Tuesday, February 18, 2020

आज पासून बारावीच्या परीक्षाला सुरूवात .

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा आज, १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यासंदर्भातली माहिती देणारी पत्रकार परिषद बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी घेतली.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रे आहेत.

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी –

विज्ञान – ५,८५,७३६कला – ४,७५,१३४
वाणिज्य – ३,८६, ७८४
व्होकेशनल – ५७,३७३
एकूण – १५,०५, ०२७

No comments:

Post a Comment