Saturday, November 29, 2025

ऊस दराचा वाद अवास्तव भाव देणे अशक्य ऊस शिल्लक राहिल्यास आंदोलक जबाबदार : आ. प्रकाश सोळंके

आमदार सोळंके यांनी सांगितले की, ‘‘मतदारसंघात ऊस शिल्लक राहिल्यास याची जबाबदारी आंदोलकांवर राहील.’’ तसेच, आंदोलकांच्या मागण्या ‘अवास्तव’ असून एवढा भाव देणे कारखान्यांना अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार सोळंके यांनी खासगी कारखान्यांनी दिलेल्या ३ हजार रुपयांच्या भावाबाबत बोलताना सांगितले की, त्यांना कोणीही भांडवल पुरवू शकते, याचा अर्थ आम्हीही तेवढाच भाव द्यावा असे नाही. आम्ही ३२ वर्षांपासून एफआरपीपेक्षा जास्त भाव देण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या चालू असलेले आंदोलन राजकीय असल्याचे सांगत आंदोलनाला वेगळे वळण दिले. कारखाने बंद करण्याचे काम आंदोलकांनी केले आहे, त्यामुळे ऊस शिल्लक राहिल्यास तेच जबाबदार राहतील, असे म्हणत आ. सोळंके यांनी आंदोलकांच्या मागणीला अप्रत्यक्ष विरोधच केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आ. सोळंकेनी झटकले अंग, शेतकरी नाराज.

या वादातून अंग झटकण्याचा प्रयत्न आमदार सोळंके यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ‘‘मी सध्या कारखान्याचा केवळ संचालक आहे. कारखान्याचे चेअरमन माझा मुलगा आणि व्हाइस चेअरमन पुतण्या असून, ते हा प्रश्न हाताळत आहेत व मी निवडणूक हाताळत आहे. ‘‘ऊस भावाबाबत सोळंके यांनी अशा प्रकारे हात झटकल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकरी नेत्यांकडून सोळंकेंवर टीका.

सोळंके यांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते व शेतकरी संघर्ष समिती सदस्य भाई गंगाभीषण थावरे यांनी सडकून टीका केली आहे. उसावर पाच वेळा आमदार होणारे प्रकाश सोळंके यांनी ऊस उत्पादकांच्या हिताची जाणीव ठेवून वक्तव्य करावे. असे बेताल वक्तव्य केल्यास ऊस उत्पादक शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना वाढीव भाव न दिल्यास आम्ही त्यांच्या कारखान्यावर आंदोलन करणार आहोत, असे सांगितले

No comments:

Post a Comment