Saturday, February 26, 2022

महावितरणचं सुलतानी धोरण अनं शेतक-यांच मरण.ज्वारी काढणीची लगबग .

ग्रामिण भागात सध्या ज्वारी काढणीची लगबग असुन मध्यंतरी सरसकट विज कनेक्शन तोडुन ठराविक रक्कम भरल्याशिवाय जोडणी नाही या सुलतानी हट्टापायी डिसेंबर-जानेवारीत विहीरींना पाणी असूनही भिजणं झालं नाही त्यामुळेच कणसं भरली नाहीत, त्याचबरोबर महावितरण आधिकारी-कर्मचा-यांकडुन सर्वांनी १०० टक्के विजबिल वसुलीनंतरच जोडणी करण्यात येईल यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या काही शेतक-यांकडुन विजबिल तात्काळ न भरण्याचा फटका बसला त्यामुळेच उत्पन्न कमी निघाल्याची खंत मौज. मुळुक ता.जि.बीड येथील शेतकरी पांडुरंग ढास यांनी बोलाऊन दाखवली, सध्या मजुर मिळत नाहीत, प्रत्येकजण आफापल्या शेतातच गुंतलाय त्यामुळे भंडारवाडी येथील महिला मजुर आणल्या आहेत प्रति मजुरी महिला ३०० रूपये आणि जाण्यायेण्याचे भाडे १५०० रूपये वेगळेच. 

महावितरणकडुन वसुली जोरात मात्र सुविधा नाहीत अन रात्रीचं भिजवणं जीवाला घोर
___
महावितरणकडुन ज्या प्रमाणे सक्तीची विजबिल वसुली केली जाते मात्र जळालेला ट्रान्सफाॅर्मर बदलुन आणण्यापासुन फ्युज टाकण्यापर्यंत सगळी कामं आणि त्यासाठी लागणारा खर्च शेतक-यांनाच करावा लागतो. कर्मचारी तालुक्यावरून येजा करतात मुक्कामी रहात नाहीत, भिजण्यासाठी  रात्री दारे धरावे लागतात रात्री ११ ते पहाटे ३ अशी लाईट सुरू असते या कालावधीत विंचु काट्यापासुन सर्पदंशाच्या घटना घडल्याची उदाहरण आढळुन येतात मात्र शेतक-याच्या जीवाला जरी घोर असला तरी महावितरण आधिकारी-कर्मचा-यांना त्याचं काहीही घेणं देणं नसतं. 



No comments:

Post a Comment