नातेवाइकांकडे बोट दाखवून पोलिसांचे हात वर‘
नातेवाईकांनी अद्याप तक्रार दिली नाही,’ असे कारण पुढे करून पोलिस वेळ मारून नेत आहेत. मात्र, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, मृताजवळ सापडलेली चिठ्ठी हाच ‘मृत्यूपूर्व जबाब’ मानून पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करू शकतात. असे असतानाही पोलिसांची टाळाटाळ संशयास्पद वाटत आहे. दरम्यान, पोलिस आता जाधवर आणि फाटे यांचे मागील एक वर्षाचे कॉल रेकॉर्ड तपासणार आहेत.
बीड नगरपालिकेचे कर्मचारी अविनाश धांडे यांनी पालिकेच्या छतावरच गळफास घेतला होता. त्यांच्या मोबाइलमध्ये डीपीओ संभाजी वाघमारे, तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे, उपमुख्याधिकारी सम्राट कदम, विश्वंभर तिडके व चंदू काळे यांच्या त्रासाचा उल्लेख होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांची तक्रार नसल्याचे कारण सांगत कोणावरही कारवाई न करता हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले आहे. त्यामुळे येथेही पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली.
तपास सुरू आहे.
नातेवाईक पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत. ते तक्रार देण्यासाठी येणार आहेत, असे समजले. परंतु मी शासकीय कामानिमित्त अंबाजोगाईला आलो आहे. चौघांची चौकशी झाली असून आणखी काही लोकांची करत आहोत. पंचनामाही झाला आहे. सर्व तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.- बाळराजे दराडे, सहायक पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण
No comments:
Post a Comment