बीड :- (प्रतिनीधी) बीड जिल्ह्यातील खते बि-बियाणे फर्टी लायजर दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली होती. क्षीरसागर यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करत त्यानुसार ठोक कृषी विक्रेत्यांना २१ ते २५ मे दरम्यान सकाळी ११ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत मुभा दिली आहे.
आता २१ ते २५ मे दरम्यान सकाळी ११ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत कृषी विक्रेत्यांना कार्यालयीन कामकाज व ठोक कृषी निविष्ठा विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. खरीप हंगामाचा कालावधी पाहता व पेरणीचा काळ हा जवळ येत असून शेतकऱ्यांना बि – बियाणे व खते खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदनाद्वारे केली होती.ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे.
No comments:
Post a Comment