अनेकांच्या ठेवी मिळाल्या परत :
मागील 2 महिन्यांपूर्वीच मा. जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेनं कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आणि अनेक लोक रस्त्यावर आले. त्यानंतर काही दिवसांतच पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरही जीएसटी विभागानं कार्यवाही करत 19 कोटींची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणानंतर आता कुटे ग्रुपच्या मालकीची असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बुडाली अशी अफवा उठवली जात असल्याचे बघायला मिळतंय. त्यामुळं आपल्या ठेवी बुडतील, या भीतीने बँकेतील ठेवीदार मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करतायत. मात्र, काल दुपारनंतर अनेक मोठ्या घडामोडी झाल्या आणि या दरम्यान अनेक लोकांच्या ठेवी परतही मिळाल्या. मात्र हे सर्व प्रकार बीड जिल्ह्यातच का घडतायचत? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.
बँकेचे अध्यक्ष काय म्हणाले? :यासंदर्भात प्रतिक्रिया देत बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे म्हणाले की, 'तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल, तेव्हा तुमचे पैसे आम्ही परत देऊ. कारण बँक सुस्थितीमध्ये आहे. त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ठेवीदारांना एकच विनंती आहे की, आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका. शिस्तीत रक्कम काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी कुठलीही अडकाठी येणार नाही.'
उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वाळकेंची प्रतिक्रिया :
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या समोर आज अचानक ठेवीदारांनी गर्दी केल्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं. आपापल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केलीय. या अनुषंगाने आम्ही ब्रांच मॅनेजरशी बोललो. त्यांच्या मते, खातेदारांना त्यांची रक्कम परत देण्यात कुठलीही अडचण नाही. फक्त खातेदारांच्या गर्दीमुळे नियोजनात अडथळे येत आहेत. या संदर्भात बॅंकेच्या संस्थापकांनी त्यांना ठेवी परत देण्यात काहीच अडचण नसल्याचं स्पष्ट केल्याचं सांगत ठेवीदारांनी शिस्तीचं पालन करत, रांगेत उभं राहून आपापल्या ठेवी परत घ्याव्यात, संयम दाखवावा, असं आवाहन वाळके यांनी केलंय.
No comments:
Post a Comment