Monday, March 30, 2020

नायब तहसीलदार रुपनर साहेब यांच्या सहकार्यामुळे उपाशी कुटुंबाला मिळाले अन्न.


परळी (प्रतिनिधी ) संपूर्ण भारतात चालू असलेल्या लाॅकडाऊन मुळे लाखो मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील नाथरा गावाजवळ राजस्थान राज्यातील दोन कुटुंब उपाशी पोटी असल्याची माहिती नायब तहसीलदार रुपनर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सुञे
हलवून त्यांच्या अन्न पाण्याची सोय केली.
या कुटुंबाची माहिती तलाठी गिते मॅडम यांनी नायब तहसीलदार रुपनर यांना दिली. त्यांनी लगेच नाथरा गावचे चेअरमन अतुल मुंडे यांना दिली. अतुल मुंडे यांनी यांचं कुटुंबातील सर्वाची अन्न धान्याची व्यवस्था केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा जबाबदारीचा ताण असतानादेखील माणुसकीच्या भावनेतून काम करणारे रुपनर, अतुल मुंडे, व तलाठी गिते मॅडम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment