Saturday, February 26, 2022

धारूर तालुक्यातील डाॅक्टर मुलगी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात स्ञीरोग तज्ञ म्हणुन रूजु.


 तेलगाव (प्रतिनिधी) ज्या बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे अशा जिल्ह्यातील असलेल्या  धारूर तालुक्यातील आम्ला येथील डाॅ. रजनी जनकराव कदम औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात स्ञीरोग तज्ञ म्हणुन नुकत्याच रूजु झाल्या. याबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. 
         धारूर तालुक्यातील डोंगरपट्ट्यात असलेल्या आम्ला येथील माजी सरपंच तथा सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जनकराव कदम यांची डाॅ. रजनी जनकराव कदम हिने ग्रामीण भागात आम्ला येथे आपले प्राथमिक शिक्षण घेऊन, पुढील शिक्षण लातुर व इतरञ घेतले.ग्रामीण भागातील मुली गावात असलेल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण सहसा घेत नाहीत.मात्र रजनी हिने प्रथम पासुनच उच्च शिक्षण घेऊन,डाॅक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याचे ठरवले होते.तीन महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून वैद्यकीय शिक्षण पुर्ण करत डाॅक्टर झाली.स्ञीरोग डाॅक्टर झाल्यानंतर याच विषयात तिने एम.डी.करावी असे आ.प्रकाश दादा सोळंके यांनी सांगत तिचा एम.डी.साठीचा होणारा सर्व खर्च आ.सोळंके यांनी केला. ग्रामीण भागातील महिलांत पोटाच्या आजारासह इतर आजार असतात.त्यामुळे तीने स्ञीरोग डाॅक्टर होण्याचे ठरवत. यामध्ये एम.डी. केली.बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. यावर नुकतीच मोठी चर्चा झाली.माञ रजनी हीने मुलगी काय करू शकते.हे यातुन दाखवत देत एम डी डाॅक्टर होऊन, तीने स्वतः सह आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण तर केलेच शिवाय आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव लौकीक केले.डाॅ. रजनी हीची नुकतीच औरंगाबाद येथील घाटी शासकीय रूग्णालयात स्ञीरोग तज्ञ म्हणुन नियुक्तती झाली.याबद्दल डाॅ. रजनी जनकराव कदम हिचे तिचे आ.प्रकाश दादा सोळंके, मा. धैर्यशील काका सोळंके, सभापती जयसिंह भैया सोळंके,  वडील जनकराव कदम, आई, भाऊ यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

No comments:

Post a Comment