दरम्यान, माजलगावात सध्या बालरोगतज्ज्ञाच्या गैरहजेरीतच प्रसूती, सिझर केले जात आहेत. शासनाने ज्या उद्देशाने बालरोग तज्ज्ञाची नियूक्ती केली होती, तो उद्देश वैद्यकीय अधीक्षकांनी धुळीत मिळवला आहे. या प्रकाराने गेवराई व माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मिरा एखंडे सारखे प्रकरण झाल्यास जबाबदार कोण?
काही वर्षापूर्वी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीवेळी मिरा एखंडे या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही येथील अधिकारी सजक झाले नाहीत. आजही बालरोग तज्ज्ञ नसतानाही सीझर केले जात आहेत. प्रसुतीवेळी गुंतागुंत अथवा काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविणाऱ्या दोन्ही वैद्यकीय अधीक्षकांची चौकशी करावी, तसेच त्यांना अभय देणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
केजची नर्स बीडला, तर बीडची केज येथे
केज उपजिल्हा रूग्णालयातील एक परिचारीका जिल्हा रूग्णालयात प्रतिनियूक्तीवर आहे तर बीडमधील केजमध्ये आहेत. त्यांनाही कसलाही लेखी आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत केजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांचा संपर्क न लागल्याने बाजू समजली नाही.
कोण काय म्हणतंय...
माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रूद्रवार म्हणतात, डॉ.सराफ यांची नियूक्ती आहे. परंत त्यांनी सुरूवातीचे काही दिवस काम केल्यानंतर ते फिरकलेच नाहीत. त्यांची लेखी प्रतिनियूक्ती कोठेही नाही. ते येत नसल्याचे आम्ही वरिष्ठांना कळविले आहे, परंतू त्याची तारीख आठवत नाही असे सांगितले. तसेच सध्या माणुसकीने इतर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचेही त्यांनी मान्य केले. गेवराईचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले, आमच्याकडे दोन नियमित बालरोग तज्ज्ञ आहेत. डॉ.सराफ हे देखील गेवराईतच काम करत आहेत. त्यांची लेखी ऑर्डर नाही, हे खरे आहे. आता याबाबत मी जास्त बोलू शकत नाही, वरिष्ठांना विचारावे. तर डॉ.प्रवीण सराफ म्हणाले, मला लेखी नव्हे पण प्रशासनाने तोंडी आदेश दिले आहेत. त्यावरून मी गेवराईला काम करत आहे.
No comments:
Post a Comment