Friday, April 24, 2020

कर्तव्यदक्ष पालकत्व व प्रशासनाच्या कडक काटेकोर नियोजनामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने .


*पालकमंञी ना.धनंजय मुंडे ,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या प्रयत्नांना यश.

“कोरोना” या महामारीला संपुर्ण विश्व झुंज देत आहे. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा दैनंदिन वाढत आहे.महाराष्ट्रात 6 हजाराच्यावर कोरोनाग्रस्तांचा धक्कादायक आकडा वाढला आहे.देशात सर्वात जास्त संख्या असलेलं आपलं राज्य बनलं आहे.मृतांचाही आकडा दररोज वाढतोय. शासन, प्रशासनासमोर मोठं संकट निर्माण झाले आहे.
बीड जिल्हयासाठी पालकमंञी म्हणुन लाभलेले ना.धनंजय मुंडे हे लाॕकडाऊनच्या सुरुवाती पासुनच जिल्ह्यात तळ ठोकुन आहेत.राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन यांनी जाहिर केलेल्या लाॕकडाऊनच्या संदर्भातील सुचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत सातत्याने संपर्कात राहुन नियोजनबध्द नियम पालनामुळे आपण कोरोनाला हरवु शकतो हे सिध्द केले आहे.दरम्यान लाॕकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कोणीही नागरिक उपासमारीचा बळी पडु नये यासाठी जिल्ह्यात रेशन पुरवठा विभागाला दिलेल्या सुचना अतिशय महत्वाच्या ठरत आहेत. जिल्ह्यात वास्तव्यात असलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केलेच परंतु उसतोडीसाठी बाहेर गेलेल्या उसतोड मजुरांना जिल्ह्यात आणि आपल्या घरी परत आणण्यासाठी शासन दरबारी केलाला प्रयत्न यशस्वीपणे पार पाडला आहे. धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाणच्या वतिने गहु,तांदुळ,तेल,साखर,साबण, चहा पत्ती अशा जीवनावश्यक विविध वस्तुंचे वस्ती तांड्यावर असलेल्या गरजवंताना वितरण करुन खरं पालकत्व काय असतं हे निदर्शनास आणुन दिले आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना आपल्या फळ-भाज्या विक्रीसाठी या लाॕकडाऊनच्या नियमावलीमुळे अडचण निर्माण झाली होती तेंव्हा स्वतः च शेतकऱ्यांचा फळ भाजीपाला खरेदी करुन गरजुंना वितरीत केला. अशा संवेदनशील ना.धनंजय मुंडेंच्या या विवेकी प्रयत्नामुळे लाॕकडाऊन काळात ही जिल्हा समाधान व्यक्त करत आहे.
अहमदनगर येथील कोरोना बाधित असलेल्याशी संपर्कात आलेला आष्टी तालुक्यातील एक व्यक्ती पाॕझिटिव्ह आला होता.त्यामुळे जिल्हा हादरला होता. पालकमंञी म्हणुन प्रशासनाला परत सतर्क राहण्याच्या सुचना ना.धनंजय मुंडे यांनी देऊन आष्टी तालुक्यातील पिंपळगाव व परिसरावर लक्ष केंद्रित केले. तो रुग्ण ज्या गावात वास्तव्यास आला त्या परिसराला सिल करुन प्रत्येकाच्या चाचण्या करण्याच्या सुचना देऊन कोरोना टेस्ट केल्या परंतु सुदैवाने एकही बाधीत आढळुन आला नाही. शिवाय जो पाॕझिटिव्ह होता त्या रुग्णांच्या दोन्हीही टेस्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा समाधान व्यक्त करत आहे.महसुल,पोलिस आणि आरोग्य प्रशासनाला योग्य सुचना आणि प्रशासनाने केलेल्या नियोजनाला आलेले हे यश आहे. यापुढेही जिल्हावासीयांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन योग्य पध्दतीने केल्यास कोरोनाला जिल्ह्यात शिरकाव करता येणार नाही.पालकमंञी ना.धनंजय मुंडे ,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या प्रयत्नांना यश येत आहे.नागरिकांनीही कोरोनाला हरवण्यासाठीच्या संघर्षात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment