___
लिंबागणेश गावामध्ये १० वर्षापुर्वी परिस्थिती वेगळी होती सिमेंट रस्ते नसल्यामुळेच भालचंद्र गणपतीला छबिना मिरवताना गुडघाभर चिखलातून जावे लागायचे. तत्कालीन जिल्हापरिषद सदस्य व विद्यमान आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांनी गावाला गणपती उत्सव दरम्यान प्रदक्षिणा घालणारा रस्ता तत्कालीन सरपंच बाळासाहेब मुळे यांनी उत्तमप्रकारे केला.
त्यानंतर विद्यमान सरपंच स्वप्निलभैय्या गलधर यांनी गावातील उर्वरीत गल्लीबोळातील सर्व रस्त्यांसाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्याकडुन मंजुर करून आणले व पुर्ण सुद्धा केले आराखड्यातील शेवटचा रस्ता पावले गुरूजी यांच्या गल्लीतील रस्ता सरकार बदलल्यानंतर निधी परत गेल्यामुळे राहीला होता.
अखेर शेवटचा रस्ता काल आ.संदिप क्षीरसागर यांच्या फंडातुन २५-१५ मधुन माजी सरपंच बाळासाहेब मुळे यांनी पुर्ण केला आणि गावठाण चिखलमुक्त झाले.
आता वस्तिवरील रस्त्यासाठी प्रयत्न करणार
___
गावठाण चिखलमुक्त झाले तरी वस्त्यावर रस्ते नसल्यामुळेच त्यांना गुडघ्याभर चिखलातुन जावे लागत आहे,मातोश्री पाणंद/शेती रस्ते योजनेंतर्गत उर्वरीत रस्त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे पाठपुरावा करू.....सहजंच नाही मुद्दामहून
No comments:
Post a Comment