Monday, April 24, 2023

केज तालुक्यातील कौडगांवात रूजतायेत समताधिष्ठित मुल्यांची पाळेमुळे. सुरुवात होतेय महामानवांची 132 वी सार्वजनिक जन्मोत्सवातुन.


  *महामानवाच्या जयंती उत्सवात पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित रहावे- युवा जनशक्ती गृप कौडगांव* 

केज (प्रतिनिधी) :- शिव, फुले,शाहू ,आंबेडकर , अण्णाभाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि तो देशभरात ओळखला जातो हे खर आहे आणि याच देशात आणि ह्याच पुरोगामी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात कवडगाव असे खेडेगाव आहे की जिथे शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्याचे ठरविले जाते ते प्रत्यक्षात उतरवून  जयंती उत्सवात जातीचे बंधणे झुंगारून महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधून न ठेवता गावातील गावगाड्यातील सर्व समाज सर्व स्तरातील लोक सहभागी होतात महापुरुषांना मानवंदना देतात आणि हा लोकोत्सव साजरा करतात.
असाच प्रत्यय व तीच भूमिका घेऊन गावातील समविचारी समाजबांधवांनी एकत्रित येऊन ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या थाटामाटात सार्वजनिक आणि नागरी स्वरूपात दोन दिवसीय साजरे करण्याचं नियोजन केलं आणि हे नियोजन हा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने गावातील गावगाड्यातील लोकांचा एक सण आणि लोकोत्सव ठरणारा आगळा वेगळं नियोजन करून 26एप्रिल ते 27 एप्रिल 2023 या दोन दिवशीय केलं आहे.
एके काळी कौडगाव मध्ये मातंग ,महार विरूद्ध गावातील बाकीचा सर्व जातीय समाज हा संघर्ष नेहमी पहायला मिळायचा काही अपवादात्मक लोकांच्या डोक्यातील जातिय मानसिकतेची किडे वळवळ करून गावात दोन्ही गटात भांडणे व्हायची यात पोलिस केस ,कोर्ट कचेरी होऊन ,ऍट्राॅसिटी ऍक्टनुसार  वर्षात किमान एक तरी गुन्हा नोंद व्हायचा व गावात तणावपूर्ण वातावरण रहायचे परंतू काळाच्या ओघामध्ये परिवर्तनाची नांदी ठरून लोकांच्या मानसिकतेत बदल होऊन एकोप्याची भावना निर्माण झाली आहे 
   त्याला एक मुख्य कारण आहे गेली एक दशक गावामध्ये भीतीच दबावाचं आकसदायी राजकारणाचा प्रवाह वाहत होता आणि या राजकारणाच्या प्रवाहात भरडला जात होता गावातील सर्वसामान्य नागरिक, गावातील लोकांना सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठीची एकप्रकारची मुभाच नव्हती असं जाणिवपूर्वक नमूद करावेसे वाटते.
 लोक भीतीपोटी सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाहीत याचं मुख्य रोख जात होता गेली दहा वर्षे सत्ता भोगत  असलेल्या राजकारण्यांना आणि त्यांच्या बगलबच्चांना त्याचं कारण असं की सत्ताधारी जरी बाहेरच्या तालुक्यांमध्ये किंवा दुसर्या जिल्ह्यामध्ये राहत असले तर त्यांची बगलबच्चे मात्र गावांमध्ये सतत भांडण लावून देण्याचे आणि गावातील लोकांना त्रास देण्याचे काम करायचे,माजी सत्ताधारी त्यावेळी सरपंचांच्या खुर्चीवर विराजमान असलेल्या सरपंच पती नेहमी बाहेरगावची ,परळी,केज,बीड शहरातील टवाळखोर गुंड प्रवृत्तीचे लोक आणून गावातील लोकांना मोगमी अर्वाच भाषेत धमाकून दहशत निर्माण करायचे ती दहशत निर्माण होऊन  त्यातून गावामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते लोक सार्वजनिक ठिकाणी जास्त थांबायचे नाहीत सार्वजनिक ठिकाणी जास्त वेळ न थांबता आपापले काम करण्यासाठी शेतात निघून जायचे पण म्हणतात ना काळाच्या ओघांत एक ना एक दिवस कोणालाही पडद्याआड व्हावंच लागतं व जणता त्यांना एक ना एक दिवस हिसका दाखवतच असते म्हणून  2023 च्या कौडगाव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणूकीत  या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमताने एकत्र येऊन माझी सत्ताधाऱ्यांना इंगा दाखवून त्यांना घरी बसवण्याचं काम या कौडगावतील सुज्ञ जनतेने केलं  तरीही माजी सत्ताधाऱ्यांना पराभव पचनी पडलाच नाही मतदानाच्या दिवशी तर धिंगाना केलाच परंतू निकालानंतरही पोलिसांच्या उपस्थितीत शांतता पूर्ण विजयी मिरवणूकीत मिरवणूकीत सहभागी लोकांना शिविगाळ करून कुरापती काढण्याचं काम केलं होतं परंतू पुढील बाजूच्या व पोलिसांच्या सामंजस्य भूमिकेमुळे वाद पेटला नाही   पण शेवटी जनतेने घरचा आहेर दिलाच हे खरे.
   खऱ्या अर्थाने गावकऱ्यांची कातीनच निघून गेली असल्याची जनभावना सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त होतं आहे.
ह्याच मोकळ्या वातावरणातून गावातील सर्व स्तरातील लोक विविध उपक्रम , कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात साजरे करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 गावात भांडण तंटा नाही लोक  गुण्यागोविंदाने नांदत असून   वेगवेगळ्या कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरे करून गावाचा एकोपा टिकून ठेवण्याचे काम येथील जनता करत आहे त्याचाच एक भाग म्हणून भव्य दिव्य ज्ञानसूर्य डॉ ‌बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जन्मोत्सव साजरा होत आहे आणि ह्याच जन्मोत्सवामधील कार्यक्रमांचा एक भाग म्हणून गावातील मुळ भुमिपुत्र असलेले परंतू विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून आपलं समाजपयोगी योगदान देणार्या मान्यवरांचा नागरि सत्कार करून त्यांना प्रेरणा मिळावी अशाही कार्यक्रमाचं नियोजन दिनांक 26 एप्रिल रोजी करण्यात आले असून प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा नियोजन करून दुसर्या दिवशी सकाळी सार्वजनिक सामुदायिक बुद्धवंदना व ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असून दुपारी भव्य मिरवणूक निघणार असून त्यानंतर स्नेहभोजनाच कार्यक्रम होऊन रात्री प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे तरी या सदर  आगळ्या वेगळ्या कार्यमाला पंचक्रोशीतील हजारो जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा जनशक्ती गृप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*-जेव्हा समाजामध्ये समानता एकत्र असण्याची भावना समान विचार समान चेतना लोकांमध्ये एकमेकांबद्दल संवेदना असेल तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल ही बाबासाहेबांची समताधिष्ठित राष्ट्र संकल्पना होती हाच विचार आम्ही उराशी बाळगून ह्या वर्षीपासून दरवर्षी शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांची जयंती एकत्रित साजरी करून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार आहोत आणि याची सुरुवात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची132 वी सार्वजनिक नागरी जयंती उत्सव साजरा करून नव्याने सुरुवात करत आहोत तरी बनसारोळा,होळ जि.प. सर्कल मधील तसेच केज तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील जनतेला आवाहन करत आहोत की त्यांनी या जयंती उत्सवात सहभागी व्हावे.

       

No comments:

Post a Comment