Saturday, August 16, 2025

पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने विवाहितेची आत्महत्या.

आष्टी (प्रतिनिधी) : पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने तान्ह्या बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे गुरुवारी सकाळी समोर आली आहे. स्वाती नंदू नागरगोजे-गर्जे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घुगेवाडी (ता. पाटोदा) येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी खिळद (ता. आष्टी) येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता.

No comments:

Post a Comment