*राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर रस्ताकामासही प्रत्यक्षात सुरूवात.
बीड (प्रतिनिधी) बीड शहरासह जिल्हाभराच्या दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या नगर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम तांत्रिक बाबींमध्ये अडकल्याने व न्यायालयात प्रकरण चालू असल्याने अडकले आहे. काम सुरू करण्यास उशीर होत आहे. तसेच दिवसेंदिवस रस्त्याची अवस्थाही बिघडत चालली आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांना होणारा असह्य त्रास कमी करण्यासाठी तात्काळ पाऊले उचलत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच शहरातील वाहतूकीच्या अनुषंगाने मुख्य असलेल्या बायपास टू बायपास रस्त्यातंर्गत असलेल्या राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर पर्यंतच्या रस्ताकामालाही प्रत्यक्षात सुरूवात केली.
No comments:
Post a Comment