Wednesday, April 28, 2021

धनु्भाऊ तुम्ही फक्त परळीचे नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात.परळी सोडुन जिल्हात लक्ष द्या.- अशोक हिंगे


बीड :-( प्रतिनिधी) 28 बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर माजला असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे  हे फक्त परळी येथे ठाण मांडून बसले असून बाकीचा संपूर्ण बीड जिल्हा वार्यावर सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. 
      लाॅकडाऊन झाले तरी बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या कमी होताना दिसत नाही. शासकिय आणि खाजगी रूग्णालयात ही आॅक्सीजन, बेड उपलब्ध नाहीत,व्हेटिलैटर अभावी रुग्णाचे जीव जात आहेत. गेल्या तीन दिवसांत एक हजार च्या आसपास इंजेक्शन ची आवश्यकता असताना फक्त दोनशे चाळीस इंजेक्शन उपलब्ध झाले. आज इंजेक्शन अभावी अनेक रूग्णांना जिव गमवावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनान नवीन पाचशे बीडचे अद्यावत रूग्णालय उभारण्याची घोषणा करत पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच नाही. जिल्हा रुग्णालयात ही कर्मचारी संख्या कमी पडत असून साफसफाई स्वच्छता याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन यांच्यात ताळ मेळ नाही.
अशा परिस्थितीत मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री या. धनंजय मुंढे यांनी प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन पहाणी केली असती तर त्यांना ढिसाळ नियोजन दिसुन आले असते. पालकमंत्र्यांनी लक्ष घातले तर रेमडीसिवीर ईंजक्शनचा कोटा वाढवून मिळेल.तेव्हा अजुनही वेळ गेलेली नाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन रेमडीसिवीर इंजेक्शन ,आॅक्सीजन पुरवठा नवीन रुग्णालयाची उभारणी, लस उपलब्धता यात जातीने लक्ष घातल्यास रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल..
अन्यथा यापेक्षाही जास्त परिस्थिती बिघडल्यास त्यास पालकमंत्री आणि जिल्हाप्रशासन जबाबदार असतील असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment