परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त दरवर्षी नागापुर ते श्रीक्षेत्र कपीलधार पदयात्रा आयोजित करण्यात येते. यावर्षी 47 व्या वर्षीही ही परंपरा अखंडीत राहणार असून श्री गुरू ष.ब्र.108 राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरु ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली ग्राम दैवत श्री नागनाथ मंदिर नागापुर येथुन मंगळवारी (ता.21) सकाळी 10:00 वाजता निघणार आहे. श्रीक्षेत्र कपीलधार येथे श्री मन्मथस्वामी यात्रा महोत्सव दरवर्षी कार्तिक पोर्णिमेच्या निमित्ताने आयेाजित करण्यत येतो. नागापुर ते श्री क्षेत्र कपिलधार 47 वी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.21) सकाळी दहा वाजता नागापुर येथुन पदयात्रा निघुन परचुंडी येथे दुपार व गुरुकुल खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे. बुधवारी (ता.22) दुपारचे प्रसाद भोपा येथे व मुक्काम बाबी तांडा येथे असणार आहे. गुरुवारी (ता.23) वडवणी येथे दुपारचे प्रसाद असुन हनुमान मंदिर घाटसावळी येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवारी दुपारचे प्रसाद शिवणी येथे असुन श्रीक्षेत्र अवधुत दत्त देवस्थान कोल्हारवाडी फाटा बीड येथे मुक्काम असणार आहे. शनिवारी (ता.25) नागनाथ मंदिर पाली येथे दुपारचे प्रसाद असुन श्रीक्षेत्र कपिलधार येथे मुक्काम असणार आहे. रविवारी श्री क्षेत्र कपिलधार येथे गणपतअप्पा सौंदळे यांच्यावतीने नाष्टयाची सोय असणार आहे. नागापुर ते श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रेत भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त विरशैव समाज नागापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment