*चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळक्याला हटकल्याच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याचा दोन तरुणावर चाकू हल्ला...
संदीप लिंगायत आणि अक्षय गवळी अशी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. संदीप आणि अक्षय एका लग्न समारंभातून घरी परतत असताना त्यांना पाच ते सहा जणांची टोळी संशयित रित्या फिरताना आढळून आली. त्यांनी त्या टोळक्याला हटकले असता या टोळक्यातीळ पाच ते सहा संदीप आणि अक्षय या दोन्ही तरुणांना जबर मारहाण करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
या हल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका तरुणांची प्रकृती चिंताजण असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकसून देण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
No comments:
Post a Comment