Wednesday, October 6, 2021

नवरात्रोत्सवात व्रत-उपवास व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसे फायदे देतात.


*_श्री. आशुतोष महाराज जी,_*
*_(संस्थापक आणि संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)_

                भारतात शक्ती उपासनेच्या अनेक विधी आहेत, ज्या की भक्तांनी त्यांच्या श्रद्धेच्या आधारे तयार केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेच्या दिवसांमध्ये केले जाणारे व्रत-उपवास म्हणजेच नवरात्र!  'व्रता'चा सामान्य अर्थ संकल्प किंवा दृढनिश्चय आहे. 
                नवरात्रांच्या नऊ दिवसांत उपवास करण्याचा अर्थ म्हणजे तामसिक-राजसिकतेचा त्याग करून सात्विक आहार-विहार-वर्तन स्वीकारून आदि-शक्तीची उपासना करण्याचा संकल्प होय. वर्षातून दोनदा शक्तीपूजेचा प्रसंग येतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, या दिवशी अन्न सोडून फळ किंवा इतर सात्विक अन्नपदार्थ का खावे? पहिली नवरात्र चैत्र महिन्यात व दुसरी अश्विन महिन्यात येते.ही अशी वेळ आहे जेव्हा दोन ऋतूंचा संगम असतो. ऋतुंच्या संधिकाळाच्या दरम्यान रोग होण्याची शक्यता वाढते. हेच कारण आहे की, जर संधीकाळाच्या वेळी संयम ठेवून उपवास केला तर आपण अनेक रोगांपासून सुरक्षित राहतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचे आहे.

नवरात्रीच्या उपवासाने आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.  
*शरीरातील विष निवारण-* निराहार राहिल्याने किंवा फळे खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनसंस्थेला विश्रांती मिळते. 

*रोगांवर प्रतिबंध-* असे अनेक रोग आहेत, जे उपवास केल्याने सहज टळतात. जसे लठ्ठपणावर नियंत्रण, हृदयरोग आणि कर्करोगाचे प्रतिबंध इ. कारण फळे, फळांचा रस आणि न तळलेले अन्न विषमुक्त व चरबीमुक्त असतात.

*मानसिक तणावावर नियंत्रण-* निराहारातून विषारी पदार्थ बाहेर पडतात, आणि लसिका प्रणाली सुधारली जाते. रक्त परिसंचरण चांगले होते, हृदयाचे कार्य सुधारते. यामुळे मानसिक शक्ती वाढते. तणाव कमी होऊ लागतो. हलके अन्न खाल्ल्याने मनही हलके राहते.

*री हायड्रेशन/अंतर्गत अवयवांचे सिंचन -* उपवास करताना कमी अन्न खाणे आणि जास्त पाणी पिणे, यामुळे शरीराच्या अंतर्गत भागांचा कोरडेपणा दूर होतो. हातपाय आणि त्वचा पुन्हा हायड्रेटेड म्हणजेच ते सिंचन करतात. पचनसंस्थाही चांगले कार्य करते.

*शरीर आणि मनाचे सुशोभिकरण -* उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये, दिनचर्या आणि जेवणात इतके बदल होतात की, त्याचा तुमच्या त्वचेवरही परिणाम होतो. विशेषतः फळे आणि शेंगदाणे यांच्या सेवनाने त्याचा थेट संबंध आपल्या शरीरातील कमी होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेशी आहे. या व्यतिरिक्त, जास्त प्रमाणात द्रव पदार्थ व पाणी पिण्याने आतडे स्वच्छ होतात त्यामुळे शरीर आणि त्वचेलाही सहजपणे तेज मिळते. शरीराच्या शुद्धीकरणामुळे मनातील विचारांमध्ये शुद्धता येते आणि बुद्धीचाही विकास होतो. सात्विक आहारामुळे सात्त्विक प्रवृत्ती विकसित होते, ज्यामुळे मनाला शुभ विचार आणि संकल्पांकडे नेले जाते.
              वरील विश्लेषणाद्वारे, आपणास हे लक्षात आले असेल की, नवरात्र आणि इतर वेळी केले जाणारे व्रत उपवास शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे कसे प्रदान करतात. म्हणून, आपण आपल्या प्रकृतीनुसार नवरात्र दरम्यान व्रत उपवास करू शकता. तसेच, पूर्ण सदगुरूंकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून ईश्वराचे चिंतन करा, जेणेकरून या महाशक्तीच्या विशेष रात्रींमध्ये आपली आध्यात्मिक उन्नती देखील होईल, आपण देवीची शाश्वत भक्ती प्राप्त करून आपले जीवन यशस्वी करू शकतो, हे या उत्सवाचे मुख्य ध्येय आहे. *दिव्य ज्योति जाग्रति संस्थान कडून नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.*

No comments:

Post a Comment