Sunday, May 31, 2020

राज्यात खाजगी शिक्षण संस्थांनी वाढीव शुल्क आकारल्यास पालकांनी संंनियंत्रकाशी संपर्क साधावा ;- मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. ३१- (प्रतिनीधी ) राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कसलेच वाढीव शुल्क आकारू नये. शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास पालकांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. यासोबतच त्यांनी राज्यातील संनियंत्रक अधिकारी यांची विभाग/जिल्हानिहाय मोबाईल नंबरसह यादीही शेअर केली आहे. ही यादी येथ जोडली आहे.

No comments:

Post a Comment