मुंबई, दि. २५ – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना आज चहापानासाठी निमंत्रित केले होते. यावेळी राज्यपालांची सौजन्यभेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत काय चर्चा झाली याचा अधिकृत तपशील बाहेर येऊ शकला नाही.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत राज्यपालांनी नुकतीच राज्यसरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्यसरकारवर अलिकडच्या काळात सातत्याने टीका होत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कामगारांना मिळत असलेल्या अमानवीय व्यवहाराबद्दल टीका करून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले आहे. यावर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी पलटवारही केला. एकंदरीत कोरोना उपाययोजना, राजकीय अस्थिरतासंदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे.
No comments:
Post a Comment