Tuesday, February 28, 2023

जल जीवन मिशन भ्रष्टाचार प्रकरण जिल्हा परिषदेच्या अधिका-यांसह कर्मचा-यांना शिस्तभंगाची नाेटीस अन्य शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ.

बीड (प्रतिनिधी) दुष्काळी बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी बीड जिल्हा परिषदेच्या दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत.  जल जीवनमधील अनियमितता उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तब्बल 1300 गावांमध्ये हर घर जल, हर घर नल यानुसार जल जीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रकल्प संचालक आणि अधिकारी कर्मचारी यांनी मर्जीतील लोकांना टेंडर देत कोट्यवधी रुपयांचा अपहार आरोप होत आहे.

बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी दोन उपअभियंता, जिल्हा दक्षता प्रमुख, चार शाखा अभियंता, दोन वरिष्ठ सहायक आणि एक सहायक लेखाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

यामध्ये उपअभियंता एस. यु. खंदारे, उपअभियंता एम आर लाड, जिल्हा दक्षता प्रमुख नामदेव उबाळे, शाखा अभियंता ए. बी. तांदळे, पी. डी. शिंदे, जी. आर. खोसे, एस. एन. सारणीकर, वरिष्ठ सहायक व्ही. डी. आनेराव, एस. बी. चव्हाण आणि सहायक लेखाधिकारी बी. टी. वीर यांना शिस्तभंगाची कारवाई बाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठराविक गुत्तेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी नियमबाह्य पध्दतीने काम केले. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. टेंडरमध्ये स्थानिक आणि नातेवाईक यांना लाभ मिळावा म्हणून बदल केले. 

आपल्याच नातेवाईक यांना शंभर ते दोनशे कोटींचे कामे वाटप केली. ठराविक गुत्तेदारांना लाभ देण्यासाठी तीन पेक्षा अधिक कामांचे वाटप केले. आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासनाचे नुकसान केले असे दोषारोप संबंधितांवर ठेवण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment