर वाहकाने टाकल्याने घटना स्थळी रापम प्रशासना विरूद्ध रोष व्यक्त करण्यात येत होता.सुसाईट नोट मध्ये जाणकार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ईटीआयएम मशीन नादुरुस्त असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बिघाड असलेल्या मशिनी द्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहे.व खोट्या अहवालाने निलंबित व सेवेतून बडतर्फ होत आहे.मी सुद्धा दिनांक २४ रोजी माहूर वरून महागाव साठी साडे तीन प्रवासी घेतले,मात्र मशिनित बिघाड असल्याने साडे तीन ऐवजी एक तिकीट प्रिंट झाली.ती ही अपंगा साठी असलेली तिकीट बाहेर आली.हे सारा प्रकार सुरू असताना धनोडा पर्यंत गाडी पोहचली.परिणामी तपासणीत माझ्यावर केस दाखल झाली. आता मला निलंबित केले जाईल,सोयरे, धायरे,व भावकी आणि रापम कर्मचाऱ्यात माझी बदनामी होईल,प्रत्येक जण मला चोर समजेल.मी रापम मध्ये चार वर्ष प्रामाणिक सेवा केली आहे.त्या मुळे माझी बदनामी होईल. आगारात सदर ची मशीन चेक केली जाईल,बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल.व मला दोषी ठरविले जाईल.मशीन योग्य असती तर तिकीट योग्य निघाली असती माझी बदनामी झाली नसती.माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे. आगारातील ५० टक्के मशीन नादुरुस्त आहेत.आदिलाबाद, किनवट साठी देण्यात येणाऱ्या मशिनी तर पूर्ण नादुरुस्त आहे.मशिनित डिस्प्ले होत नाही.अंधार असतो.त्या मुळे ना टप्पा दिसतो ना तिकीट… ना..प्रवास भाडे…. वाहकाने आपली कामगिरी कशी करावी,गाडी तपासणीत चूक आढळल्यास केस बुक होते,मशिनित बिघाड असल्याने वाहक दोषी कसा..? रापम प्रशासनाने योग्य मशीन देणे,व प्रशासनाने वाहका वरील अन्याय दूर करावे असे नमूद केल्याने दिनांक २४ रोजी गाडी तपासणी दरम्यान तपासणी अधिकाऱ्याने केलेल्या मानसिक छड व बदनामी च्या भीती ने जाणकार यांनी आत्महत्या केल्याचा एकच सुर बस स्थानक परिसरात होता. सदर प्रकरणी माहूर पोलीस अधिक तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment