Saturday, June 12, 2021

लोडशेडिंग सारखे ऊर्जामंत्री आले अन गेले !ना कुणी पाहिले ना कोणी दखल घेतली!!


ऊर्जामंत्री आले अन गेले !ना कुणी पाहिले ना पुसले !!

बीड  ( कांतीकारी साथी न्युज) राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते,मात्र ते कधी आले ,कधी गेले हे काँग्रेसच्या मोजक्या चार दोन लोकांव्यतिरिक्त कोणालाच कळले नाही.त्यांच्या दौऱ्याची माहिती ना माहिती कार्यालयाने दिली ना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एवढंच काय ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या ऊर्जा विभागाने देखील याची खबर कोणाला दिली नाही .

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे .मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जितका बोलबाला आहे तितका काँग्रेस चा दिसत नाही .कारण प्रशासन असो की शासन कोणीच काँग्रेसच्या बाबतीत सिरीयस नसल्याचे चित्र आहे .

राष्ट्रवादी अथवा शिवसेनेचे मंत्री संत्री येणार असतील तर सगळं प्रशासन दिमतीला असतं, मोठा गाजावाजा केला जातो,बैठका अन दोऱ्याचा नियोजित अन सुव्यस्थित कार्यक्रम मीडिया पासून ते कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांना सांगितला जातो .

मात्र काँग्रेसचे मंत्री कधी येतात अन कधी जातात याची खबर कोणालाच मिळत नाही .राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे बीडला येऊन गेले,त्यांचा दौरा आहे हे त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या चार दोन डिजिटल वरून लक्षात आले .ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या ऊर्जा विभाग अर्थात महावितरण ,महा पारेषण विभागाने देखील बहुतेक त्यांचा दौरा गुप्त ठेवला .

ते ज्या पक्षाचे आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी देखील काही मोजके लोक (कार्यकर्ते नाही ) सोबत घेत त्यांचे अण्णाभाऊ साठे चौकात स्वागत केले .ना त्यांच्या स्वागताच्या कमानी लागल्या,ना कोणत्या वर्तमानपत्र अथवा इतर मीडियावर त्यांच्या स्वागताच्या जाहिराती दिसल्या,ते ज्या कार्यक्रमासाठी आले होते त्या कार्यक्रमाची जाहिरात देखील ऊर्जा विभाग अथवा काँग्रेस ने काढलीं नाही .

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचवत दिन दलित शोषित वंचित घटकांच्या उत्थानासाठी झटणाऱ्या डॉ राऊत यांच्या सारख्या अभ्यासू नेत्याच्या दौऱ्याची खबर मीडिया अथवा इतरांना न लागू देऊन जिल्हा काँग्रेस,प्रशासन,ऊर्जा विभाग यांनी नेमकं काय साधलं असा सवाल उपस्थित होत आहे .

आपल्या पक्षाच्या मंत्र्यांचा दौरा असल्यावर तरी दहा पाच रुपये खर्च करावे लागतात हे जिल्हा काँग्रेसला कीं शिकवणार असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे .शिवसेना अथवा राष्ट्रवादी चे मंत्री येणार असल्यावर टाईट असणारे ते ते विभाग अथवा जिल्हा प्रशासन देखील डॉ राऊत यांच्या दौऱ्याच्या वेळी ढिले होते हे दिसून आले .

2 comments:

  1. नितीन राऊत साहेब साहेब,*

    *साहेब, २०१४ ला महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदांची भरती घ प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात ६५४२ पदांसाठी काढली आणि ही भरती प्रक्रिया संपूर्ण पणे पार पडली साहेब 🙏*

    *साहेब, आता तब्बल ४-५ वर्षांनी २०१९ ला महावितरण मद्ये विद्युत सहाय्यक पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात ५००० पदांसाठी काढण्यात आली या भरती मद्ये ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचं होत त्यांनी ते अर्ज केला साहेब🙏*
    *साहेब आम्हाला माहीत आहे की या जगात आणि आपल्या देशात कोरोना महामारी मूळे काय घडतंय आणि काय घडतं चाललंय साहेब 🙏* *साहेब आम्ही गरीब कुटुंबातले मुले आहोत २ वर्ष झाले विद्युत सहाय्यक भरतीच्या प्रतीक्षेत आहोत, साहेब आम्ही सकाळला झोपेतून जागी झाल की अस वाटते की आज तरी विद्युत सहाय्यक च निकाल लागेल पण निकाल काही लागे ना साहेब आम्ही किती वर्ष वाट बघायची निकालाची आमची सहनशीलता संपत चालली साहेब किती सहन करायचं साहेब🙏*
    *साहेब तुम्हाला माहित आहे की महावितरण चे सगळेच कर्मचारी कोरोना महामारी मद्ये सुद्धा अखंडित वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे पण साहेब या कोरोना महामारी मुले असे कितेक कर्मचारी covid+ आहेत आणि काही कर्मचारी covid मुळे सेवा देताना मृत्युमुखी पावले आणि या २ वर्षामध्ये कितीतरी कर्मचारी सेवा निवृत्ती झालेत साहेब उपकेंद्र सहाय्यक पदासाठी जवळपास १२०० महावितरणचे वर्ग ४ चे कर्मचारी निवड झालेत आणि साहेब महावितरण वर्ग ४ ( विद्युत सहाय्यक) पदाच्या जवळपास १५००० पदे रिक्त तरी देखील उन वारा पावसाळा न बघता वर्ग ४ चे कर्मचारी मनुष्यबळ कमी असले तरी देखील सेवा देतात आणि सेवा देतच आहेत*
    *साहेब २०१९ ते मे २०२१ पर्यंत किती तरी कर्मचारी सेवा निवृत्त झाले असणार साहेब आता तर काही कर्मचाऱ्यांवर खूप कामाचा ताण वाढत असणार*
    *साहेब 🙏(हात) जोडून विनंती करतो की महावितरण मधे २०१९ ला विद्युत सहाय्यक पदांची ५००० पदांसाठी जाहिरात काढली ती आता ७००० पदांसाठी करण्यात यावा जेणेकरून कामाचा ताण खूप कमी होईल व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुरळीत होईल साहेब* *आणि शेतकरी कुटुंबातील बेरोजगार १,५०,००० लाख विध्यार्थीने अर्ज केला आहे तरी* *साहेब, आम्हा भरतीवर आवलंबून असलेल्या बेरोजगार ७००० विद्यार्थांना रोजगार तरी मिळेल*

    *साहेब आता १७जून२०२१ ला उच्च न्यायालयात सुनावणी आहे तर आमची येवढीच इच्छा आहे की महावितरण कडून निकाल मार्गी लागेल आणि पूर्णतः स्थगिती उठणार*
    *साहेब १७ जून २०२१ ला स्थगिती उठवा 🙏🙏🙏 आणि निकाल ५०००+२००० = ७००० पदांची निवड यादी २५ जून पर्यंत लावण्यात यावी*
    *हीच आपणास नम्र विनंती साहेब. ..* 🙏🙏🙏🙏🙏
    *एक शेतकरी कुटुंबातील बेरोजगार विद्यार्थी* 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. *प्राजक्त (दादा) तनपुरे साहेब,*

    *साहेब, २०१४ ला महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदांची भरती घ प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात ६५४२ पदांसाठी काढली आणि ही भरती प्रक्रिया संपूर्ण पणे पार पडली साहेब 🙏*

    *साहेब, आता तब्बल ४-५ वर्षांनी २०१९ ला महावितरण मद्ये विद्युत सहाय्यक पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात ५००० पदांसाठी काढण्यात आली या भरती मद्ये ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचं होत त्यांनी ते अर्ज केला साहेब🙏*
    *साहेब आम्हाला माहीत आहे की या जगात आणि आपल्या देशात कोरोना महामारी मूळे काय घडतंय आणि काय घडतं चाललंय साहेब 🙏* *साहेब आम्ही गरीब कुटुंबातले मुले आहोत २ वर्ष झाले विद्युत सहाय्यक भरतीच्या प्रतीक्षेत आहोत, साहेब आम्ही सकाळला झोपेतून जागी झाल की अस वाटते की आज तरी विद्युत सहाय्यक च निकाल लागेल पण निकाल काही लागे ना साहेब आम्ही किती वर्ष वाट बघायची निकालाची आमची सहनशीलता संपत चालली साहेब किती सहन करायचं साहेब🙏*
    *साहेब तुम्हाला माहित आहे की महावितरण चे सगळेच कर्मचारी कोरोना महामारी मद्ये सुद्धा अखंडित वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे पण साहेब या कोरोना महामारी मुले असे कितेक कर्मचारी covid+ आहेत आणि काही कर्मचारी covid मुळे सेवा देताना मृत्युमुखी पावले आणि या २ वर्षामध्ये कितीतरी कर्मचारी सेवा निवृत्ती झालेत साहेब उपकेंद्र सहाय्यक पदासाठी जवळपास १२०० महावितरणचे वर्ग ४ चे कर्मचारी निवड झालेत आणि साहेब महावितरण वर्ग ४ ( विद्युत सहाय्यक) पदाच्या जवळपास १५००० पदे रिक्त तरी देखील उन वारा पावसाळा न बघता वर्ग ४ चे कर्मचारी मनुष्यबळ कमी असले तरी देखील सेवा देतात आणि सेवा देतच आहेत*
    *साहेब २०१९ ते मे २०२१ पर्यंत किती तरी कर्मचारी सेवा निवृत्त झाले असणार साहेब आता तर काही कर्मचाऱ्यांवर खूप कामाचा ताण वाढत असणार*
    *साहेब 🙏(हात) जोडून विनंती करतो की महावितरण मधे २०१९ ला विद्युत सहाय्यक पदांची ५००० पदांसाठी जाहिरात काढली ती आता ७००० पदांसाठी करण्यात यावा जेणेकरून कामाचा ताण खूप कमी होईल व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुरळीत होईल साहेब* *आणि शेतकरी कुटुंबातील बेरोजगार १,५०,००० लाख विध्यार्थीने अर्ज केला आहे तरी* *साहेब, आम्हा भरतीवर आवलंबून असलेल्या बेरोजगार ७००० विद्यार्थांना रोजगार तरी मिळेल*

    *साहेब आता १७जून२०२१ ला उच्च न्यायालयात सुनावणी आहे तर आमची येवढीच इच्छा आहे की महावितरण कडून निकाल मार्गी लागेल आणि पूर्णतः स्थगिती उठणार*
    *साहेब १७ जून २०२१ ला स्थगिती उठवा 🙏🙏🙏 आणि निकाल ५०००+२००० = ७००० पदांची निवड यादी २५ जून पर्यंत लावण्यात यावी*
    *हीच आपणास नम्र विनंती साहेब. ..* 🙏🙏🙏🙏🙏
    *एक शेतकरी कुटुंबातील बेरोजगार विद्यार्थी* 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete