परळी वैजनाथ; अत्यावश्यक असलेल्या किराणा बाजार व भाजीपाला खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर पालिकेने आता शहराच्या विविध भागात असलेल्या किराणा दुकान,मेडिकल व भाजीपाला विक्रीसाठी प्रचंड मेहनतीने शिस्तबद्ध नियोजन केले होते.गर्दी करु नका सोशल डिस्टंस् पाळा वारंवार आवाहन करुन ही परळीत काही महाभाग घालुन दिलेले नियम तोडुन व्यापार करतांना दिसुन आले अश्यांच्या विरुध्द प्रशासनाने कठोर पाउल उचलुन काही दुकानाला सिल तर अनेक हातगाड्यावर आज सकाळी कार्यवाही करण्यातआली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी शिथिल काळात (सकाळी 7 ते सकाळी 9.30 या वेळेत)किराणा व भाजीपाला खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरीक गर्दी होऊच नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.नागरिक व व्यापारी नियमांचे पालन करता आहेत परंतु काही जण माञ याकडे चक्क नजर अंदाज करत आहेत.अश्या व्यापाऱ्या विरुध्द कठोर पाउल उचलायचे असे प्रशासनाने ठरवले असुन आज जेव्हा सकाळी 7 ते सकाळी 9-30 च्या दरम्यान बाजार चालु झाला तेव्हा प्रशासनाने यावर करडीनजर ठेऊन मार्कट ते अग्रवाल लाॕज दरम्यान असलेल्या दुबे किराणा व दुबे प्रोव्हिजन या दोन किराणा दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे दुकाने सिल करण्यात आली.
फळविक्रेत्यासाठी फांऊंडेशन स्कुल (तोतला मैदान]येथे नियोजन केले असताना काही फळविक्रत्यांनी मार्कट परिसरात हातगाडे लावली होती तर भाजी विक्रेत्यांसाठी नियोजन बॕरिकेट केले असताना काही भाजी विक्रेत्यांनी बॕरिकेटच्या बाहेर भाजीपाला मांडुन दिलेल्या सुचनाचे पालन न केल्याने अश्या विविध व्यापा-यांचे तराजु अदी व साहित्य जप्त करण्यात आले.
तहसिलदार डॉ विपीन पाटिल,न.प.मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली असुन यावेळी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे तलाठी गंगाधर राजुरे व काही पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment