२१ जोडप्यांचा विवाह संपन्न
बीड जिल्ह्यात विहांग प्रकल्प हा एचआयव्ही बाधित व्यक्ती यांच्यासाठी काम करतो. जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांना या ठिकाणी त्यांच्या गोळ्या औषधासह त्यांचं मनोबल वाढवून चांगल्या आयुष्याची सुरुवात करण्यास हा प्रकल्प त्यांना आधार देतो. हा प्रकल्प गेल्या सहा वर्षापासून बीड जिल्ह्यात" जुळून येती रेशीमगाठी "या ब्रीद वाक्याने एचआयव्हीग्रस्त वर आणि वधू यांचा विवाह सोहळा पार पडत आहे. दरवर्षी या विवाह सोहळ्याला थोड्या थोड्या प्रमाणात नागरिकांनी देखील सहभाग घेत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडला जातो. यामध्येच यावर्षी या विवाह सोहळ्यामध्ये तब्बल २१ जोडप्यांचा विवाह झाला, यामध्ये दोन मुस्लिम धर्मीय जोडपी तर बौद्ध आणि हिंदू धर्मीय जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्यासाठी नातेवाईक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता ढोल ताशांच्या गजरात या जोडप्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं.पहिल्यांदा मुस्लिम समाजातील दोन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर बौद्ध धर्मीय जोडप्यांचा या ठिकाणी सोहळा पार पडला. यानंतर उर्वरित जोडप्यांचा हिंदू धर्माच्या रीतीरीवाजा नुसार हा सोहळा लग्न मंडपात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यात एचआयव्हीबाधित असलेल्या वधूवरांना एकत्रित आणून पुढील आयुष्य मोठ्या आनंदात जगण्यासाठी आणि एचआयव्ही सारख्या रोगाने खचून न जाता आपला आयुष्य आपल्या जोडीदार सोबत मोठ्या आनंदात जगण्यासाठी बीडच्या संत महंतांनी यावेळेस आशीर्वाद दिले आहे.
या सोहळ्यामध्ये मोलाचा वाटा ठरला तो महाराष्ट्र उपाध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष व्यापारी महासंघ जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी यांनी या विवाह सोहळ्यासाठी लग्न मंडपात नववधूंना कुटुंब उपयोगी सर्व गोष्टी घेऊन या विवाह सोहळ्या मोठ्या थाटात यांच्या सहभागाने पार पडला आहे. संतोष सोहनी यांनी बीड जिल्ह्यातील अनेक व्यापारी यांचा सहभाग घेऊन या सोहळ्याचा मोठ्या थाटात आयोजन केलं होतं.
No comments:
Post a Comment