महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. शाळा-महाविद्यालयीन परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, आता कोरोनाचे संकट ओसरलं असून, यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहेत..
दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर आता लवकरच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. यंदा ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रति तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. अर्थात, हा जास्तीचा वेळ फक्त उन्हाळी (मार्च/ एप्रिल- 2022) परीक्षेपुरताच असणार आहे.
No comments:
Post a Comment