सोलापूर (प्रतिनिधी) लम्पी आजाराने सोलापूर जिल्ह्यात ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू झाल्यानं पशुपालकांची चिंता वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात ७ लाख ४५ हजार ३२४ गाय वर्ग जनावरे आहेत. त्यातील बाधित गावांची संख्या ७५८ इतकी आहेत. बाधित पशुधन संख्या १० हजार ३५८ असून, ४ हजार ५८ पशुधन बरे झाले आहे. मृत पशुधन संख्या ५८२ पेक्ष्या इतकी आहे.
सध्या बाधित असणारे पशुधन ५ हजार ७१८ आहे. अत्यवस्थ पशुधन २९३ आहेत. करमाळा तालुक्यातील बाधित जनावरे असणारे ईपी सेंटर वीट, राजुरी, सावडी, केडगाव, भिलारवाडी, भाळवणी, करमाळा, हिसरे, केम, गुळसडी, बोरगाव, उत्तर वडगाव, करंजे, साडे, हिंगणी, गौंडरे आणि झरे ही आहेत.
लम्पी’ जनावरांच्या आजारामुळे अफवांचा बाजारदेखील भरत आहे. त्याचा विपरीत परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला. गैरसमजुतीतून गायीच्या खुल्या दुधापासून ग्राहक दुरावा ठेवून आहेत. त्यामुळे विक्री न होणाऱ्या दुधाचे करायचे काय, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला. अगोदरच जनावरांमधील ‘लम्पी’ आजारामुळे पशुचालक चिंतेत असताना आता अफवांमुळे दुध विक्री होत नसल्याने त्यांना दुसऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक मृत्यू माळशिरस तालुक्यात १९९ जनावरे मृत झाली असून, त्या खालोखाल करमाळा तालुक्यातील १६८ जनावरांचा समावेश आहे. करमाळा तालुक्यात सप्टेंबर महिन्यापासून जनावरांना लम्पी स्किनचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला एक दोन असणारी बाधित जनावरांची संख्या वाढत गेली. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment