त्याचबरोबर प्रकल्पात असणारे काळवीट, ससे, रानडुकरे, मुंगूस यासह दोन गाई होरपळल्या आहेत. यासह परिसरात असणारे ठिबक, तुषार संच, सोलर देखील जळून खाक झाले आहे.
तर ही अचानक लागलेली भीषण आग सर्पराज्ञी परिसरात शेती असणाऱ्या शेतकरी सुदाम लव्हाळे यांच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचं समोर आलंय. शेतकरी सुदाम लव्हाळे यांनी त्यांचा बांध पेटवला होता.
या दरम्यान अचानक जोरदार वारा आल्याने ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. बघता बघता रौद्र रूप घेतलेल्या या आगीने सर्पराज्ञी परिसराला आग लागली. यामध्ये ही दुर्घटना घडल्याचं सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment