Saturday, August 29, 2020

* मैत्रीच निखळ नात *

      
मैत्री म्हणजे काय खरच कळल
किती कठीण मैत्री  म्हणजे
वय, जात, धर्म यांना न मानणारी
कधी हसवणारी तर कधी रडवणारी
मैत्री म्हणजे हृदयात जन्माला आलेली
समाजाच्या बंधनातून हळूच बाजूला झालेली.मैत्री महणजे एकमेकांना सावरणारी समजून घेणारी, सुखदुःखात सहभागी होऊन मदतीचा हात पुढे करणारी !खरच मैत्री म्हणजे काय आजवर मैत्री वर अनेकानी अनेक लेख लिहिले.  काही स्वतःच्या अनुभवाचे तर काही दुसर्‍यानी जगलेले सार कस मैत्री या शब्दात बंदिस्त केलेल.  मैत्री अनेक दाखले आजवर प्रत्येकजण देत आलेय.  श्री कृष्णा – सुधमाच्या मैत्री पासून शिवबा बाजीप्रभु, कर्ण-दुर्योधन, पार्थ-माधवा पर्यंत सगळ्यांची मैत्री अगाध आहे. दृढ विश्वासावर अवलंबलेली , पुस्तकातल्या पानासारखे आपण जवळ आलो बोलता बोलता कळल नाही मित्र सुध्दा  झालो.  खरच मैत्री कधी कुणाशी कशी होईल काही सांगता येत नाही.  शाळेत गेल्यावर आपल्याला पहिल्यांदाच  बाहेरच्या जगाशी ओळ्ख  होते.  शालेय जीवनापासून सुरुवात होते ती सगळी नाती समजायला आणि नवीन नाती आत्मसात करायला.  आपल्याला मैत्रीची ओळखही तिथेच  होते.  एकच बाकवेर बसून एकमेकाना मदत करत, खेळताना एकमेकांशी भांडत, रागवत  आपण सुरुवात करतो ती मैत्री.  त्या वयात एकमेकांचे स्वभाव ओळखण आपल्या निरागस मनाला माहित नसते.  त्यामुळे आपण सगळ्यांशी मैत्री करतो.  पण जसजस वय वाढत  जाते  आपणही समाजाच्या दृष्टीकोनातून विचार करायला लागतो.  समोरच्या माणसाच्या स्वभावतील विविध कंगोरे जाणून घ्यायला लागतो.   तिथेच ओळ्ख  होते आपल्याला खरय मैत्रीची तोपर्यंत शालेय जीवन मागे टाकून मनावर आपण सद्न्यान झाल्याच बिंबवीत कॉलेज जीवनात प्रवेश केलेला असतो. सगळ्याशी ओळ्ख असली प्रत्यकाचे गट पडत जातात मग तो कितीही जणाचा  दोन, चार, सहा, दहा, पंधरा, बस्स ह्याच जग मग तेवड्यापुरतच मर्यादित होत आमचा दहा जणांच्या ग्रूप आहे.  आम्ही सगळे चांगले मित्र आहोत, सगळे एकमेकाना खूप समजावून घेतो, एकमेकांच्या मदतीला धावून जातो.  मैत्री पुर्णपणे जगतो.  त्याच्यात इतराना  प्रवेश नसतो. प्रत्येकांच असे असते.  मैत्री ही निरेपेक्ष असते कुणावर जबरदस्ती करून आपली  मैत्री त्याच्यावेर थोपविता येत नाही, ती मनापासून उमलायला लागते.  मैत्रीमधे एकमेकांबद्दल मनापासून काळजी असत, प्रेम वाटायला पाहिजे.  ती भावना मनात रूजायला हवी तरच  मैत्री चिरकाल टिकते.  आपले नातेवाईक जन्मानेच  आपल्याला मिळालेले असतात पण आपले मित्र मैत्रिणी तरी आपण निवडू शकतो हे देवाची कृपाच म्हणायला हवी. अनेक वेळेला रक्ताच्या नात्या पेक्षा स्नेहाचे नाते अधिक जवळचे होऊन जाते.  सख्खी बहिण भाऊ आपल्याला समजून घेउ शकत नाही पण एखादी जीवाभावाची मैत्रिण मित्र आपले मन अधिक ओळखतात त्याच्याशी आपण मोकळे हितगुज करू शकतो पण अशी मैत्री जीवापाड जपावी लागते हेवा, मत्सर, असूया, स्परदा, गैरसमज या सर्व गोष्टी एक चांगली मैत्री संपुष्टात आणू शकते.  सगळ्यांची मैत्री आपल्याला चांगल्या मार्गाला नेइल असाही नाही काहीशी मैत्री करून बरेच जण वाईट व्यसनाकडे, वाईट  वळतात.  अशी मैत्री आपल्याला आयुष्यातून उठवते, निरर्थक  बनवते.  बरेच जण मैत्री करताना एखाद्याला निरखून परकून घेतात.  एखादा विद्यार्थी हुशार विध्यार्थीची मैत्री करू ईच्छितो  पण एकदा सामान्य बुद्धीचा  मुलगा अभ्यासात आपल्याला मदत होईल म्हणून हुशार विद्यार्थीशीच मैत्री करण्यास धडपडतो.  असामान्य बुद्धिमत्ता असीम सौंदर्य लाभलेल्या व्यक्तीशी मैत्री करायला प्रत्येकजण तयार असतो, पण सामान्य बुद्धी लाभलेल्या, साधारण रूप लाभलेल्या व्यक्तीशी मैत्री करायला स्वतःहून कुणी पुढे  येत नाही. बर्‍याच जनाची मैत्री ही अतूट असते अगदी चिरकाल टिकते पण अनेकजण शालेय, कॉलेज जीवन संपल. समाजात वावरताना स्वत:वरच्या जबाबदारीची जाणीव झाली  की मैत्रीच्या संबधापासून दुरावत जातात मग कधीतरी रस्त्यात भेट झाली  की नाही तर आपण अनुभवलेल्या अतूट नात्याची आठवण  झाली तर फोनवर विचारपूस करतात. आजच्या काळात फोन, मोबाइल, इंटेरनेट यामुळे जग जवळ आले असेल तरी माणसे  एकमेकांशी दूर जाउ लागतील.  पुर्वी लोक पत्र -मैत्री करत आता इंटेरनेट-मैत्री करू लागलेत  ओळखणारी, एकमेकाना न भेटलेली, न बघितलेली माणस ही इंटेरनेट मुळे मैत्री करू लागलीत पण त्याच्यातील मैत्री भावनिक दृष्ट्या उच्च पातळी गाठू  शकते का ? उपकरणाद्वारा  एकमेकाबद्दल काळजी, आस्था , प्रेम वाटू शकते ? आपण जसजस मोठ  होत जातो तसतशी मैत्रीची व्याख्या बदलत जाते शालेय जीवनात तारुण्यातील गमती-जमती शेयर करायला मित्र – मैत्रीणी ची साथ हवी असते त्यापुढे  जीवनात येणाऱ्या अनेकविध आडचणितून मार्ग काढण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन म्हणून मित्र-मैत्रीणी हवे असतात. पुढे  वृद्धापकाळात  एकाकी, समाजापासून दुर्लक्षित झाल्यामुळे   जीवनाची अंतिम वाटचाल सुखाची वाहवी म्हणून मित्र -मैत्रिणी हवे असतात.
आजकाल स्त्रीपुरुष मैत्री समजाला नवीन राहिलेली नाही, दोन मैत्रीणी वा मित्रापेक्षा एक मित्र व एक मैत्रिण याची मैत्री निर्मळ असू शकते नाही ने असेतेच पण बऱ्याचवेळा समाजाच्या दृष्टीकोनातून त्यावर टीका केली जाते आणि एका चांगल्या मैत्रीच अंत होतो लग्न झाल की स्त्रीला तिच्या पतीमधे एका चांगला मित्र शोधावा लागतो मग तिचा पती तिचा मित्र झाला नाही तरी चालेल पण तीने जर दुसस्या कुणाशी मैत्री वाढवायचा  प्रयत्न जरी केला तरी तीच्या चरित्र्यावर समाजकडून अनेक आरोप केले जातात मग तीची मैत्री कितीही निर्मळ, निरपेक्ष असली तरीही तीची मैत्री पूर्णत्वाला जात नाही.  एक स्त्री आपल्या पतीच्या मित्र -मैत्रीणीना आपलेस करते पण तोच पती आपल्या पत्नीचा एकदा चांगला मित्र असला तरी त्याच्याकडे ही संशयाच्या नजरेने बघतो मूल मोठी झाली की आई वडीलानी त्यांचे मित्र व्हावे अस म्हणतात,  पण असे किती आईवडिल आहेत जे खरच आपल्या मुलाचे चांगले मित्र -मैत्रिणी होतात, कित्येक जण आपल्या सख्या भावाकडे, नातेवाईकाकडे वर्षातून एखाद वेळेस त्यच्याबरोबर एकदी सहल आयोजित करतात, त्याच्याशी बोलतात, नाहीतर महिन्यातून एकदा तरी मित्र परिवारातील एकाद्याच्या घरी जमवून मैत्रीला उजाळा देण्याचा प्रयत्न करतात, पण नातेवाईक़बाबत असे कुणी करताना दिसत नाही.  बर्‍याच वेळेला मित्र परिवार वेळेप्रसंगी धावून येतो मग त्याच्यामधे वर्षभर बोलण झाल नाही तरी चालेल पण वेळ पडली तर स्वतःचे प्राणही पणाला लावतील, पण आपल्यासाठी , आपल्या जीवाची, आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या आपल्या सैनिक मित्रासाठी  आपण काय करतो.  आपल्या नातलगापासून, मित्रपरिवारपासून दूर असणाऱ्या या सैनिक मित्राकारिता किती जणाच्या मनात प्रेम, आपुलकी मैत्रीची भावना असते त्याचाशी मैत्री करायला मुद्दाम कुणी सीमारेषेवेर गेल्याच ऐकिवात नाही आपण आपली वृती बदलायला हवी.
अनेकांची मैत्री करण्याची पध्धत वेगळी, बहुतेकजण पुस्तकासोबत आपली मैत्री करतात.  काही जण निसर्गाला आपण मित्र मानतात तर काही जण मुक्या प्राण्यांमधे  आपले मित्र -मैत्रिणी शोधू पाहतात, कधी कधी अशी मैत्रीही आपल्याला निर्मळ आनंद देते.  आजकाल वर्तमानपत्रात वाचायला मिळते की दोन राष्ट्रामधील संबंध सुधारण्यासाठी या दोन राष्ट्रात मैत्रीपूर्ण करार करण्यात आला, ऐकल्यावर थोड विचित्र वाटते ना.  मैत्री मधे करार करता येतो मैत्री ही करारावर अवलंबलेली  असू शकते मैत्री कशी पूर्णपणे जगता आली पाहिजे.  आपल्या मैत्रीमुळे आपण कुणाला आनंद देऊ शकलो नाही तरी  दुःख ही देवो नये.  मैत्रीही दोन्ही बाजूनी परिपूर्ण हवी.  एखादा मनापासून दुसर्‍यावर  मैत्री करू पाहतो पण समोरच्याला त्याची मैत्री मान्य नसते.  ज्याला मैत्री करायची त्याच्या भावना तो  समजूच शकत नाही. मैत्री मधे रुसवे, फुगवे, भांडण-तंटा, मान, आदर  सगळे कस भरबरून असायला हव.  झाल्यागेल्याचा हिशोब कधी मांडू नये कधी हृदीयात  तुझ्या फुलते ते अनुभवले मीही.  मैत्री आपुली अखंड राहो कधी ना होवो अंत तुज्या नि माज्या मैत्रीचे लिहू या एक नवे पर्व
वर्षणुवर्ष मैत्री ही अशीच चालू राहील, पिढ्या बदलल्या, माणस बदलली, नवीन शोध  लागले, जग बदलेले तरीही मैत्री हे अस नात आहे जे कधीच बदलणार नाही ते बदलूच शकत नाही म्हणूनच मैत्रिच् नात जपायला हव, एकमेकांमध्ये द्वेषभाव विसरून सगळ्यानी मैत्रीच्या नात्याने एकत्र आल पाहिजे. सगळ्यांमध्ये मित्रता नांदली पाहिजे तेव्हाच आपण म्हणू शकू.
मैत्रीचा हा ठेवा
जपू या आपण सदैव रे
मैत्रीचे हे बंध रेशमी
गुफू या सर्व जगात रे
मैत्री नाही क्षणिक  आपुली
ती तर आहे अभंग रे
मैत्री वाचून सगळी नाती
म्हणजे नुसत्याच रेशीम गाठी रे 
         * शब्दाकंन *
     समाधान कुलकर्णी (पुणे)
      7057478498

No comments:

Post a Comment