अंबाजोगाई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सुगाव गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत धक्कादायक घटना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनातून कोणताही तोडगा निघत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने बीड जिल्ह्यातील सुगाव गावात आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येची माहिती देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सुगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नितीन चव्हाणने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे कळताच मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेले सुमारे 70 ते 80 तरुण तातडीने सुगाव गावाकडे परत निघाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागल्याची ही तिसरी दु:खद घटना आहे.
No comments:
Post a Comment