Thursday, January 29, 2026

राजकारणात रोखठोक बोलणारा निर्णया वर ठाम राहणारा आणि जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख - सौ वर्षा मगर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी  समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा, रोखठोक स्वभावाचा आणि जे बोलेल ते करून दाखवणारा नेता आपण गमावला, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणा, कठोर निर्णयक्षमता आणि प्रशासकीय अनुभवासाठी ओळखले जात होते. सामान्य माणसाच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती. सिंचन, पायाभूत सुविधा, शेती, विकासकामे यामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आजही स्मरणात राहतील. 
या दुःखद घटनेनंतर कांतीकारी साथी चे मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनाच्या अध्यक्षा सौ. वर्षा मगर  आई साहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या वतीने श्री हनुमंत मगर यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना सौ वर्षा मगर  म्हणाले की, “राजकारणात रोखठोक बोलणारा, निर्णयावर ठाम राहणारा आणि जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.” यावेळी संस्थेचे व संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ईश्वरचरणी दिवंगत आत्म्यास शांती लाभो तसेच पवार कुटुंबीयांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली. 

No comments:

Post a Comment