Monday, November 28, 2022

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चामध्ये. तथ्य नसल्याचं राजभवनाकडून माहिती.


*भगत सिंह कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याचे संकेत दिल्याची माहिती समोर येत होती.


मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी गेल्या काळापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत. विरोधकांनी तर त्यांना हटवण्यासाठी आंदोलनं सुरु केली आहे. याचा पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं राजभवनाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

राज्यपाल यांच्याबाबत माध्यमांमध्ये येणारी बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे. 

राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती. राज्यपालांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरु आहेत.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान शिंदे गटानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे.


No comments:

Post a Comment