*ग्रामीण विकास विभागाने तीन वेळेस चौकशी समिती नेमूनही बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे दक्षता पथका कडून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची चौकशी केली जात नाही ?
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात भाजप-सेनेच्या सरकारच्या काळात सन २०१६ ते २०१८ च्या दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत १०१ कामे बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी २.९९ टक्के ते ४.९९ टक्के वाढीव दराने ९१ कामे दिली असून कमी दराने १.९९ ते १७.८६टक्के १० कामे आहेत यामध्ये ग्रामीण विकास सचिव व्ही आर नाईक सचिव ग्रामीण विकास विभागांतर्गत टीमने घोटाळा केलेला आहे.सर्व पुरावे शासनाकडे ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिलेले आहेत .शासनाने क्रमांक:मुग्रायो_२०२०/प्र.क्र २३०/बांध ४ दि१६/१०/२०२० ला चौकशी करण्याकरिता अध्यक्ष मुख्य अभियंता पुणे सचिव राज्य गुणवत्ता समन्वयक पुणे सदस्य कार्यकारी अभियंता सोलापूर सह नेमणूक केलेली होती, परंतु ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी चौकशी समितीवर आक्षेप नोंदवला आणि चौकशी समिती हीच भ्रष्टाचारी आहे असा आरोप ग्रामीण विकास मंत्री व प्रधान सचिव कडे विनंती निवेदनाद्वारे करून परत विशेष पथक नेमण्यात साठी मागणी केली तात्काळ परिपत्रक( १) क्रमांक मोग्रायो-२०२१/प्र.क्र.३३५/बांधकाम-४ दि ३/६/२०२१ ,(२) क्रमांक मुग्रायो.२०२०/प्र. क्र.२३०/बांध_४दि.१४/६/२०२२ तसेच ,(३)समरण पत्र क्रमांक. मुगायो.२०२०/ प्र .क्र.२३०/बांध._४,दि.१४/९/२०२२ ने बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे दि.७/९/२०१९ व दि.९/९/२०१९च्या निविदा प्रक्रिया संदर्भात सर्वच काम तपासण्या करिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि. १७/९/२०१९ च्या परिपत्रका प्रमाणे मुख्य अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे अध्यक्ष आणि इतर सर्व अधीक्षक अभियंता औरंगाबाद, अधीक्षक अभियंता पुणे, कार्यकारी अभियंता जालना, आणि कार्यकारी अभियंता बीड महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील सर्वच कामे तात्काळ तपासण्यासाठी निविदा प्रक्रिया संदर्भात चौकशी करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबत प्रवीण जैन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी माननीय राज्यपालाच्या मान्यतेनुसार आदेश देण्यात आलेले आहे अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे . महाराष्ट्र राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेले रस्तेची करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली याचा गैरफायदा अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालेला आहे .सर्व नियमाला बगल देऊन कामे न करतात बिले उचलेले आहेत. एकही कामाचा रस्त्यातील अंदाजपत्रकाच्या नियमाप्रमाणे कामे झाले नाहीत, तसेच साईट पट्ट्या चे काम झाले नाही ,झाडे लावले नाहीत, रोड नाल्यावर चे कामे नियमानुसार केली नाहीत .पुलाची कामे अर्धवट आहेत, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे ५ वर्षे करता दुरुस्तीसाठी शासनाने त्यांच्या निविदेमध्ये तरतूद केलेली आहे .त्या प्रमाणे कुठेही रस्ता दुरुस्त केला जात नाही. सर्व बाबी अधिकाऱ्यांशी संगनमत करून गुत्तेदार यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला असून अतिवृष्टी व पावसामुळे सर्व रस्ते उखडलेले आहेत. त्यामुळे तात्काळ शासनाने चोकशी समिती नेमली आहे. सर्वच कामाचा कालावधी संपलेला असूनही आजतागायत कामे केलेली नाहीत,त्याकरिता तात्काळ दक्षता पथकाने मुद्दे निहाय चौकशी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली .
No comments:
Post a Comment