1 जानेवारी ते 7 जुलै 2023 या 6 महिन्यांमध्ये 7 दिवसांच्या कालावधीत 147 शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. यातील 59 आत्महत्येची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. तर उर्वरित 57 प्रकरणे चौकशीवर असून आत्महत्येची 30 प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत.
कधी शेतीच्या समस्या तर कधी कर्जबाजारीपणा ही आत्महत्येची प्रमुख कारणे असल्याचं समोर आलंय. याबरोबरच पाण्याचे संकट अन् त्यामुळे शेतीतून न मिळालेले उत्पन्न अशा स्थितीत हवालदिल झालेला बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो आहे.
कोणी गळफास घेत आहे तर कोणी विषारी द्रव प्राशन करत आहे. शासन दरबारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना 1 लाखांची मदत दिली जातेय. मात्र मदत देण्यापेक्षा आमच्या मालाला हमीभाव द्या. अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
No comments:
Post a Comment