मंगळवेढा (प्रतिनीधी) मंगळवेढा तालुक्यात तांडोर-मिरी येथे सुरू असलेल्या वाळू ठेक्यातील एक ट्रॅक्टर नदीत पाणी असताना देखील वाळू वाहतूक करत होता. वाळू घेऊन येताना तो ट्रॅक्टर पाण्यात अडकला व चालकाने ट्रॅक्टर पाण्यात सोडून तेथून पळ काढला.दरम्यान, चालकाने पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला.
सध्या उजनी तून सोडलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीत पोचले आहे त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. वाळू ठेकेदाराने एवढे मोठे धाडस करून वाळू उपसा सुरू केला असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेची दखल जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थामधून होत आहे.

No comments:
Post a Comment