परळी वैजनाथ (प्रतिनिधी)शहरातील न.प.वॉर्ड क्र.16 मलिकपुरा, इदगाह जवळ असलेली महावितरणची डि.पी.एका बाजूने पूर्णपणे झुकली असून जास्तीचा पाऊस व जमिन खचल्यास सदरची डि.पी.नजीकच्या नागरी वस्तीवर कोसळून रहिवाशांच्या जीवीतास धोका होण्याची शक्यता आहे. महावितरणने सदरची धोकादायक डि.पी.येथून हटवावी किंवा दुरूस्त करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी महावितरणला निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलिकपुरा इदगाह पायरीजवळ संतराम ढाकणे यांच्या घराजवळ महावितरणची डि.पी.असून झुकलेल्या डि.पी.च्या समोरच अनेक पत्राचे घरे आहेत. येथे राहणारे नागरिक हे मजूर असून डि.पी.झुकल्यामुळे तसेच वादळ वार्यामुळे कोणत्याही क्षणी झुकलेली डि.पी.समोरच्या पत्र्याच्या घरावर पडून खूप मोठी जीवीत हानी होणार आहे. या जीवीत हानीस संपूर्णपणे प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान सदरील डि.पी.तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर बालाजी मुंडे, साजीत शेख, एकनाथ मुुंडलिक, संजीवनी सांगळे, संतराम ढाकणे, गोदावरी शिंदे, ज्ञानोबा आंबळे, गुलाब शेख, खान युसूफ, इम्रान खान, सद्दाम शेख, आमेर शेख, अजीम शेख, सय्यद जुबेर, कैलास काजळे, आदींसह अनेकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार परळी मुख्याधिकारी न.प.परळी, मुख्य अभियंता महावितरण अंबाजोगाई यांना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment