Saturday, June 27, 2020

बीड जिल्हात १८० दिवसात ८३ आत्महत्या .

बीड (प्रतिनीधी )- २०१२ पासून दुष्काळाच्या गडद छायेत असलेल्या बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबत नसून जानेवारी २०२० पासून आजपावेत बीड जिल्ह्यात तब्बल ८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतातली नापिकी, कर्जबाजारीपणा यासह आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा आकडा रोज वाढत आहे. दर ४० ते ४८ तासात एक आत्महत्या जिल्ह्यात होत असून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लढणारे शेतीविषयक जाचक कायदे रद्द करा’ची मागणी करत असले तरी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालखंडात तब्बल ८२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून आज पुन्हा गेवराई तालुक्यातील भेंड येथे ३० वर्षीय तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे तरुण शेतकरी मोठठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनासह सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थांनी पुढे येऊन शेतकर्‍यांचं उद्बोधन करणं गरजेचं आहे. 
 गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. हे सत्र अद्यापही थांबलेले नाही. कर्जमाफीच्या निर्णयानंतरही शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या बीड जिल्ह्यात होतात. गेल्या सहा महिन्यात ८२ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. नापिकी आणि कर्जबाजारी व शेती मालाला नसणारा भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आणि यातूनच तो आपले जीवन संपवत आहे. 
महाराष्ट्रामध्ये कधीकाळी शेतकर्‍यांना सुगीचे दिवस होते. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकर्‍यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खालावली. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांना वेगवेगळे कारणे आहेत. या कारणांचा शोध शासन घेत नाही आणि त्यावर कुठल्याही उपाय योजना आखत नाही. सरकार कोणतही असलं तरी फक्त आश्‍वासनाशिवाय काहीच मिळत नाही. भाजपाच्या कार्यकाळात आणि त्यानंतर आता आघाडीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली तरी देखील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. राज्यात सर्वात जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यात होतात आणि मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील ८२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

No comments:

Post a Comment