मुंबई – कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना झालेला त्रास लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने मार्चमध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणार आहेत,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली .
इयत्ता १२ वी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. तर इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे
No comments:
Post a Comment