Sunday, June 26, 2022

महाराष्ट्रात कृषी मंत्र्याच्या सहमतीने कृषी खात्यात बोगस खते, बि बियाणे, औषधीचा सावळा गोंधळ.२०२० व २०२१ चा पिक विमा तात्काळ देण्याची शासनाकडे मागणी.- वंसत मुंडे .

 परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) खरीप पेरणी चालू झालेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे २०२० खरीप व २०२१ चा विमा तात्काळ शेतकऱ्या खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने काढावेत अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये गुजरात ,मध्यप्रदेशातून कापूस बियाणे अवैधपणे विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे,  तरीही कृषी खात्याचे मंत्री व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असून बोंड आळी ला पायबंद घालण्यासाठी सरकार कडून विशिष्ट कालावधी मधील कपाशीची बीटी बियाणे विक्रीला महाराष्ट्रात बंदी असताना परराज्यातील बियाणे एजंटमार्फत विकले तरीही कृषी खात्याला महाराष्ट्रातले माहिती नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . जास्त भावाने खत बि बियाणे औषधी विक्री करून शेतकऱ्याचे आर्थिक लूट केली जात आहे ,या सर्वशी कृषी मंत्र्याचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. संपूर्ण देशात अप्रमाणित रासायनिक खताचे खूप मोठे रॉकेट असून महाराष्ट्रातील ६ कंपनीचा सहभाग असल्याचे निदर्शनास आलेले आहे, तरीही कृषी खाते कारवाई करीत नाही कारण सर्वांना दुकानदारा पासून ते कारखानदारा पर्यंत टक्केवारी मिळत असल्यामुळे कृषी खात्याकडुन जाणून-बुजून दक्षता पथका मार्फत धाडी टाकुन चौकशी केली जात नाही या सर्वस्वी कृषिमंत्री व त्यांचे सर्व हस्तक जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. केंद्रीय खते नियंत्रण आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि  खते बी-बियाणे औषधी बोगस कंपनीवर चौकशी करून लायसन रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे  निवेदनाद्वारे केली.               
महाराष्ट्रात २०२० चा खरीप विमा अद्यापि वाटप झालेला नसून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे, तरी शासनाने त्वरित केंद्र सरकार व राज्य सरकारने विमा कंपन्यांना सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्याचा २०२०चा खरीप विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देऊन २०२१ चा तात्काळ शेतकऱ्यांना विमा देण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे प्रकाश भन्साळी नवनाथ थोटे अविनाश मोरे शहाजी हिंदोळे अँड अनंत जगतकर हरिभाऊ सोळंके जुबेर भाई चाऊस सुभानराव सोळंके गणेश राऊत परवेज कुरेशी लहुदास तांदळे सय्यद अल्ताफ जावेद कुरेशी यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे विनंती केली.
 
.

No comments:

Post a Comment