बीड (प्रतिनिधी) सप्टेंबर मध्ये जि, प व पंचायत समितिच्या तसेच ग्रामपंचायत च्या सार्वञिक निवडणूका होत असुन असुन बीड तालुक्यातील चौसाळा जि,प, गटाची व जि, प, गटातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुमताने जिंकेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाटाचे युवा नेते विवेक कुचेकर यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास साधला जातो .
पाणीपुरवठा योजना,पाणंद रस्ते,वस्ती रस्ते,आरोग्य सेवा,शैक्षणिक सेवा याच माध्यमातून चागंले काम केले जाते
त्यासाठी जिल्हापरिषद ,पंचायतसमिती व स्थानिक ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असायला हवी.सर्वसामान्य लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे आमदार संदीप (भैय्या)क्षीरसागर व लोकनेते डॉ.बाबु जोगदंड साहेब यांच्या नेतृत्वाखाली व योग्य मार्गदर्शनाखाली चौसाळा जि,प,गटातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
चौसाळा जि,प,गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हीच मतदारांची भावना असुन चौसाळा जि,प, गटातील ग्रामपंचायत मध्ये संपुर्णपणे परिवर्तन होणार असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली जि,प,व ग्रामपंचायत मध्ये सत्ता प्रस्थापित होणार आहे चौसाळा जि,प,गटात लोकप्रिय आमदार संदीप(भैय्या) क्षीरसागर यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत.आदर्श पालकमंत्री धनंजय मुंडे व लोकप्रिय आमदार संदीप(भैय्या) क्षीरसागर व लोकनेते डॉ.बाबु जोगदंड साहेब हे बालाघाट व चौसाळा जि,प,गटातील सर्वसामान्य माणसाच्या मनातील दैवत आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाट युवा नेते विवेक कुचेकर यांनी व्यक्त केले आहे
No comments:
Post a Comment