आष्टी (प्रतिनिधी) ऊस तोडीसाठी गेलेल्या 26 वर्षीय मजुराचा अंघोळ करताना तलावात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.22) संध्याकाळी उघडकीस आली.
आष्टी तालुक्यातील कडा येथील मनोज कवडे वय 26 वर्ष हा अविवाहित तरूण अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीचे काम करतो. सध्या सिध्दटेक येथे मजूरांचा फड ऊसतोडणीसाठी आलेला आहे. दरम्यान गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मनोज कवडे जवळच असलेल्या तलावावर एकटा अंघोळीसाठी गेला होता.अंघोळ करत असताना अचानक पाय घसरल्याने तो तलावात बुडाला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. मनोज उशिरापर्यंत परत न आल्याने इतर मजूरांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा तलावाच्या कडेला त्याचे कपडे आढळून आले. पाण्यात बूडाल्याचा संशय येताच शुक्रवारी सकाळपासून ग्रामस्थांसह इतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तलावात शोध मोहीम सुरू केली.शुक्रवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा कडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment